७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

७ व्या अ.भा.अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन

खान्देश साहित्य संघ, धुळे व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि सांस्कृतिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने २५ रोजी नेर येथे सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन होत आहे. रविवारी (दि. १८) संमेलनाच्या लोगोचे प्रकाशन व संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

प्रारंभी खान्देश साहित्य संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. सदाशिव सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकात संमेलनाची रूपरेषा सांगितली. सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनात ग्रंथदिंडी, उद्घाटन सत्र, काव्यगाण, परिसंवाद, कथाकथन व कवी संमेलनाचे चार सत्र होणार आहेत.

बैठकीच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक जगदीश दादा देवपूरकर होते. संपर्क कार्यालयाचे उद्घाटन आ. कुणाल पाटील कार्यालयाचे अधीक्षक तथा साहित्यिक प्रकाश पाटील यांनी केले. लोगोचे प्रकाशन प्रकाश तात्या पाटील, विश्राम बिरारी, शाहीर श्रावण वाणी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी संमेलनाच्या बोधचिन्ह संदर्भात प्रकाश पाटील यांनी सांगितले की, खान्देशी ओवी वाङमय, साहित्य, कृषी संस्कृती, ऐतिहासिक किल्ल्यांचा ठेवा व लोकसंस्कृतीचा आरसा आहे.

बैठकीस रमेश आप्पा बोरसे (धुळे), तालुकाध्यक्ष शाहिर श्रावण वाणी (अमळनेर), तालुकाध्यक्षा सुनीता पाटील (चाळीसगाव), तालुकाध्यक्ष विजय निकम, कमलेश शिंदे, रत्नाकर पाटील, गुलाबराव मोरे, गोकुळ पाटील, प्रभाकर सूर्यवंशी, मोहन वाणी, रमेश पवार, रामदास जगताप आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बोधचिन्ह आपल्या कलेतून रेखाटणारे

कवी/चित्रकार/साहित्यिक खान्देश कलारत्न दिनेश चव्हाण यांनी सातवे अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे आपल्या कलेतून रेखाटण केले आहे.नुकतेच त्यांना दादासाहेब फाळके कलारत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे.त्याच बरोबर त्यांनी नुकत्याच पार पडलेल्या मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे भरीव कामगिरी केली आहे त्याबद्दल त्यांना मराठी साहित्य संमेलनात गौरवण्यात आले आहे