97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले
97th Sahitya Sammelan was held and history was made
97 वे साहित्य संमेलन झाले,
इतिहास घडवून गेले!
पूर्वार्ध
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अंमळनेर येथे दि 2, 3, 4 फेब्रुवारी 2024 लां पार पडले. अंमळनेर ही खान्देशची सांस्कृतिक राजधानी आहे. या पूर्वी इथे 35 वे संमेलन ई स 1952 साली झाले होते. त्यानंतर तब्बल 72 वर्षाने हे 97 वे अधिवेशन होतं आहे.
35 हे वय अनुभवी तारुण्यांचे असतें. म्हणून अंमळनेर येथील 35 व्या संमेलनाच्या वेळी मराठी भाषा अत्यंत तारुण्यांच्या बहरात होती. एकापेक्षा एक सरस साहित्यिक त्या काळात होते. त्यांत आचार्य अत्रे यांच्या पिढीतील मोठमोठे सर्वं साहित्यिक हजर होते. त्या संमेलनाचे अध्यक्ष स्व कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी हे होते.
आताच्या 2024 मधील 97 व्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत रवींद्र शोभणे. 97 वे संमेलन म्हणजे शतकाच्या उंबरठ्यावर उभे असलेले हे संमेलन आहे. वयाच शतक पूर्ण केलेला माणूस अत्यंत परिपक्व असतो. पिकलेल्या गोड आंब्या सारखा. तारुण्याची पस्तीशी आणि शतका जवळची परिपक्व झालेवी 97 वी असे दोन शुभ वयाचे अंक अंमळनेरलां मिळाले हे अंमळनेरकराचे परम भाग्य आहे.
97 या अंकाची फोड मी करतो ती अशी, सत्या+नवे. सत्य आणि नवे. 97 वे संमेलन सत्य आहे आणि नवे आहे.
सत्य हे आहे कीं, महाराष्ट्रात अनेक लोककला आहेत, मनमोहक, आकर्षक, रंजक, लोभस कला आहेत. त्यात तमाशा ही कला तर लोककलेची महाराणी आहे. या लोककलाना अ भा मराठी साहित्य संमेलनानी 96 वर्ष लांब ठेवले. कधी शिवून घेतलं नाही. पण साने गुरुजींच्या अंमळनेर मधील 97 व्या संमेलनाने नवं रूप दाखवत या परंपरेचा चक्रव्युहं भेदून लोककलानां संमेलनात सामावून घेतले. हे नवे पर्व आहे. हेच ते सत्य+नवे=97 संमेलन.
मराठी साहित्य संमेलनानें हे ऐतेहाशिक वळण घेतले
अंमळनेर शहरात हां नवा इतिहास घडला. लोक कला, लोक संगीत, लोक नृत्य यांना दालन खुले केले. ही साहित्य क्षेत्रातील क्रांती आहे. ही परंपरा पुढे अशीच टिकवून ठेवली पाहिजे. यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. गरज पडल्यास साहित्य महामंडळाला सांगून तशी घटना दुरुस्ती करावी.
हां इतिहास घडवायला कारणीभूत ठरले ते मां डॉ अविनाश जोशी. अंमळनेर मराठी वांगंमय मंडळाचे ते अध्यक्ष आहेत आणि ते या संमेलनाचे मुख्य प्रवर्तक आहेत. डॉ आणि त्यांचे सर्वं सहकारी यांनी हिमतीने हे सर्वं घडवून आणले.
डॉ जोशी साहेब आणि मी एकमेकांच्या परिचयाचे नाहीत. गिरडच्या एका कार्यक्रमात मी आणि डॉ साहेब एका स्टेजवर आलो. तिथे त्यांनी माझं 5 मिनिटांचं भाषण ऐकलं आणि त्यांनी माझं अहिराणी व्याख्यानं अंमळनेर येथील शारदिय व्याख्यान मालेत ठेवलं. ते सर्वं रसिकाना आवडलं. त्यातून मराठी वांगंमय मंडळातील सर्वं मंडळीशी परिचय झाला. आमच्यात परिचयां सोबतच स्नेह आणि विश्वास निर्माण झाला.
झालेल्या ओळखीचा फायदा घेत मी डॉ जोशी साहेबाना विनंती केली. डॉ साहेब खांदेशात मोठमोठे साहित्यिक होऊन गेले ते विस्मृतीत गेले आहेत. सोन्या सारख्या अनेक लोककला उपेक्षित आहेत. स्वतःची वेशभूषा आहे. संगीत आहे वाद्य आहेत. नृत्य आहे. विविध रंगीं कला आहेत. संमेलन खान्देशांत आहे त्याचं निमित्त साधून या सर्वं कला आपण यात सादर केल्या तर?
