बच्चू नावाचा बाप आणि कडू आडनावाचा गोड माणूस आ बच्चूभाऊ कडू

बच्चू नावाचा बाप आणि कडू आडनावाचा गोड माणूस आ बच्चूभाऊ कडू

बच्चू नावाचा बाप आणि कडू
आडनावाचा गोड माणूस,
आ. बच्चूभाऊ कडू!

आ. बच्चूभाऊ कडू हे नावं आता महाराष्ट्राच्या घरा घरात पोहचले आहे. आक्रमक नेता म्हणून.


जे का रंजले गांजले त्यासी म्हनी जो आपुले.
ही तुकाराम बुवाची उक्ती जीवनात उतरवून दाखविणारा सच्चा लोकनेता म्हणजे बच्चू भाऊ कडू.


गोर,गरीब, उपेक्षित, शेतकरी, शेत मजूर यांच्यासाठी आक्रमक लढे देऊन वंचिताच्या पदरात न्यायाच मापं टाकणारा नेता म्हणजे बच्चू भाऊ. जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी भाऊंनी प्रहार जनशक्ती संघटना उभी केली. तीला अजून पक्ष म्हणून मान्यता मिळाली नसल्याने भाऊ या पक्षाच्या नावाने निवडून येत असले तरी ते अपक्ष म्हणून गणले जातात.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर हा त्यांचा मतदार संघ. भाऊ इथून चार वेळा आमदार म्हणून निवडून आले. पहिली निवडणूक त्यांनी केवळ वयाच्या 30 व्या वर्षी जिंकून दाखविली. त्यांच्या मतदार संघात मूळचे अहिराणी भाषिक नंद गवळी समाजाचे काही नागरिक असल्यामुळे त्यांच्या बद्दल मला नेहमी आपुलकी वाटत आली आहे.

दिव्यांग या अत्यंत उपेक्षित वर्गावर प्रकाश टाकण्याच काम प्रथम भाऊंनी केले. आज त्यांच्यासाठी स्वतंत्र दिव्यांग खात सुरु करून दिव्यग्यांच्या प्रश्नाना भाऊनी वाट करून दिली आहे.भाऊ महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे मंत्री मंडळात राज्यमंत्री होते, तेंव्हा त्यांच्याकडे, जलसंपदा वं लाभ क्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला वं बाल विकास, ईतर मागास वर्ग, सामाजिक वं शैक्षणिक मागास प्रवर्ग, भटक्या जमाती वं विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, आणि कामगार एवढी भरपूर खाती होती. आता ते महायुतीच्या शिंदे सरकार सोबत आहेत. म्हणजे शरद पवार यांच्या विरुद्ध गटात बच्चू भाऊ आहेत.

शरद पवार साहेब यांच्या राजकीय कारकिर्दी बद्दल अनेक वादविवाद असले तरी पवार साहेब देशाच्या राजकारणातील एक मान्यवर नेते आहेत. सर्वात वयानी जेष्ठ आहेत. राज्यात सर्वांनां त्यांच्या बद्दल आदर आहे. तर असे हे पवार साहेब त्यांच्या विरोधी गटात असलेल्या बच्चू भाऊला भेटायला भाऊंच्या घरी गेले. ही घटना भाऊंच श्रेष्ठ कर्तृत्व दाखवायला पुरशी आहे.

दोघांची भेट झाली, चांगली चर्चा झाली. सध्या महायुती सोबत भाऊंचे सलोख्यांचे संबंध राहिले नाहीत. भाऊ या सरकारवर नाराज आहेत. अशा पार्श्वंभूमीवर शरद पवार आणि भाऊ यांची भेट झाली. या भेटी नंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यात पत्रकारांनी विचारले आपण महायुती सोडून पवार साहेबा सोबत जाणार का? त्यावर भाऊ म्हणाले, नाही! शब्द दिला आहे मी शिंदे साहेबाना. जो पर्यंत शिंदे साहेब मुख्यमंत्री पदावर आहेत, तों पर्यंत माझा पाठिंबा महायुती सरकारलाच राहील. असा सच्चा माणूस म्हणून मला त्याच्यावर त्यांच्या कर्तबगारीवर लिहावस वाटले.

वाटलं बच्चू नावं असलेले बाप आणि कडू आडनाव असलेला गोड नेता म्हणजे बच्चू भाऊ कडू!भाऊ शतायुषी व्हा! शेवट पर्यंत रंजल्या गांजल्यांची पाठ राखण करत रहा.

खान्देशनी माटीमां बी असा हिरा पैदा होवो नी त्यांनी खान्देश इकासनां अनुशेष भरी काढो. माय खान्देशनां पांग फेडो!
बापू हटकर

Leave a Comment