97 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन

97 वे अखिल भारतीय मराठी साहित्यसंमेलन

परवा मी नगरहून आळेफाटामार्गे माळशेज घाटातून कल्याण जात होतेा. मला ऑन लाईन झूम मिटींची लिंक व्हाट्सॲपवर आली व मी ती जॉइनही केली. मात्र मध्ये मध्ये घाटात रेंज ये – जा करीत संवाद साधला. धुळ्याच्या खान्देश् साहित्यसंघ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. सदाशिव सूर्यवंशी व काही पदाधिकारी यांची चर्चा सुरू होती. त्यातील सूर असा होता की , ‘’ या हाउ घातलेल्या 97 व्या साहित्यसंमेलनावर बहिष्कार टाकायवाचा. खानदेशात होत असलेले साहित्यसंमेलन अहिराणी आणि खानदेश यांना काही स्थान देत नसल्याने हा बहिष्कार’’ मग मी मला माहित असलेली माहिती व माझे मत मांडले. ‘’ खानदेशातील या साहित्यसंमेलनासंबंधित सदस्यांनी मला जी माहिती दिली ती अशी की अहिराणी आणि खानदेशी संस्कृती यासाठी स्वतंत्र पाच तास दिलेले आहेत.

शिवाय खानदेशातील बोलीवर परिसंवादही आयोजित केलेला आहे. आणि आपली बहिष्काराची भूमिका मला पटलेली नाही. उलट काय हवे आणि काय नको हे आपण् सूचविले पाहिजे. शिवाय साहित्यसंमेलनासाठी जे जे जातील त्यांनी त्यांनी अहिराणी व खानदेश बाबत आपली भुमिका मांडावी. त्या मिटींगचे रेकॉर्डिंग ही आहे असे अध्यक्षांनी सांगीतले. मात्र बोलणारांचा सूर हा माहितीच्या अभावातूनच उमटलेला होता. रेंज नसल्याने मला पूर्ण सहभाग नोंदविता आला नाही.

त्या नंतर दुसरे दिवशी संमेलनाच्या कार्यक्रमा विषयी विस्तारित बातमी आली. मात्र तरीही अहिराणी किंवा खानेदशची संस्कृती यासाठी कुठे स्थान आहे हा खुलासा कळणारा नव्हताच. तरी ती मी बातमी शेअरही केली आणि ते स्थान मिळावे अशी अपेक्षाही व्यक्त केली.


त्या नंतर संमेलन आयोजन समितीच्या सदस्यांनी फोन वरून माझ्या त्या पोस्टवर आधारीतचा गैरसमजही दूर केला. तीन दिवस चालणा-या या साहित्य संमेलनात अहिराणी आणि खानदेश यासाठी भरपूर वेळ दिलेनला आहे. खानदेशातील विविध बोलीवर स्वतंत्र चर्चासत्र, स्मरणीकेत खानदेशातील साहित्यिकांचे लेख, कवी कट्यावर खानदेशातील कवी अशा जवळजवळ 30 ते 35 साहित्यिकांना सामावून घेतलेले आहे हे कळले. या शिवाय स्वतंत्र असा खानदेश कट्टा हा पाच तासासाठी असेल हे ही कळले. म्हणून धुळ्याच्या या खानदेश साहित्यसंघाच्या बहिष्काराच सूर हा अनाठाई आहे असे लक्षात आले. कारण हे अमंळनेर मध्ये होउ घातलेले 97 वे मराठी साहित्यसंमेलनाने इतिहासात खानदेशातील साहित्यिकांना प्रथमच एवढे स्थान दिल्याचे दिसते. आजवर एखादा कवी, एखादा परिसंवादासाठीचा वक्ता असायचा. अन येथे तर स्वतंत्र पाच तासाच्या खानदेश कट्टा शिवाय इतरत्रही खानदेश्यातील साहित्यिकांना सामावून घेतलेले आहेच. उलट आता खानदेशवासियांनी बहिष्काराची भाषा न वापरता मोठ.या जल्लोशात सामील व्हायला हवे. हे काही खानदेशातील अहिराणी साहित्यसंमेलन संमेलन नाही तरीही यात खानदेशातील साहित्यिकांचे मोठा सहभाग आहे.


मी चाळीसगांव मध्ये मार्च 2000 मध्ये पार पडलेल्या तिस-या अहिराणी साहित्यसंमेलनाचा अध्यक्ष होतो. (माझा बोर्ड पेपर्स तपासण्याच्या कामामूळे अध्यक्ष्पदासाठी स्पष्ट नकार असतांनाही) त्यावेळी झालेल्या ठरावात, असल्या मराठी साहित्यसंमेलनासाठी या संमेलनाच्या अध्यक्षांना सन्मानाने बोलवावे असाही ठराव होता . मात्र मला आजवर गेली तेविस वर्षे कोणत्याही संमेलनाचे निमंत्रण नव्हते. आणि मी आजवर कोणत्याही अखिल मराठी साहित्यसंमेलनासाठी कुठेही उपस्थित नव्हतोही. असे असतांनाही मला या होवू घातलेल्या 97व्या संमेलनासाठी निमंत्रित आहे हे संयोजकांकडून कळाले. जे जे या संमेलनात सहभागी असतील त्यांना त्यांना यथावकाश निमंत्रणेही मिळतीलच. मात्र खानदेशातील साहित्यिकांचे वेगळे असे संघटनाद्वारे गैरसमज कुणीही पसरवू नये असे मला तरी वाटते.

प्रत्येक संमेलनात वादविवाद हे होतचं असतात. हा विद्रोह ठरलेला असला तरी त्यात आता गैरसमजावर आधारित वेगळ्या बहिष्काराची जोड नको. 2000 मध्ये चाळीसगांवच्या तिस-या अहिराणी संमेलनातही प्रस्तापित राजकारण्यांचं संमेलन अशी टिका झालीच होती. तसेच 2011 मध्ये नासिक येथे तब्बल अकरावर्षानंतर पार पडलेल्या चौथ्या अहिराणी संमेलनातही ते जातीवादी ठरवून बहिष्काराची व ते उधळून लावण्याची भाषाही काही खानदेश्यातीलच साहित्यिकांनी वापरली होती. आता असली भाषा वापरणारे सर्व परिचित आहेत।


अहिराणी साहित्यसंमेलनाची किंवा विद्रोही साहित्यसंमेलनाची निर्मितीच मुळात अशा डावलण्यातूनच झालेली आहे. मात्र आता मराठी साहित्य् संमेलने ही आपल्या शतकपुर्तीच्या उंबरठ्यावर अंमेळनेरच्या भूमीपासून बोलीसाठी स्वंतंत्र स्थान देवून आणि स्थानिक कलाकारांना , साहित्यिकांना जास्तीचे स्थान देवून नवा पायंडा घालीत आहे, जे आधी कधिही घडलेले नाही. असेही लक्षात येते आहे. कदाचित या संमेलना पासून सानेगुरूजींच कार्यभूमीत विद्रोह आणि बहिष्कार हे शब्द हद्दपार होतील अशी अपेक्षा बाळगू या.


उपरोक्त् मते ही माझी वैयक्तिक मते आहेत. मी कोणत्याही संस्थेशी अथवा संमेलना आयोजकांशी संबंधित नाही


डॉ. रमेश सूर्यवंशी
अभ्यासिका
वाणी मंगल कार्यालया समोर,
कन्नड् जिल्हा छत्रपती संभाजीनगर
8446432218

Leave a Comment