टिंगरीच प्रशिक्षिण दिलं पाहिजे! तमासगीर शेषरावनाना गोपाळ.
खान्देश तमाशा फळाचे अध्यक्ष मा शेषरावनाना गोपाळ यांची एक छोटीशी पोस्ट वाचली. टिंगरी वाजवाण्याचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. नानानी असंही म्हटलं की, टिंगरी वाद्य फक्त भीक मागण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तरुण होतंकरू कलाकारांना त्याच प्रशिक्षण दिलं पाहिजे. त्यातून ही कला जगेल, वाढेल, मोठी होईल.
खांदेशात खूप लोककला आहेत. पण त्या सर्वं आर्थिक कारणामुळे लोप पावत चालल्या आहेत. त्यांना कोणी आश्रयदाता नाही. सिनेमा, मालिका, यामुळे यांचा लोकाश्रय नाहीसा होतं आहे आणि कलेची जाण नसलेल्या राजकारण्यामुळे राजाश्रय संपलेला आहे. अशा परिस्थिती कोणी आश्रयदाता पुढे आला नाही तर या सर्वं लोककला मारणार हे ठरलेल आहे.
शेषरावं नाना हे स्वतः तमाशा फडाचे मालक आहेत. त्यांचे वडील उत्तम गोपाळ हे सुप्रसिद्ध तमासगीर होते. उत्तम नाच्या या नावाने तें प्रसिद्ध होते. त्यांचा स्वतःचा तमाशा फडं होता. नानांचे सासरे शंकर कचूरे हे ही नामांकित तमासगीर होते. नानाच्या सौभाग्यवती सुनंदाताई यांच्या नावे सुनंदा कचूरे तमाशा मंडळ या नावाने नानाचा स्वतःचा तमाशा फडं आहे. त्यामुळे त्यांना लोककलांची जाण आहे.
सर्वं लोककला आहेत तशा त्यांच्या मूळ पारंपरिक बाज आणि वाद्या सहित जिवंत राहिल्या पाहिजेत यासाठी नाना हे प्रयत्न करत असतात. परवा त्यांनी पायं पेटी घेतली. तशीच खान्देशी तमाशा ढोलगी, चोनक हे पारंपारीक वाद्य ही तें वापरत असतात.
त्यांनी ही खंत व्यक्त केली की, खान्देशी टिंगरी आणि खंजिरी यांचं प्रशिक्षण दिलं पाहिजे. भराडी बांधव टिंगरी वापर फक्त सूर म्हणून करतात. त्यावर गाण्याचे बोल तें ऐकवत नाहीत. तें प्रशिक्षण देऊन त्यांना त्यावर गाणी सादर करण्याच प्रशिक्षण दिलं पाहिजे.
मागे शेषराव नाना यांनी वाघ्या मुरळी यांच्या कले बद्दल खंत व्यक्त केली होती. वाघ्या मुरळी हां एक स्वतंत्र कलेचा बाज आहे. त्यांची वाद्य, स्वतंत्र आहेत. तूनतूनं , घाटी, खंजिरी ही त्यांची वाद्य असतात. नृत्यचाही स्वतंत्र बाज असतो. मुरळी नऊ वारी साडीत असतें. एका हातात घाटी आणि पदर धरते आणि दुसऱ्या हाताने मुरळी नृत्यच्या मुद्रा करते. हां जागरणाचा प्रकार म्हणजे देवाची, खंडूबारायाची आराधना आहे. वाघ्या आणि मुरळी दोघेही यळकोट यळकोट जय मल्हार म्हणत भंडारा उधळून त्यांच्या ठरलेल्या पद्धतीने नृत्य करतात.
पण अलीकडे हे सर्वं बदलत चाललं आहे. वाघ्या मुरळीच्या ताफ्यात आता खंजिरी नावाला असतें. ढोलकी हे वाद्य वापरले जाते. मुरळ्या तमाशातील नर्तकी प्रमाणे लावण्या मुजरा करतात. त्यांच्या हातात घाटी नसते तसंच भंडाराही नसतो. वाघ्या मुरळीचा ताफा आता 95% तमाशाचा फडं झाला आहे. यातून मूळ जागरण हरवत चालले आहे.
कदाचित लोकांची अभिरुची बदलत चालल्या मुळे वाघ्या मुरळी ताफ्याचा तमाशा होतं चालला आहे. अशा या आंबट शौकीन प्रेक्षकांनी आपल्या भावनाना आवर घालून वाघ्या मुरळी मूळ स्वरूपात सादर करण्याचा आग्रह धरावा. अन्यथा एक चांगली कला लोप पावण्याचीं भीती आहे.
लावण्या दिलंखेच असतात. त्यातून प्रेक्षकांना आनंद होतो हे मान्य आहे. पण मग त्यांनी त्यासाठी तमाशा पहावा. वाघ्या मुरळी ताफ्याचा तमाशा करू नये. ही खंत शेषराव नानानी एका पोस्ट मध्ये व्यक्त केली होती. मी त्यांच्याशी सहमत आहे.
टिंगरीचा स्वर आणि त्याच्या जोडीला खंजिरीचा ताल वादन ही मनोरंजनाचीं खूप चांगली कला आहे. टिंगरी हे तंतु वाद्य आहे. ही वाद्य प्रापर शिकून घेऊन ती कला चांगल्या प्रकारे सादर केली पाहिजे. फक्त भीक मागण्या साठी आणि सूर लावण्यासाठी त्याचा वापर करू नये. टिंगरी वाद्य नीट विकसित केलं तर त्यात सारंगी, रबाव, संतुल, गिटार, यांच्याशी टक्कर घेण्याच सामर्थ्य आहे. तें जगल पाहिजे, टिकलं पाहिजे. त्याचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले पाहिजेत. या सर्वं कला जपण, वाढवीन हे काम सरकार आणि लोक प्रतिनिधी यांचं आहे. तरच या लोककला जिवंत राहतील. तशी ती रहावी ही खंत लोककलावंत शेषरावनाना यांनी व्यक्त केली आहे.
बापू हटकर