नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या

23 जानेवारी .
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या.

क्रांतिवीर नेताजी सुभाष चंद्र बोस यांचा जन्म
23 जानेवारी 1897 रोजी ओडिशाच्या कटक येथे हिंदू कायस्थ कुटुंबात* झाला. ह्यांचा वडिलांचे नावं जानकीनाथ बोस आणि आईचे नावं प्रभावती होते. प्रभावती कोलकाताच्या नामवंत कुटुंब दत्त कुटुंबातील होत्या. यांचे वडील गंगनारायण दत्त होते.

जानकीदास कटकचे नामवंत वकील होते. आधी त्यांनी शासकीय वकील म्हणून काम केले नंतर त्यांनी खासगी स्वरूपाने वकिली करण्यास सुरू केले. बंगाल विधानसभेचे ते अध्यक्ष होते. ब्रिटिश शासनाने त्यांना रायबहादूरची पदवीने सन्मानित केले. प्रभावती आणि जानकीदास यांना 6 मुली आणि 8 मुले अशी एकूण 14 अपत्ये झाली. सुभाष हे 9 व्या क्रमांकावर होते आणि मुलांमध्ये त्यांचा 5 वा क्रमांक होता.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या 3



शरद बाबू हे सुभाष यांचे थोरले बंधू असे. सुभाष त्यांना *”मेजदा”* म्हणून हाक लावायचे. सुभाष वर त्यांचा जास्त जीव असे. शरद ह्यांच्या पत्नीचे नावं विभावती होय.

सुभाष यांनी कटक येथील प्रोटेस्टेण्ट शाळेतून प्राथमिक शिक्षण घेतल्यावर रेवेनशा कॉलेजियेट शाळेत प्रवेश घेतले. त्यांच्या प्राचार्यांचे सुभाषच्या मनांवर विशेष प्रभाव पडले. वयाच्या 15 व्या वर्षी सुभाष यांनी विवेकानंद साहित्याचा सखोल अभ्यास केला. 1915 साली त्यांनी 12 वीची परीक्षा आजारी असून द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण केली. 1916 साली बीए करत असताना कॉलेजातील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यामध्ये भांडण झाले. सुभाष यांनी पुढाकार घेतल्याने ह्यांना कॉलेजातून काढण्यात आले.

सेनेत भरती होण्याची यांची तीव्र इच्छा असल्याने 49 व्या बंगाल रेजिमेंट साठी प्रवेश परीक्षा दिली पण त्यात अपात्र ठरले. स्कॉटिश चर्च कॉलेजात प्रवेश घेऊन आर्मीत प्रवेश घेण्याची इच्छा मनात बाळगून ठेवलेली असताना टेरिटोरियल आर्मीची प्रवेश परीक्षा दिली. त्यात यशस्वी होऊन लेफ्टनंट म्हणून फोर्ट व्हिलियम आर्मीत प्रवेश घेतले. त्याच बरोबर 1919 साली बीए (ऑनर्स) परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण केली तर कोलकाता विश्वविद्यालयात दुसऱ्या क्रमांकावर होते.

सुभाष यांच्या वडिलांची इच्छा सुभाषने आयसीएस होण्याची होती. त्यास वयाची अट असल्याने एकदाच परीक्षा देण्यात येईल असे कायदे होते त्यामुळे त्यांनी विचार करून परीक्षा देण्यासाठी 15 सप्टेंबर1919 रोजी ते इंग्लंडला गेले पण तिथे कुठल्याही शाळेत प्रवेश न मिळाल्याने किट्स विल्यम हॉल मध्ये प्रवेश घेऊन 1920 साली आयसीएसच्या परीक्षेत विशिष्ट सूची मध्ये 4थ्या क्रमांकावर उत्तीर्ण झाले. पण त्यांचा मनांवर स्वामी विवेकानंद आणि महर्षी अरविंद घोष यांचे विचार मनावर रुतल्यामुळे त्यांना आयसीएस बनून ब्रिटिशांची गुलामी करणे मान्य नव्हते. यामुळेच त्यांनी आयसीएस पदावरून राजीनामा दिला. त्यांचा ह्या निर्णयाला त्यांचा आईने स्वीकृती दाखवली.

