योग्य उमेदवाराची निवड म्हणजे

योग्य उमेदवाराची निवड म्हणजे

बेधडक…रोखठोक…जनसामान्याच्या प्रश्न योग्य उमेदवाराची निवड म्हणजे
देश बलशाली करणे! भारताने लोकशाही प्रणाली स्वीकारून जनतेच्या हाती शासन
निर्माण करण्याची ऊर्जा दिली आहे. सरकार कसे असावे हे जनता जनार्दन मतपेटी द्वारे
निवड करते. याचा अर्थ जनतेच्या
मतदानात किती पॉवर आहे हे सिद्ध होते. जनता विचारपूर्वक
मतदान करते या बद्दल शंका नाही. सत्तेत येणारे लोकप्रतिनिधी
देश प्रेमी , त्यागी असले तर देशाची अर्थव्यवस्था वेगाने सुधारते.विश्वात देशाची मान उंचावते. विश्व देशाकडे मोठ्या अपेक्षेने पाहत असते. यासाठी योग्य
प्रतिनिधी निवडून येणे तेवढेच
गरजेचे आहे.भारताचा विचार
केला तर अनेक लोकप्रतिनिधी
वर गुन्हे दाखल झालेले असतात.
काही गुन्हेगार प्रवृत्तीचे असतात.
काही  खुनाच्या आरोपाखाली
तुरुंगात जाऊन आलेले असतात.
काही धर्मांध सुद्धा असतात. असे
लोकप्रतिनिधी शासनात असेल
तर जनतेचा लोकशाहीवरील विश्वास डळमळीत होतो. त्यांच्या
कारभारावर जनता नाराज असते.आपल्या लोकशाहीत अनेक दोष
आहेत. जनता अशिक्षित आहे, जनसंख्या अफाट आहे, बेकारी मोठ्या प्रमाणात आहे, अनेक
नागरिकांना पोटभर अन्न मिळत
नाही. त्यामुळे त्यांना लोकशाही असो वा एकाधिकार शाही काहीही फरक पडत नाही. जनतेच्या मूलभूत गरजा भागविणे हे प्रत्येक राष्ट्राचे आद्य
कर्तव्य आहे. या गरीब परिस्थितीचा लोकशाहीत खूप
दुरुपयोग केला जातो. उमेदवार
यांना अनेक प्रकारच्या भेटी देऊन
मते वळविण्याचा या करत असतात. अनेकदा अवैध व्यवसाय करणारे प्रतिनिधी म्हणून निवडून येतात. असे प्रतिनिधी देशाच्या प्रतिमेला तडा देतात. अवैध व्यवसाय वाढीला
लागतो. म्हणून जनतेने मतदान करतांना
खूप विचार करून योग्य उमेदवारीची निवड करावी. त्याचे पूर्व चारित्र्य, वागणूक , व्यवहार
यांचा अभ्यास करणे आवश्यक आहे. देश प्रेम व निष्ठा ,त्यागी
वृत्ती असणे गरजेचे आहे. अशी
व्यक्ती देश प्रगती साठी जागृत
असते. समाज एकता राखणे
हे लोकप्रतिनिधींचे आद्य कर्तव्य आहे. आपल्या देशात जातीय दंगली लोकप्रतिनिधी मुळे होतात
असा अहवाल आहे. केवळ प्रसिद्धी व महत्त्व वाढीसाठी
असंबंध वक्तव्ये करून समाजात
दंगली घडवून आणतात. असे
प्रतिनिधी  देशास घातक ठरतात.लोकशाही यशस्वी होण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या कामकाजावर
अवलंबून असते. देशात, समाजात एकता राखणे यासाठी
प्रतिनिधींनी प्रयत्नशील असणे
गरजेचे आहे.देशातील परिस्थितीचा अभ्यास असणे आवश्यक आहे. सभागृहात देशातील प्रत्येक
समस्येवर प्रश्न विचारून त्यावरील
उपायांची माहिती घेणे गरजेचे आहे. जनतेच्या मूलभूत गरजा
पूर्ण होतात की नाही याचा अभ्यास करून सभागृहाला माहिती देणे आवश्यक आहे. यासाठी प्रतिनिधी अभ्यासू वृत्तीचा असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्या मतदार संघातील
