जीवनाचे सत्य
आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे की,आपल्या कर्मानुसारच आपल्याला फळ प्राप्त होत असते.तसेच,त्यानुसारच आपली नाती आपोआप तयार होत असतात.प्रत्येक घडणाऱ्या घटनेला कारण आहेच,विना कारणाचे असे काहीच घडत नसते.
कित्येकदा आपल्या अनेक नात्यांमुळे आपण दुःखी असतो. एक कायम लक्षात ठेवायला हवे की,जितके चटके ह्या जन्मात बसत आहेत,बसू द्या,खरेतर ते चांगले आहे,कारण तितकेच आपले त्या आत्म्यांवरील देणे घेणे,आपले हिशोब कमी होत आहेत. त्यामुळे जे येईल ते आनंदाने स्वीकारायचे मग ते सुख असो अथवा दुःख.
आणखीन एक महत्वाची गोष्ट… लक्षात ठेवायची ती अशी की,दुसऱ्या कोणाचे वागणे हे आपल्या हातातले नाही,तुमचा मित्र,तुमची मैत्रीण,तुमचा भाऊ, तुमची बहीण किंवा कोणीही तुमच्याशी कसे वागतील हे तुम्ही ठरवू शकत नाही,आपल्या हातात असते ते म्हणजे फक्त आपण कसे वागायचे.?
शेवटी प्रत्येक नातं काहीतरी देणी घेणी शिल्लक आहेत म्हणूनच तयार झालेलं असतं.मग ते कुठलंही नातं असो,अगदी आपल्याला अचानक येऊन पटकन मदत करून जाणाऱ्या व्यक्तीपासून ते आपल्याला लाभणारे आई,बाबा,नवरा, बायको पर्यंत कोणीही…असे समजणे जास्त सोपे आहे की आपलं जीवन हा एक सिनेमा सुरू आहे आणि आपण सर्वजण ह्यातील पात्र आहोत.
प्रत्येक जण येथे ज्याचं त्याचं पात्र निभावत आहे,त्याची भुमिका (देणी,घेणी)संपली की त्यांची आपल्या जीवनातून म्हणजेच ह्या सिनेम्यातून exit असते.exit ही फक्त मृत्यूनेच नव्हे तर कित्येकदा अचानक काही कारणांनी ते नाते संपुष्टात सुद्धा होते (किंवा त्या नात्याला एक अचानकपणे पूर्ण विराम लागतो, असे म्हणता येईल.
जशी एखाद्या सिनेमातून, एखाद्या पात्राची भुमिका संपली की ते पात्र पडद्यावरून नाहीसे होते,अगदी तसेच.मग आपले ध्येय काय असावे ?, तर ह्या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून लवकरात लवकरत बाहेर पडणे.
मग त्यासाठी काय गरजेचे आहे ?तर ते म्हणजे विरक्त भावना येणे, कशातही अडकून राहता कामा नये,हा कसा वागला,तो कसा वागला हिने असे केले,तिने तसे केले,सर्व काही अगदी पार विसरून जायचे.*सर्वांना मनापासून क्षमा करून टाकणे अगदी स्वतःला सुद्धा.कारण मनात खंत राहिली म्हणजे भावना शिल्लक आहेत, भावना आहेत म्हणजे वासना आहे.वासना आहे म्हणजे भोगण्यासाठी परत जन्म घेणे भाग आहे. वासनेतून मुक्त व्हायला शिकायचंय.त्यासाठी काही वेगळे कष्ट घ्यावयाचे नाही आहेत.आपली ह्या मार्गावर वाटचाल हळू हळू आपोआप होत राहणार आहे.
आपली प्रबळ इच्छाशक्ती व नित्यनेमाने साधन,नामस्मरण हे सुरू ठेवायचं आहे. गुरुमहाराज आपल्याबरोबर मार्ग दाखवायला कायम आहेत हा ठाम विश्वास ठेवायचा आहे आणि आपलं ध्येय मनात पदोपदी पक्क जागृत ठेवायचं आहे. प्रत्येक आत्म्याची पातळी वेगळी आहे,हे आपण प्रामुख्याने कायम लक्षात ठेवायचे.त्यामुळे जो तो ज्याच्या त्याच्या पातळीनुसार वागणार. आपण आपल्या पातळीनुसार वागायचे.
आयुष्य simple आहे,पण आपण अनेक नात्यांचा गुंता करून त्याला फार complicated करत असतो. म्हणूनच हलकं फुलकं जगा. नको त्या कर्मांची गाठोडी खांद्यावर घेत जगू नका.कर्म शुद्ध ठेवा आणि ध्येय पक्क ठेवा म्हणजे कोणाच्या वागण्याने आपल्याला त्रास होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
जीवन म्हणजे काय?…
जगण्याचा अर्थ नीट समजावून घेण्यासाठी तुम्ही तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या.
१) रुग्णालय.
२) तुरुंग.
३) स्मशानभूमी
रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल,की दवाखाना म्हणजे आरोग्याची व पैशाची किती वाट लागते तर आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्याइतके या जगात सुंदर काहीच नाही.
तुरुंगात गेल्यावर स्वातंत्रसेनानी यांनी अश्याच तुरुंगात तुरुंगवास भोगला असल्यामुळे भारत स्वतंत्र झाला आहे,त्याची आठवण येथे स्वातंत्र्याचे महत्त्व तुम्हांला समजेल.स्वातंत्र्य ही जगातील सर्वांत मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल.
स्मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल.आज आपण इथे दुसऱ्या माणसाच्या अंतिमविधीसाठी चालत घेऊन आलेलो असतो आणि उद्या कुणीतरी आपल्यालाही खांद्यावरून येथेच घेऊन येणार आहे.
कटू सत्य
आपण या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही.त्यामुळे विनम्रपणे वागा.देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा,त्याच्याकडे आभार व्यक्त करा.
दररोज परमेश्वराला प्रार्थना करा.आजपर्यँत जे दिले ते तुझेच आहे.मी निमित्त मात्र आहे.इतरांपेक्षा मला तू भरपूर दिलेस.आमचे राहिलेले आयुष्यही तुझ्या कृपाशिर्वादाने सुख,शांती, समाधान,आनंद व समृध्दीचे जाण्यासाठी नामस्मरणाची ताकद दे व तुझी आठवण आम्हास सतत होऊ देत. चांगले आरोग्य दिल्यास तुझी सेवा अखंड करता येईल आणि सेवा करताना हे शरीर तुझे आहे.या शरीराला कोणताही घातपात होऊ नये.याचीही काळजी तुच घे.
अवधूत चिंतन,श्री गुरुदेव दत्त
डॉ.प्राजक्ता पुरोहित