जून 1921 साली त्यांनी मानसिक आणि नैतिक शास्त्रात पदवी घेऊन स्वदेशी परतले. कोलकाताच्या स्वातंत्र्यसेनानी देशबंधू चित्तरंजनदास यांच्या कार्याला प्रेरित होऊन त्यांच्या बरोबर काम करण्याची इच्छा यांनी दाखवली. गुरुदेव रवींद्रनाथ ठाकूर( टागोर) यांच्या सांगण्यावरून भारतात आल्यावर मुंबईत जाऊन महात्मा गांधी यांना भेटले त्यांनी यांना दास बाबूंबरोबर काम करण्यास सांगितले.

त्या काळात ब्रिटिश शासनाविरुद्ध आंदोलन सुरू होते. बंगाल येथे दास बाबूंच्या नेतृत्वात ते सहभागी झाले. 1922 मध्ये दास बाबूंनी कॉंग्रेसच्या अंतर्गत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. सुभाष देशाचे महत्त्वाचे युवा नेते झाले. सुभाष यांनी कॉंग्रेसच्या अंतर्गत युवा स्वातंत्र्य लीगची सुरुवात केली. 1927 साली सायमन कमिशन भारतात आल्याने कॉंग्रेसने त्याचा प्रतिकार केला आणि मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांचे आयोगाची स्थापना करून सायमन कमिशनला उत्तर देण्यासाठी भारतीय संविधान तयार करण्याचे काम सोपविले.

मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली कॉंग्रेसचे वार्षिक अधिवेशन झाले. त्या काळात गांधीजी पूर्ण स्वराज्याशी सहमत नव्हते. त्यांनी या अधिवेशनात ब्रिटिश शासनांकडून औपनिवेशिक स्वराज्य (डोमिनियन स्टेटस) ची मागणी केली. पण त्यांच्या या निर्णयाला जवाहरलाल नेहरू आणि सुभाष यांचा विरोध होता. मग निर्णय घेतले की औपनिवेशिक स्वराज्य (डोमिनियन स्टेटस) साठी 1 वर्षाची मुदत देण्यात येईल. पण ब्रिटिश शासनाने ही अट अमान्य केली. नंतर जवाहरलाल नेहरू यांचा अध्यक्षेत लाहोर येथे कॉंग्रेसचे अधिवेशनात निर्णय घेण्यात आला की 26 जानेवारीचा दिवस स्वातंत्र्य दिवस म्हणून साजरे करणार. पण गांधीजींच्या मताशी असहमत होऊन त्यांनी कॉंग्रेस पक्षाला सोडून स्वतःची…

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंती निमित्त त्यांच्या आयुष्याविषयी ही रोचक सत्ये जाणून घ्या 5


आजाद हिंद फौज“भारतीय राष्ट्रीय शक्तिशाली पार्टीची स्थापना केली. त्यांचा मतानुसार भारताला एक स्वातंत्र्य देश बनविण्यासाठी गांधीजींची…
अहिंसक विचारधारा काही कामाची नाही. ब्रिटिश शासनाशी लढण्यासाठी त्यांनी आजाद हिंद फौज बनवली. सुभाषचंद्र बोस यांनी आपल्या मातृभूमीला इंग्रजांच्या राजवटीपासून मुक्त करण्यासाठी…
“मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन”या त्यांच्या महान शब्दांनी आपल्या सैनिकांना प्रेरित केले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे 1945 मध्ये विमान अपघातात मृत्यू झाल्याचे समजते. ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा देण्यासाठी त्याच्या भारतीय राष्ट्रीय सैन्याच्या सर्व आशा त्यांच्या मृत्यूच्या वाईट बातमीने संपल्या. त्यांच्या मृत्यूनंतरही, तो कधीही न संपणारी प्रेरणा म्हणून भारतीय लोकांच्या अंतःकरणामध्ये आपल्या आवेशी राष्ट्रीयतेसह जिवंत आहे.