समाजाच्या अडचणी सोडवून
त्यांस मार्गदर्शन करणे गरजेचे आहे.देशातील बहुतेक जनता अजून बरीच अशिक्षित असल्याने त्यांस
शासनाच्या समाजकल्याण योजनेची माहिती उपलब्ध करून
देणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे.एकंदरीत लोकप्रतिनिधींचा अभ्यास केल्यास निवडून आल्यावर अचानक त्यांची आर्थिक स्थिती भक्कम होते.
याचा अर्थ अवैध मार्गाने व भ्रष्टाचार करून धन संपत्ती गोळा
केलेली असते हे आपण जाणतोच! अशा उमेदवारांना नेहमी दूर ठेवावे. कारण हे
प्रतिनिधी म्हणजे समाजाला व देशाला लागलेली कीड आहे.
यांच्यामुळे समाजात अनैतिकता
निर्माण होते.देशात अनेक प्रकारचे लोकप्रतिनिधी आहेत. पण केवळ
प्रतिनिधी असणे उपयोग नाही. असे अनेक लोकप्रतिनिधी आहेत
की ते केवळ एक व्यवसाय किंवा
धंदा व मान सन्मान साठी राजकारणात सहभाग होतात.
अनेक नेत्यांनी अमाप धन संपत्ती गोळा केली आहे. तसेच थकल्यावर मुलांना राजकारणात
आणून घराणेशाहीची प्रक्रिया
चालू ठेवतात. यात त्यांचा स्वार्थ
दिसून येतो. त्यांना देश , समाज
यांच्याशी काहीही कर्तव्य नसते.
केवळ पैशाच्या जोरावर ते घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न असतो.ज्या ठिकाणी नागरिक शासनाकडून कर्तव्याची अपेक्षा
ठेवतात त्याच प्रमाणे नागरिकांचे
सुद्धा कर्तव्य आहे की आपण शासनाचे नियमांचे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. तसेच
शासनाचे नियमाप्रमाणे कर, शुल्क भरणे आवश्यक आहे. या निधीमुळे शासनाला समाज
कल्याणच्या योजना अंमलात आणता येतात व देशाचा विकास
साधता येतो.प्रत्येक नागरिकाने
आपले मूलभूत कर्तव्य म्हणून
मतदान करणे गरजेचे आहे. मतदान करणे म्हणजे महान राष्ट्रीय कर्तव्य आहे. मात्र मतदान
करताना उमेदवाराचा अभ्यास
असणे आवश्यक आहे.अशाच उमेदवाराला मतदान करणे जरुरीचे आहे जो देशाचे
प्रथम हित पाहतो, देशाच्या विकासासाठी प्रयत्नशील असतो,
सर्व समाजाला बरोबर घेऊन त्यांचे हित साधत असतो.उमेदवार कोणत्याही राजकीय
पक्षाचा असो, धर्माचा असो, प्रदेशाचा असो त्याची देश निष्ठा
व प्रेम पाहूनच त्यास मतदान करावे ही अपेक्षा!देशात काही नेते असे आहेत की
मतदान साठी देशद्रोह्यांना सहकार्य करतात. तसेच देशात
बेकायदेशीर घुसखोरांना प्रवेश देण्यासाठी मदत करतात. अशा
उमेदवारावर बहिष्कार टाकून
त्यांची त्यांना जागा दाखवावी.
काही राजकीय पक्ष सत्ता मिळविण्यासाठी कोणत्याही
थराला जाऊ शकतात. देशात
जातीय दंगली घडवून आणतात
व देशात अशांतता निर्माण करतात. म्हणून मतदान करताना
उमेदवारांचा अभ्यास व माहिती
असणे अत्यंत गरजेचे आहे.
तरच देश सुरक्षित राहू शकतो.*खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे,

Leave a Comment