डॉ साहेबानी मला त्वरित होकार दिला. त्याप्रमाणे कामाला सुरवात झाली. प्रा रमेश धनगर आणि माझ्यावर या कामाची जबाबदारी टाकली. आम्ही सर्व लोक कलाकारांशी संपर्क साधला. तमाशा कलावंत शेषरावंनां गोपाळ वं सौं सुनंदा कचूरे, शाहीर शिवाजीराव पाटील पोवाडा, विनोद ढगे वही गायन, जागरण गोंधळ कलाकार परशुराम सूर्यवंशी, आदिवाशी पावरी नृत्य कलाकार प्रवीण पवार, टिंगरी वाले भिका भराडी, बंजारा नृत्य संगीता जाधव आणि त्यांच्या सहकारी महिला यांनी सहभाग नोंदवीला. या सर्वांनी कोणतेही मानधन नं घेता केवळ प्रवास खर्च घेऊन उत्तम प्रकारे आपली कला इथे सादर केली. तशी ही सर्वं मंडळी समाजातील गरीब स्तरातील आहे. त्यांचं पोट त्यांच्या कलेवर आहे. त्यांनी केवळ खान्देशची अस्मिता जागृत ठेवून निशुल्क कला सादर केली.

या कार्यक्रमाच वैशिष्ट्ये म्हणजे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आणि दाद होती. सर्वं खुर्च्या भरून तीनही बाजूला लोक उभे राहून कार्यक्रम बघत होते.
शेषरावनानां गोपाळ यांच्याकडे मी खंत व्यक्त केली कीं, नाना या उपाशी कलावंताना मी भाड्या व्यतिरिक्त काही देऊ शकलो नाही. तेंव्हा शेषरावं नानानी माझ्या पायाला हात लावत बोलले, बापू तुम्ही आम्हाला परके समाजता का?त्यांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या होत्या. तसें ते म्हणाले, आम्ही खांदेशाच्या मातीत जन्माला आलो आहोत. तमाशातील आमच्या आधीच्या पिढ्यानी शाक भाकरिवर तमासे सादर करत ही कला जिवंत ठेवलआहे. आम्ही सुद्धा त्यांच्याच पोटी आणि खान्देशच्या मातीत जन्म घेतला आहे. या मातीच ऋण थोडं फेडता आलं त्यापेक्षा मोठं मानधन नाही बापू.
मी काही स्थानिक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सोबत घेऊन फक्त दीड दिवसांत कर्ण जन्मावर एक 15 मिनिटाची नाटिका सादर केली. त्यात खान्देशी जात्यावरील गाणी, वीरनृत्य, 12 पावली नृत्य, भिल्ल नृत्य, शेतकरी महिला नृत्य यातून संपूर्ण कथा आणि महाभारत युद्ध सादर केले. यात सौं वसुंधरा लांडगे मॅडम यांनी गाणी म्हटली.
रमेश धनगर सर यांच्या पत्नी सौं मृणालिनी धनगर या गिरड येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षिका आहेत. त्यांनी त्याच्या शाळेतील शिक्षिका घेऊन लग्नाची गाणी सादर केली. प्रेक्षक खूप खुश झाले. भरभरून प्रतिसाद दिला. मी कोणाशी तुलना करणार नाही. पण खान्देशी कला आणि कलाकार यांनी संमेलनात यशाच शिखर गाठलं होतं. रसिका प्रेक्षकांच्या काळजात ते शिरले होते.
पर्वताच्या पायथ्या पासून शिखराकडे जाण्याचा प्रवास तसा सोपा नसतो. पायाला काटे, खडी, टोचत असतें. उन्हाने पाय भाजत असतात. निसर्ड्या दगडा वरून घसरल खाली खोल दरीत कोसळून मृत्यूसी गाठ असतें. मधूनच सरपटणारे साप विंचू रस्त्यातून सरपटत येतात. प्रसंगी लांडगे, चित्ते, गवे, गेंडे यांच्यासी सामना करावा लागतो. रस्त्याच्या दुतर्फ ओरखडे ओढणाऱ्या आरकाट्या बोरकाट्या असतात. कधी हे ओरखडे आपल्याला रक्तबांबळ सुद्धा करतात. तरीही आपण चालत रहातो.
या सर्वावर मात करून जेंव्हा आपण उंच शिखर गाठतो तेंव्हाचा आनंद मात्र आवर्णनिय असतो. शिखरांच्या उंच स्थळावरून जेंव्हा सभोवताली बघतो तेंव्हा कळते कीं, डोळ्यांना आनंद आणि गारवा देणार हिरवरान सर्वत्र पसरले आहे. आणि हिरव्या गच्च वानराईच्या केंद्र स्थानी आपण उभे आहोत. या सुखाच्या क्षणी खडतर वाटेतील काटे पेटे आणि दगड गोट्याचं विस्मरण होतं. आपण विस्मरण म्हणत असलो तरी ते आत कुठे तरी बोचत असतात. आपल्या जवळच्या माणसांकडे तेही सांगून आपलं मन मोकळ करावंसं वाटत. कारण या बोचऱ्या काट्या मुळे, खान्देशी खाद्य संस्कृती, खान्देशी वेशभुषा, आणि मुख्य म्हणजे दिग्ज खान्देश साहित्यिकाना प्रकाशात आणता आलं नाही ही सल आहे काळजात. बघू या पुढच्या भागात.
क्रमश:
बापू हटकर

2 thoughts on “97 वे साहित्य संमेलन झाले इतिहास घडवून गेले”