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नावाजलेले…
क्रांतिकारक आणि आझाद हिंद सेनेचे (Aazad Hind Sena) सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस* यांची 23 जानेवारी रोजी जयंती आहे. दुसरे महायुद्ध सुरू असताना, इंग्रजांशी लढण्यासाठी, त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली होती. यावेळी त्यांनी दिलेला…
जय हिंद ची घोषणा ही आज भारताची राष्ट्रीय घोषणा बनली आहे. तसेच,
‘तुम मुझे खून दो, मै तुम आझादी दूंगा’* या घोषणेचे स्वातंत्र्य लढ्यात अतीव महत्व आहे.

नेताजी बोस यांचा आयुष्यकाळ हा त्यांच्या कर्तृत्वामुळे स्मरणात राहण्यासारखा ठरला होताच पण त्यांच्या मृत्यूनंतरही भारताची राजकीय भूमी हादरून टाकली होती. आजही त्यांच्या मृत्यासहित अनेक रोचक सत्ये ही गूढ आहेत. यातील काही उदाहरणे आज आपण पाहणार आहोत… चला तर मग जाणून घेऊयात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आयुष्यातील काही न ऐकलेली न वाचलेली वळणे…

नेताजी सुभाष चंद्र बोस हे त्यांच्या कुटुंबातील 9 वे आपत्य होते.

नेताजी यांनी स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होण्याआधी भारतीय सिव्हिल सेवेची सरकारी नोकरी केली होती. या परीक्षेत त्यांचा चौथा रँक होता. मात्र जालियनवाला बाग हत्याकांड नंतर त्यांनी न राहवून स्वातंत्र्याच्या लढाईत सक्रिय सहभाग घेतला.

1921 ते 1941 दरम्यान नेताजी यांना तब्बल 11 वेळा भारतातील वेगवेगळ्या तुरुंगाची वारी करावी लागली होती. तर 1941 मध्ये त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आले होते, इथून पळून त्यांनी रस्तामार्गे कोलकाता तिथून रेल्वेने पेशावर, तिथून थेट काबूल आणि तिथून जर्मनी गाठली होती. तिथे त्यांची अडॉल्फ हिटलरची भेट झाली, सुभाषचंद्र बोस यांना नेताजी म्हणणारा हिटलर हा पहिला व्यक्ती होता.

1934 साली उपचारासाठी म्हणून नेताजी ऑस्ट्रियाला गेले होते, जिथे एमिली शेंकल नामक महिलेशी त्यांची ओळख झाली होती. ही महिला टायपिस्ट होती, पुस्तक टाईप करण्याच्या कामानिमित्त त्यांची या महिलेशी ओळख झाली होती. पुढे 1942 साली त्या दोघांचा विवाह झाला .

1943 मध्ये बर्लिन मध्ये राहत असताना नेताजी यांनी आझाद हिंद रेडियो आणि फ्री इंडिया सेंटर ची स्थापना केली होती.

नेताजी यांनी जगातील पहिली महिला सैन्य दलाची फौज उभारली होती.

नेताजी सुभाष चंद्र बोस हे महात्मा गांधी यांच्या विचारांशी अजिबात सहमत नव्हते, मात्र त्यांचे कार्य पाहून सर्वात आधी नेताजी त्यांनी गांधींना राष्ट्रपिता म्हणून संबोधले होते. त्यांच्या जहाल मतानुसार, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शांततेचा मार्ग कामी येणार नव्हता.

नेताजी यांना दोन वेळेस भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. मात्र तरीही त्यांनी 1939 साली आपल्या पदाचा राजीनामा देऊन फॉरवर्ड ब्लॉक ही संघटना स्थापली होती.

नेताजी यांच्या मृत्यूमागील कथा ही आजही सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलेली नाही. जपान मधील एका हवाई दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. मात्र याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही इतकेच काय त्यांचे शव सुद्धा भारतात आले नव्हते.

1992 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना मरणोत्तर भारतरत्‍न प्रदान करण्यात आले होते. परंतु नेताजींच्या मृत्यूचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने त्यांना मरणोत्तर ‘भारतरत्‍न’ पुरस्कार देणे अवैध आहे असा युक्तिवाद करत हा पुरस्कार काढून घेण्यात आला. दिलेला भारतरत्‍न पुरस्कार परत घेण्याची भारतीय इतिहासातील ही एकमेव घटना आहे.

