नितीश कुमार यांच्या सत्तांतर नाट्याने इंडिया आघाडीचे भवितव्य अंधारात
दैनिक पोलीस शोध
संपादकीय.
दि. 31/1/2024
नितीश कुमार यांच्या सत्तांतर नाट्याने
इंडिया आघाडीचे भवितव्य अंधारात !
सुप्रसिद्ध तत्वज्ञ विल्यम क्ले म्हणतात की, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो. राजकारणात हितसंबंध कायम ठेवले जातात. सत्तेच्या खेळाडूंसाठी नैतिक-अनैतिक अशी कोणतीही गोष्ट नसते असे चाणाक्यांनी सुद्धा म्हटले आहे. अलिकडच्या दोन दशकात मूल्याधिष्टीत राजकारण हे संपले असून आता ‘तडजोडीचे’ राजकारण उदयास आले आहे. नितीश कुमार याला अपवाद नाहीत.
स्वातंत्र्य प्राप्तीचा अमृतमहोत्सव झाल्यानंतर आपण आता प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षात पोहचलो आहेत. आणि या अमृत महोत्सवी वर्षाच्या प्रारंभीच देशात 22 जानेवारीच्या ऐतिहासिक घटनाक्रमाने देशात एका नव्या क्रांतीकारी दिवसाची भर पडली आहे. या दिवसामुळे देशातील राजकीय, सामाजिक क्षेत्रातील आयामे आणि परिभाषा बदलून गेली आहे. अर्थात 2024 नंतर या देशात जो राजकीय बदला आला आहे, त्यामागे भारतीय जनता पक्षाचा दृढ निश्चय, कार्यकर्त्यांची एकनिष्ठ फळी, सक्रीय कार्यकर्त्यांची जिद्द आणि मेहनत, सत्तेच्या मोहापासून काही काळ लांब राहण्यासाठी केलेला त्याग या अंत्यत महत्वाच्या बाबी भाजपा संघटनेतअंतर्गत घडत गेल्या. आणि यातून मिळालेले फळ म्हणजे 2014 पासून तर 2024 पर्यंत देशात भाजपा सत्तेत आहे. आणि येणार्या लोकसभेत भाजपा सत्तेत आल्यास आणि नरेंद्र मोदी या देशाचे ‘हॅट्रीक’ करणारे पंतप्रधान झाल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नसावे. भाजपा या पक्षाची स्थापना 1980 मध्ये झाली. म्हणजे हा पक्ष अवघ्या 44 वर्षाचा आहे. विशेष म्हणजे जनसंघाचे नवे रूप म्हणजे भारतीय जनता पार्टी असे म्हणता येवू शकते.
1980 मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकीत तत्कालीन प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांना देशातील नागरीकांनी आणिबाणीचा राग विसरून 529 जागांसाठी झालेल्या निवडणूकीत 353 जागांवर काँग्रेस पक्षाचे उमदेवार निवडून देवून देशात राजकीय चमत्कार घडविला. 1984 च्या पहिल्याच निवडणूकीत भाजपाला केवळ 2 जागावंर विजय मिळविता आता. परंतू आपला संयम आणि आत्मविश्वास आणि संघटन शक्तीवर दिलेला भर यामुळे भाजपाने 1989 मध्ये 85 जागांवर विजय मिळवून देशाच्या संसदेत एका मोठ्या नव्या पक्षाने जन्म घेतला.
असा विजय देशातील डावे पक्ष, उजवे पक्ष म्हणजे ज्योती बसू पासून तर सिताराम येचूरी पर्यंत कोणालाही एव्हढ्या मोठ्या संख्येने लोकसभेत जागा मिळविता आल्या नाहीत. परंतू भाजपाने आपला राजकीय आलेख यानंतर कायम उंचावत ठेवला. म्हणून भाजपाने 1951 मध्ये 120 तर 1996 मध्ये 161 आणि 1998 व 1999 मध्ये 182 जागा भारतीय जनता पक्षाने जिंकल्या आणि 98 व 99 मध्ये अटल बिहारी वाजपेयी यांचे सरकार सव्वासहा वर्ष सत्तेत आले. अर्थात भारतीय जनता पक्षाचा आलेख अवघ्या 1984 ते 1999 म्हणजे निव्वळ 16 वर्षाचा तरूण पक्षाचा आहे.
