जय जवान – जय किसान – जय विज्ञान..!
सत्तेत असलेल्या व्यक्ती व त्यांच्या पक्षाची ध्येयधोरणेच देशातील व राज्यातील लोकांच्या विकास व अधोगतीला कारणीभूत ठरतात हाआजपर्यंतचा अनुभव.
कदाचित मागिल सरकारला विकास जमला नाही म्हणून हे सरकार सत्तेवर आले. पण सत्ताधारी पक्षात पण काही शेती करणारे शेतकरी असतात. त्यांनी देखील वरीलपैकी कांदा, कापूस, सोयाबीन इत्यादी शेतमालाची शेतात लागवड केलेली असेल. त्यांचे अभिप्राय घ्या. सत्य काय ते कळेल…!
सर्वात महत्त्वाचे आपल्या शेतकरी बंधू भगिनींनो याविषयावर चर्चा करणे आवश्यक आहे. ११ वर्षांपूर्वी कापसाला प्रती क्विंटल रु. ५०००/- ते ९०००/- भाव होते. आज ११ वर्षांनी देखील कापसाला ७०००/- प्रती क्विंटल पेक्षा कमी भाव मिळत आहे. मात्र महागाई व शेतकऱ्याचे उत्पादन खर्च हा तिपटीने वाढला.
तसेच आज शेतीसाठी पाण्याचा प्रश्र्न आ वासून उभा आहे. आपल्या भागातून अनेक टीएमसी पाणी दरवर्षी वाहून जात. त्यावर सरकार लक्ष देत नाहीं.आपल्या जनतेलाही त्याच काही सोयर सूतक वाटत नाही. मूठभर लोक पोट तिडकिने प्रयत्न करतात बाकीचे तिकडे फिरकत ही नाही.ही उदासीनता भविष्यातील वारसांना अंधकरकडे नेत आहे अस वाटत. आपण आपल्या हक्काच्या पाण्यासाठी लढण काळाची गरज आहे.त्यासाठी त्यावर चिंतन मंथन सुरूझाले पाहिजे. पाणी आल तर शेती बारमाही होइल. रोजगानिर्मिती होईल कंपन्या येतील, आपल्या पोरांना बारमाही रोजगार उपलब्ध होतील.शेवटी शेतकरी हा आपल्या शेतीप्रधान देशाचा कणा आहे. तो कोलमडला तर देश कोलमडेल…! म्हणून शेतकरी वाचला पाहिजे. त्यांना बारमाही रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आपणच यावर चर्चा करणार नसू तर कुठलाही नेत्या कडून काय अपेक्षा करणार. कारण रडल्या शिवाय आई पण दूध पाजत नाहीं हे कायम लक्षात ठेवा.
जय जवान – जय किसान – जय विज्ञान..! हीच त्रिसूत्री जगाच्या प्रगतीची आहे.
धन्यवाद…..!
आपला स्नेहांकित
विकास पाटील
अध्यक्ष
उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ
उत्तर महाराष्ट्र जल परीषद
जागतिक अहिराणी भाषा संवर्धन परिषद
कान्हदेश चेंबरस ऑफ कॉमर्स