BJP leaders of Khandesh
BJP leaders of Khandesh
भाजप आणि,भाजप मधील खान्देशी नेते
भाग सहावा
आज भाजप संपूर्ण देश भरात तेजीत आहे. मोठमोठे काँग्रेस वं ईतर पक्षीय नेते आपापले पक्ष सोडून भाजप मध्ये किंवा भाजप सोबत जात आहेत. ज्योतीरादित्य शिंदे, अशोक चव्हाण, एकनाथ शिंदे आणि त्यांचा पक्ष, अजितदादा पवार आणि त्यांचा पक्ष. धुळे जिल्ह्यात, सुभाष भामरे, अमरीश पटेल, जयवर्धन कदमबांडे, दत्तू आण्णा पाटील यांचं घराण, व्यंकटराव आण्णा यांचं घराण. सुभाष देवरे, नंदुरबार जिल्ह्यात, बटेसिंग भैया, विजय गावीत, हिना गावीत. अशी लांबच लांब यादी आहे जीं लोक भाजप मध्ये वा भाजप सोबत जातं आहेत. पण जळगाव जिल्ह्यातील चित्र उलट आहे.

इथे भाजप सोडून ईतर पक्षात लोक जातं आहेत. त्यात पहिलं नावं अंमळनेर येथील अनिल भाईदास पाटील यांचं येत. अंमळनेर तालुका साने गुरुजी यांची कर्मभूमी आहे म्हणूनं हां तालुका समाज वाद्यांचा बाले किल्ला होता. इथे काँग्रेस आणि समाजवादी पक्ष आलटून पालटून सत्तेत यायचे.
पण डॉ बी एस पाटील हे भाजपाचे आमदार निवडून आले आणि इथे भाजपने शिरकाव केला. पुढे आ अनिल भाईदास पाटील यांनी इथे भाजपं मजबूत केला. पण 2009 मध्ये अपक्ष उमेदवार साहेबरावं धोंडू पाटील आणि 2014 मध्ये अपक्ष उमेदवार शिरीष चौधरी यांनी भाजप उमेदवार अनिल भाईदास यांचा पराभव केल्या नंतर अनिल भाईदास यांनी भाजप सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केला.
त्यांनी 2019 निवडणूक घड्याल चिन्हावर लढविली यावेळी माजी आमदार साहेबरावं धोंडू पाटील हे अनिल भाईदास यांच्या सोबत होते. ते भाजप उमेदवार शिरीष चौधरी यांचा पराभव करून निवडून आले. आता ते राष्ट्रवादी अजितदादा गटाचे मंत्री आहेत.
त्यांच्या नंतर नाथाभाऊ खडसे यांनी भाजप सोडला आणि राष्ट्रवादीत जाऊन विधानपरिषदेचीं आमदारकी मिळविली. तिथे त्यांना अस्थिरता वाटली म्हणून ते शरद पवारांची क्षमा मागून परत भाजपकडे परतले, पण त्यांचा भाजप प्रवेश रखडाला आहे. नाथाभाऊ यांनी भाजप सोडण्याचं कारण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुख्यमंत्री पद मिळविण्याची स्पर्धा होते.
bjp maharashtra भाजप आणि खान्देशी नेते
पक्षात नाथाभाऊ खडसे हे सर्वात जेष्ठ नेते असल्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री पदावर अधिकार दाखवीला. त्यांची जेष्ठता मान्य करत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. भाऊ मंत्री असताना त्यांना सर्वात जास्त म्हणजे 12 खाती दिली.
त्यातील सर्वात महत्वाचे खाते महसूल खाते दिले. पण भाऊ शांत झाले नाही. ते उघड पणे मुख्यमंत्री पदावर त्यांचा हक्क कसा आहे हे सांगत राहिले. त्याचं बरोबर या संघर्षाल थोडा जातीय रंग देत, ते बहुजन असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद दिले पाहिजे असे उघड बोलू लागले.
देवेंद्र फडणवीस यांचे दिल्लीत चांगले वजन असल्यामुळे त्यांनी भाऊंना राजिनामा द्यायला भाग पाडले. त्यातच अंजली दमानिया यांनी भाऊंची काही खरी खोटी प्रकरणे वृत्त पत्रात नेली.भाऊ रागावले आणि पक्ष सोडला. खरंतर भाऊनी पक्ष सोडण्याचा एवढा झटपट निर्णय घ्यायला नको होता. ते भाजप तर्फे 30 वर्षे आमदार होते. पूर्वीचा एदलाबाद म्हणजे आताचा मुक्ताई नगर हां त्यांचा मतदार संघ. ते 1995 ते 1999 पाट बंधारे मंत्री होते.
1999 साली विरोधी पक्ष नेते होते. भाजप मध्ये एवढी दीर्घ आणि भरीव कारकीर्द घालवलेले नेते त्यांनी थोडं शांत पणे निर्णय घ्यायला हवा होता. पक्षात राहून संघर्ष करायला हवा होता.
त्यानंतर उन्मेष पाटील यांनी भाजप सोडून शिवसेना उबाठा गट जॉईंट केला. माझ्या मते प्रादेशिक पक्ष जे भाजप विरुद्ध आहेत त्यांना काही भवितव्य नाही असं माझं वैयक्तिक मत आहे. 4 जून ला ठरेलं तुतारी आणि मशाल यांचं राजकारणात कांय भवितव्य आहे ते.निल भाईदास पाटील अजितदादा बरोबर गेल्यावर शरद पवार यांच्या कडील अंमळनेर येथील जागा रिकामी झाली. त्या जागेवर लगेच डॉ बी एस पाटील यांनी प्रवेश करत भाजप सोडला.

नंतर पारोळा येथील भाजप नगराध्यक्ष करणं पवार यां तरुण नेत्याने भाजप सोडला. भाजप पक्षात त्यांची स्थिती चांगली होती. अत्यंत कमी वयात त्यांना भाजपने पारोळा नगराध्यक्ष पद दिलं. पण उद्धव ठाकरेच्या पक्षातर्फे लोकसभेची उमेदवारी मिळते म्हटल्यावर त्यांनी पटकन भाजप सोडला. सर्वं देशातील पुढारी आपापले पक्ष सोडून भाजप कडे धाव घेत असताना जळगावं जिल्ह्यातील अनेक मोठ्या पुढऱ्यांनी भाजप सोडून ईतर पक्ष जवळ केले. त्याचे परिणाम बघू पुढच्या भागात.
1 thought on “BJP leaders of Khandesh”