दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे
दुसरान लगीन मा ढुम ढुम वाजे नी कुकू ना करता कपाय खाजे ही अवस्था आहे खान्देशची आहे. खान्देशाच्या इतिहासात पहिल्यांदा खान्देशच्या वाट्याला ६ कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत, आणि उत्तर महाराष्ट्र म्हटले तर ७ मंत्री आहेत. पण तरीही खान्देश उपेक्षित आहे. नाशिक आणि नगरचे पुढारी चतुर आहेत. ते उत्तर महाराष्ट्र असे गोंडस नाव देवुन निधी उपलब्ध करतात आणि आपले चांगभल करुन घेतात. परंतु आमचे काय? कसमादे पासुन अख्खा खान्देश महाराष्ट्र बायपास आहे.
नागपूर अधिवेशनात एकही खान्देशी नेतृत्व खान्देशवर बोलले नाही. बाकी भागातील लोकप्रतिनिधी अक्षरशः तुटून पडले होते. पण आमचे कोणत्या जत्रेत होते समजले नाही. भुजबळ आणि विखे पाटील बरोबर याचा फायदा घेवून निधी पळवून घेतात. दादा भुसे, गिरीश महाजन, डाॅ गावीत, गुलाबराव पाटील, छगन भुजबळ, विखे पाटील,अनिल पाटील, सात कॅबीनेट मंत्री मिळाले आहेत उत्तर महाराष्ट्राला… आज खान्देशची अवस्था ह्या लोकांनी इतकी भयानक केली आहे की, कोणत्याही ही सिंचन प्रकल्पाचे काम चालु नाही.. निधी नाही… पाडळसरे धरणाला सुधारित खर्चाला मान्यता म्हटल्यावर… बापरे काय उदोउदो केला मंत्र्याचा… म्हैस बजारमा आणि आम्ही बांग्यास्ना मायीक आधल्या लिसन वांदर ना मायीक लाल करिसन फिरतस
एक मंत्री पाचपावली नाच करून विकास करताय, त्यांनी पाचपावली नाच केला की कसमादे चा विकास झाला, एक संकटमोचक…. म्हणजे फडणवीसचा लंघोट म्हणुन मिरवले की खान्देशचा विकास झाला. एक मंत्री फक्त कुंकवाचा धनी, आणि एक मंत्री तर पिल्याशिवाय बोलतच नाही. त्यांचा मतदारसंघात काही गावात आणि शहरात २१ दिवसांनी पाणी येतय, आणि साहेब आहेत पाणि पुरवठा मंत्री, म्हणजे नाव सोनुबाई आणि हाती कथलेचा वाडा.. अशी अवस्था आहे. खान्देशच्या नेत्यांचा आणि विकासाचा काही संबंध नाही. वांजुळ प्रकल्प, नार पार, पाडळसरे प्रकल्प, आणि इतर खान्देशातील सिंचन प्रकल्प आणि निधी याच्यावर बोलण्यात यांना रस नाही. बाकी एकमेकांचे उणेदुने काढण्यात यांचे विकासाचे माॅडेल सुसाट चालत. अमळनेर तालुक्याला मा दाजिबा परभत यांच्या नंतर पहिल्यांदाच मंत्रीपद मिळाले… त्यामुळे पाडळसरे प्रकल्प, किंवा बाकीचे सिंचन प्रकल्पाच्या निधिस वाव असतांना सुधारित खर्चाचा गाजर दाखवून विकासाचे घबाड आणल्याचा गाजावाजा करणे म्हणजे निधी आणणे नक्कीच नाही. खर म्हणजे खान्देशला ह्या लोकांनी राजकीय कुपोषित केलय. आज आमची अवस्था काय आहे? कहु तो बाप कुत्ता खाये, ना कहु तो माॅ मार खाये… अशी झाली आहे.
विधानसभा, विधानपरिषद, आणि मंत्रीमंडळात आपले मंत्री आणि लोकप्रतिनिधी बोलत नाहीत. यांना वाटतय आम्ही बोललो तर, मंत्रीमंडळातुन हकालपट्टीतर करणार नाहीत ना? परंतु सरकार मेहरबानी नाही करत, राजकीय वाटा आपल्याला दिलेला असतो. बर खान्देशातील लोकांची अस्मिता तर मेली आहे. मंत्री, पुढारी यांच्या लग्नात, बारसे, मयतेवर आले म्हणजे यांचा विकास झाला. आते ते मानतावर, कानटोचाले बी पुढारी जातस. लगीन मा हायदमा नाचाले जातस… मंग काय झाया आम्हना विकास! मेंढरस्ना पुढारी मेंढाच… मायबाप हो खान्देश सोडुन बाकी महाराष्ट्रात फिरा, बघा जरा सहकार क्षेत्रातील चळवळ, दुध, साखर ची धवल क्रांती, सरकारी योजनांचा भंडारा बघा, आपला निधी तिकडे जातो आपले वांझ नेते फक्त बघत राहतात. यांना राजकीय तुकडे फेकलेले असत… ते चाटत बसतात, आज खान्देशातील पाण्याचा विषय ज्वलंत आहे, पण हे नेते काही बोलत नाही. बाकी ना उर्वरीत महाराष्ट्र ना नेता तर खान्देश ना बारा मा भडवेगीरी करतसच, पण आप्ला पुढारी, मंत्रीस्ले बी त्या मवथीर नी बायकोनी अवलाद समजतस. आप्ली जनता बी पडमथ लीसन पडेल शे, आते खरखरीना जपेल ले उठाडता येस, पडमथ्यासंले कस उठाश्यात? म्हणून आज खान्देशात जलक्रांती, विकासक्रांती, रोजगार क्रांती करायची असेल तर लढा उभा करावा लागेलच… पाठवा ना एकदा आपल्या आमदार, खासदार, मंत्र्यांना बांगड्या आणि साडीचोळीचा आहेर. नियतीचा नियम आहे, हक्क मागावा लागतो मागुन मिळाला नाही तर हिसकुन घ्यावा लागतो, हिसकुन नाही मिळाला तर ताबा घ्यावा लागतो.
आम्हाला लढावेच लागेल, गरज पडली तर स्वतंत्र खान्देशच्या मागणीची ठिणगी टाकावी लागेल… आपले हक्काचे पाणी पळवले जाते, राजकीय हिस्सा पळवला जातो, मतदार संघ पळवले जातात, सर्वात जास्त राखीव मतदार संघ खान्देशात राखीव केले जातात, तरी आम्ही आणि आमचे नेते षंडा सारखे मुग गिळून गप्प आहोत. महाराष्ट्रातील विकासाच्या जत्रेत उर्वरित महाराष्ट्रातील नेते दाबुन विकास निधीचे जिलेबी, शेव, गोडसेव दाबुन खात आहेत, आणि ताटातून पडलेली एखादी जिलेबीची चाकोयी आपला एखादा नेता खातोय, बाकी मात्र खावून फेकलेले कागद चाटन्यात गर्क आहेत… हे किती दिवस चालेल? म्हणून जागे व्हा, स्वाभिमान जागा करा… आपल्या नेते दुसऱ्यांच्या लग्नात नाचत आहेत….
खान्देशचे विकासाचे कपाळ मात्र कुंकवा करिता कपाळ खाजत बसले आहेत.
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम