दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
दि. 23/1/2024
न भूतो न भविष्यती समारोह
रामलल्लांची भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा
प्रभू रामरायांची जन्मभूमी श्रीक्षेत्र अयोध्या नगरीत जगातील कोटयावधी लोकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्रीरामलल्लांच्या विलोभनिय अशा बालस्वरुप मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देशातील साधुसंतांच्या उपस्थितीत आणि रामनामांच्या जल्लोषात, मंत्रोचारणात आणि शंख निनादात शंभर प्रकाराच्या वाद्यांच्या ध्वनीत न भूतो न भविष्यती अशा पध्दतीने संपन्न झाला. देशाचे प्रधानमंत्री युग पुरुष नरेंन्द्र मोदी यांच्या करकमलांनी प्रभू रामलल्लांच्या मूर्तीची ऐतिहासीक प्रतिष्ठापना करण्यात आली.
‘राम’ आणि ‘कृष्ण’ हे आपले दोन आदर्श आहेत, आराध्यदैवत आहेत. भारतीय संस्कृतीचे दर्शक आहेत, मार्गदर्शक आहेत, आस्मिता आहेत आणि आचरण मार्गदर्शक सुध्दा आहेत. कृष्णाचा काळ साधारणताः सोडेसात हजार वर्षापूर्वीचा आहे. तर प्रभू रामचंद्राचा काळ किमान पंधरा हजार वर्षापूर्वीचा आहे. तरी देखील रामाचा प्रभाव आपणास जगभर जाणवतो. आपल्या रोमारोमात राम जाणवतो. त्यामुळे प्रभुरामचद्रांचे ‘विश्वव्यापी’ रुप आल्याला जगातील विविध देशांमध्ये दिसून येते. संपूर्ण भारतीयांची अशी धारणा आहे की प्रभू रामचन्द्रांनी आपला देश उत्तरेपासून दक्षीणेपर्यन्त तर भगवान श्रीकृष्णांनी पश्चिमेपासून पुर्वेपर्यंन्त व्यापला आहे, जोडला आहे. आणि राम-कृष्णाची सांस्कृतिक, अध्यानिक परमंपरा ही भारतीयांच्याच नव्हे तर विश्वाचे आत्मस्वरुप आहेत असे म्हणता येईल.
मर्यादा पुरुषोत्तम राम तर प्रत्येक कुटुंबात आदर्श पुरुष मानले जातात. विशेष म्हणजे श्रीराम जन्मभूमी आणि प्रभूश्रीराम हे काल्पनिीक घटनाक्रम किंवा पात्र नसून सत्य अशा इतिहासाचा एक सोनेरी अध्याय आहे. आणि अशा मर्यादा पुरुषोत्तमाचे जन्मस्थानापासून तर देशातील हजारो प्राचीन मंदीराचा विध्वंस परकीय मोघल सम्राटांच्या कालखंडात करण्यात आला. या अखंड भारतातील हजारो मंदीरे तोडून त्यांना भग्न करण्यात आले, आणि त्याठिकाणी मशिदी, दर्गे बांधण्यात आली. धुमट असलेले दर्गे आजही पाडले आणि जमीनीत खोदले तर त्या ठिकाणी महादेवाची प्राचीन मंदीरच सापडतील यात तीळमात्र शंका नाही. त्यामुळे बाबरी मशिद पाडणे आणि त्या ठिकाणी राम मंदीर सापडणे हा निव्वळ योगायोग नाही तर मुघलांच्या अत्याचाराचे, परकीयांची वांरवार होणारी आक्रमणे ही भारतीयांची श्रध्दास्थाने नष्ट करणासाठीच झाली.परकीय आक्रमकांनी अखंड भारतातील मंदीरे तोडली, किल्ले तोडले आणि एकदा नव्हे तर अनेक वेळा आक्रमणे करून भारतीय संस्कृती नष्ट करण्याचा प्रयत्न इस्लामच्या नावाखाली झालेल्या पश्चिमेकडील आक्रमणांमधुन दिसून येतो.
अयोध्येतील श्रीराम मंदीराचा विध्वंस याच मनोवृत्तीतून बाबर सारख्या जात्यांध आणि विषारी मनोवृत्तीच्या आक्रमकाने केला हा इतिहास आहे. परंतू जेव्हा – जेव्हा पृथ्वीवर अन्याय वाढतो, अत्याचार वाढतो, तेव्हा-तेव्हा युगपुरुष जन्माला येत असतात. अयोध्येतील प्रभू रामचद्रांच्या मंदीराचा इतिहास आजचा आमचा विषय नाही. परंतू सव्वा पाचशे वर्षानंतर 22 जानेवारी 2024 रोजी या मंदीराची उभारणी होऊन त्यात श्रीराम प्रभू रामल्लल्लांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पंतप्रधान नरेंन्द्र मोदीच्या हस्ते झाली हा दिवस आणि ही घटना विसरता येणार नाही. येणार्या हजार वर्षापर्यन्त हा इतिहास आता चर्चीला जाईल. 1947 रोजी देशाला स्वांतत्र्य मिळाले आणि सर्व संमतीने सोमनाथ मंदीराचा जिर्णोध्दार झाला. तेव्हाच रामजन्मभूमी मंदीरांची चर्चा सुरु झाली होती. विद्यमान कॉग्रेस सराकरने मात्र तब्बल 60 वर्ष या विषयाकडे मुस्लीम समाजाचे लांगूल चालन करण्यासाठी प्रचंड दुर्लक्ष केले. कदाचित नरेंन्द्र मोदी यांना देशाने दूसर्यांदा निवडून दिले नसते तर राममंदीर निर्माणाच्या प्रश्नाला गती मिळाली नसती.

1949 या वर्षी रामजन्मभूमीवर प्रभू रामचन्द्राच्या मूर्ती प्रकट झाल्या. 1986 मध्ये मंदीराची कुलपे न्यायालयाच्या निर्णयाने उघडली गेली. आणि यानंतर 2010 मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निर्णय आला आणि कारसेवकांचा सातत्यपूर्ण लढा सुरु झाला. 1992 मध्ये बाबरीचा ढाचा दैवीशक्तितून पडला. आणि 1 नोव्हेंबर 2019 मध्ये 134 वर्षाचा न्यायालयीन लढा सर्वोच्च न्यायालयाच्या अभ्यासपूर्ण आणि सर्व तथ्य पारखून दोन्ही पक्षांच्या भावनांचा आदर करत राममंदीर निर्माणाच्यासाठी देण्यात आला. तो एक ऐतिहासिक क्षण आणि 22 जानेवारी 2024 या दिवशी झालेल्या रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा कालचा ऐतिहासीक क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले गेले. अवघ्या चार वर्षात जगातील भव्य-दिव्य अशा या ऐतिहासीक, धार्मिक, सांस्कृतीत,अध्यात्मिक मंदीराची उभारणी करण्यात आली. याचे संपूर्ण श्रेय हे महत्वाकांक्षी आणि समस्त देशवासियांच्या भावनांचा आदर करणारे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांच्या धाडसी निर्णयातून करण्यात आली. आणि त्यांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा देखील संपन्न झाला. यावेळी जी भव्यता होती, जी दिव्यता होती, जे अलौकिक स्वरुप सोहळयाला प्राप्त झाले होते त्याला नरेन्द्र मोदींच्या अमोघ वाणीतील भाषणाने मुकुट चढविला. देशातील बुध्दीमान , भाषणांचा एक नमुना म्हणजे प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी यांचे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यातील ऐतिहासीक भाषण होते. त्यांच्या भाषणाची भाषा अलोकिक तर होतीच परंतू त्या संपूर्ण भाषणात राजकीय गंध त्यांनी येवू दिला नाही हे कौशल्य त्यांनी वापरले.

मोहन भागवत यांचे भाषण हे ज्या प्रकारचे असायला हवे होते, जे सरसंघचालकांना शोभून दिसले असते तसे अजिबात नव्हते. मोदींवर अप्रत्यक्ष टीका त्यांच्या भाषणातून दिसत होती. तर गांधींचे नाव त्यांना यावेळी घ्यावे लागले हे देखील नोंद करण्यासारखे आहे. परंतू आपल्या अमोघ वाणीतून नरेन्द्र मोदी यांनी जगातील सर्व रामभक्तांना मंत्रमुग्ध केले. आणि त्यांच्या भाषणामुळे येणार्या लोकसभेत ‘400 के पार’ हे मिशन पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही अशा प्रतिक्रीया देशभर सुरु झाल्या. अतिशय शिस्तबध्द पध्दतीने कोणताही गोंधळ न दिसता कार्यक्रमांची रुपरेषा या सोहळयात दिसून आली. देशातील सर्व सेलीब्रीटी सर्व क्षेत्रातील मान्यवरांसह देशातील सर्व मठातील सर्व पंथाचे – धर्माचे मठाधिश साधुसंत या अलौकिक सोहळयाला आर्वजून उपस्थित होते.
म्हणून हा सोहळा न भूतो न भविष्यती अशा प्रकारच्या संपन्न झाला. देशातील 140 कोटी जनतेने या सोहळयाचा आनंद घेतला. देशातील गावागावात, घराघरावर दिवे, पताका, आकाशकंदील, गुढ्या उभारून अंगणात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या संपूर्ण देशातील जनतेने यासोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला. आणि संपूर्ण देशात जय श्रीरामचा घोष निनादू लागला. खर्या अर्थाने प्रभू रामचंद्रांचा पुन्हा एकदा जन्म होवून या पृथ्वीवर त्यांचे आगमन झाले अशा प्रकारची अनुभूती रामभक्तांनी घेतली. जय श्रीराम, जय जगत.
तुर्तास एव्हढेच.