महात्मा गांधींनी नेताजींचा देशभक्तांचा देशभक्त असा उल्लेख केला होता. असे मानतात, की जर त्यावेळी नेताजी भारतात उपस्थित असते, तर कदाचित भारताची फाळणी न होता, भारत एकसंध राष्ट्र म्हणून टिकून राहिला असता.

नेताजींचा जीवनप्रवास

▪️ 1921 मध्ये इंग्लंडला जाऊन नेताजींनी भारतीय नागरी सेवेची परीक्षेत उत्तीर्ण झाले, परंतु इंग्रज सरकारच्या चाकरीस त्यांनी नकार दिला.

▪️ 26 जानेवारी 1931 रोजी कोलकत्त्यात नेताजींनी तिरंगी ध्वज फडकावत एका विराट मोर्चाचे नेतृत्व करत होते. तेव्हा पोलिसांनी केलेल्या लाठीहल्ल्यात ते जखमी झाले.

▪️ त्यावेळी नेताजी तुरूंगात असताना, गांधींजीनी इंग्रज सरकारबरोबर तह करून सर्व कैद्यांची सुटका करण्यात आली.

▪️ जीवनात नेताजींनी 11 वेळा कारावास भोगावा लागला. सर्वप्रथम 1921 साली त्यांना 6 महिन्यांचा कारावास भोगावा लागला.

▪️ 1938 साली काँग्रेस अध्यक्षपदी नेताजींची निवड केली, याच सुमारास युरोपात दुसऱ्या महायुद्धाचे रणशिंग फुंकले होते.
.
▪️ पक्षाच्या स्थापनेनंतर स्वातंत्र्यं लढा तीव्र केल्याने इंग्रज सरकारने नेताजींसह फॉरवर्ड ब्लॉकच्या सर्व मुख्य नेत्यांना कैद केले.

▪️ नेताजींनी तुरूंगात आमरण उपोषण सुरू केल्याने सरकारने त्यांची सुटका केली. पण त्यांना त्यांच्याच घरात नजरकैदेत ठेवले.

▪️ वेश बदलून नजरकैदेतून निसटल्यानंतर ते रशियाची राजधानी मॉस्को मार्गे जर्मनीची राजधानी बर्लिन येथे पोहचले.

▪️ पूर्व आशियात नेताजींनी स्थायिक भारतीयांना ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असा नारा दिला.

▪️ दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आझाद हिंद फौज माघार घेताना जपानी लष्कराने नेताजींना पळून जाण्यासाठी व्यवस्था केली.

▪️ दुसर्‍या जागतिक महायुद्धातील जपानच्या पराभवानंतर, नेताजींना नवा रस्ता शोधणे जरूरी होते. त्यांनी रशियाकडून मदत मागायचे ठरवले होते.

▪️ 18 ऑगस्ट 1945 रोजी नेताजी विमानातून मांचुरियाच्या दिशेने जात होते. या प्रवासादरम्यान ते बेपत्ता झाले, त्यानंतर ते कधी कुणाला दिसलेच नाहीत.

▪️ 23 ऑगस्ट 1945 रोजी जपानने जाहीर केले कि, नेताजींचे विमान तैवानच्या भूमीवर अपघातग्रस्त झाले, त्या दुर्घटनेत खूपच भाजलेल्या नेताजींचे इस्पितळात निधन झाले.

▪️ नेताजी सुभाषचंद्र बोस कसे व कुठे बेपत्ता झाले? तसेच त्यांचे पुढे नक्की काय झाले? हे भारताच्या इतिहासातील सर्वांत मोठे अनुत्तरित रहस्य बनले आहे.

भारतीय स्वातंत्र्य लढ्यात अग्रगण्य असणाऱ्या…
अशा थोर नेताजी सुभाषचंद्र बोस यांना आज जयंती दिनी विनम्र अभिवादन..!

Leave a Comment