विशेष म्हणजे 2004 पर्यंत भाजपाचा आलेख खाली गेला नाही. ही पार्श्वभूमी लिहिण्याचे कारण ऐव्हढेच की, आमचा पक्ष 135 वर्षाचा सांगणार्या काँग्रेस पक्षाला लाज वाटली पाहिजे की त्यांना 2014 मध्ये व 2019 मध्ये विरोधी पक्षाला अत्यावश्यक असलेल्या 55 जागा सुद्धा देशभरातून मिळविता आल्या नाहीत. याचे महत्वाचे कारण म्हणजे काँग्रेस पक्षाने या देशात वाढविलेली घराणेशाही जी राजेशाहीत रूपांतरीत झालेली आहे. काँग्रेस पक्षाच्या व्यासपीठावर बसलेले नेते, पदाधिकारी हे केवळ सत्तेसाठी आहेत की पक्षाचे एकनिष्ठ नेते आहेत याची खातरजमा सुद्धा काँग्रेससारख्या देशपातळीवरच्या पक्षाला आजही करता येत नाही, ही या पक्षाची शोकांतिका आहे.
याउलट देशात आपल्या पक्षाची मुळे मजबूत करण्यासाठी विश्वनाथ प्रतापसिंग यांच्या सरकारला भारतीय जनता पक्षाने बाहेरून पाठिंबा दिला होता. आणि ज्या दिवशी भाजपाने हा पाठिंबा दिला होता त्याच दिवशी ‘काँग्रेसमुक्त’ भारताची बिजे पेरली गेली होती. देशातील कोणत्याही विरोधी पक्षासोबत युती करायला भाजपाला कधीही कमीपणा वाटला नाही. मग काँग्रेस प्रणीत विश्वनाथ प्रतापसिंग यांचे सरकार असो, जम्मू काश्मिरमधील मेहबुबा मुफ्ती मोहम्मद सईद असो किंवा समाजवादी विचारसरणीचे जनता दल युनायटेडचे नितीश कुमार असू देत या सर्व विचारसरणीच्या नेत्यांसोबत भाजपाने हात मिळवणी केली. आणि आज देशात गेल्या दहा वर्षापासून भाजपा क्रमांक एक वर पोहचलेला राजकीय पक्ष आहे.

बिहारचे चाणाक्ष व बुद्धीमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी इंडिया आघाडीत जाण्याचा पूर्णपणे मनापासून विचार केलेला असतांना इंडिया आघाडीच्या बैठका होत होत्या. नितीश कुमार हे पंतप्रधान पदासाठी इच्छक आहे हे सुद्धा स्पष्टपणे दिसत होते. परंतू शरद पवारांचे चुकीचे राजकारण आणि गांधी घराण्याचा सत्तेचा मोह हा या गोष्टींना मान्यता देवू शकलेला नाही. आणि मल्लीकार्जून खरगे यांना इंडिया आघाडीचे निमंत्रक बनविण्यात आले, त्याच दिवशी इंडिया आघाडी संपली होती हे शेमंड पोरगे सुद्धा सांगु शकेल. परंतू शरद पवारांचा सल्ला या निर्णयात चुकीचा ठरला.
नेमके याच घटनेला भाजपाने कॅच केले आणि रविवारी म्हणजे 28 जानेवारी रोजी बिहारमध्ये नितीश कुमार यांचे सत्तांतर नाट्य घडवून त्यांनी नव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यामुळे 22 जानेवारी नंतर 28 जानेवारी या दोन्ही तारखा इतिहासात नोंदल्या गेल्या. त्यातून बिहार सारखे एक राज्य येणार्या लोकसभा विधानसभा निवडणूकीसाठी भाजपाने ताब्यात घेतले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचेसोबत सुद्धा भाजपाने हातमिळवणी केली तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. त्यामुळे नितीश कुमार यांच्यासारख्या बुद्धीमान व्यक्तीवर टिका करणे काँग्रेसच्या सत्तालुलूप घराणेशाहीच्या राजकीय लोकांना शोभत नाही.
काँग्रेसमुक्त भारजाच्या दिशेने भाजपाची ही वाटचाल 22 जानेवारी रोजी श्रीराम लल्लांच्या आशिर्वादाने सुरू झालेली आहे. राहुल गांधी एकटे जीवतोडून पदयात्रा काढत आहेत. तर काँग्रेसजन आपल्या घराणेशाही मशगूल आहेत. काँग्रेस पदाधिकार्यांनी खूर्च्या बळकावल्या आहेत. आणि जातीचे राजकारण महागात पडले त्याचे पडसात सर्वत्र दिसत आहेत. एकमात्र निश्चित की मुफ्ती मोहम्मद सईद सोबत भाजपाने युती केली आणि त्यातून 370 कलम रद्द करून देशाचा फायदा केला हे भाजपाची वाटचाल आहे. म्हणून नितीश कुमार यांच्या सत्तांतर नाट्यात येणार्या लोकसभेत काँग्रेसचा दारूण पराभव आणि अंधकारमय भवितव्य लपलेले आहे.
तुर्तास एव्हढेच…
1 thought on “नितीश कुमार यांच्या सत्तांतर नाट्याने इंडिया आघाडीचे भवितव्य अंधारात”