Water shortage in Khandesh
Water shortage in Khandesh खान्देशात पाणीटंचाई
खान्देशचीं दुर्दशा,पाण्यासाठी दाही दिशा!
खान्देशांत अवर्षण ग्रस्थ बराच प्रदेश असला तरी या अवर्षाणावर मात करण्यासाठी ईश्वराने खांदेशातचं प्रचंड जलस्रोत सुद्धा आहेत. तापी, नर्मदा त्यांच्या असंख्ये उप नद्या आणि केमच्या डोंगरावरील नार पार सह प्रचंड जलस्रोत असणाऱ्या 19 पश्चिम वाहिनी नद्या. या जलस्रोतातून अरबी समुद्रात वाहून जाणार पाणी साठवील तर खान्देशचीं सर्वं शेती हिरवीगार होईल. प्रत्येक घरातील नळाला रोज 24 तास पाणी मिळेल.
पण लक्षात कोण घेत? हे पाणी अडवीणार कोण? आपलें आमदार खासदार यांचं काम आहे तें. पण हे लोक खान्देशच्या पाण्यावर सभागृहात तोंडच उघडत नाहीत. कोणी कोणी 5/7 मिनिटे थातूर मातूर बोलतात आणि त्याच्या क्लिपा काढून खान्देश भर सोशल मीडिया फिरवतात. होय सोशल मीडिया वर फिरवतात. दूरदर्शन वा मोठी वृत्तपत्रे यांच्या भाषणाचीं दखल सुद्धा घेत नाहीत.
सर्वं मौनी बाबा. खाली बोट वर बोट. दुसरं काम नाही सभागृहात! फक्त आपल्या मालक नेत्यावर लक्ष ठेवायच. त्यांनी ईशारा केला कीं बोट वर करायचं. त्यांनी इशारा केला कीं बोट खाली करायचं.

या बेजबादर पणाची झळ आज निष्पाप खान्देशी जनतेला भोगावी लागतं आहे. या वर्षी पाऊस थोडा कमी झाला, अवेळी झाला पण पाणी तर भरपूर मिळाले ना? तें सर्वं पाणी समुद्रात वाहून गेलं. वेळीच धरण बांधून हे पाणी आडवील असत तर आजच्या सारखी बिकट परिस्थिती निर्माण झाली नसती. खांदेशात गागावोगावी महिला, पुरुष, बालके हांडे कळशा घेऊन रानोमाळ दाही दिशा फिरत आहेत. प्रचंड ऊन. वरून सूर्य आणि खालून माती, पाण्यासाठी भटकणाऱ्या या लोकांना जाळून काढत आहेत. तरी तें लोक पाण्यासाठी वाटेल त्या दिसेला धावत आहेत. अशुद्ध, दूषित पाणी पित आहेत आणि साथीच्या रोगाणी हैराण झाले आहेत.
मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर व सर्वच उपनगराना जिथे 2 कोटी पेक्षा जास्त लोक आहेत त्यांना 24 तास पाणी दिलं जातं. पुणे, कोल्हापूर, नाशिक, नागपूर संभाजींनगर इथेही 24 तास पाणी मिळत. एक दिवस पाणी कपात केली तरी लोक शासन, प्रशासनाला फाडून खातात.
मग आमचं कांय? ग्रामीण भागातील छोट्या गावांची तर दखलचं कोणी घेत नाही. यांना कोणी टँकर सुद्धा पाठवत नाही. आणि मोठ्या गावात एक महिण्यानी पाणी येत. टँकर आला तर आला नाही तर नाही. सर्वं काही राम भरोसे!
धुळे हे जिल्ह्याचे शहर आहे. निवडणूकांच्या काळात म्हणाले रोज पाणी देऊ. निवडून आल्यावर म्हणाले दोन दिवसा आड पाणी पण प्रत्येक्षात आठ दिवसांनी एकदा पाणी मिळालं.
आता तेही बंद झालं. मुख्य शहरात दहा दिवसात पाणी येत. मोहाडी नगाव बारी सारख्या बाह्य शहरात तर टँकर दिसायला लागले. किती भयंकर अवस्था आहे. पावसाच पाणी मिळायला अजून दोन महिने अवकाश आहे. तों पर्यंत जनतेने कांय पाण्यासाठी टाचा घासून मरायचं आहे का?
खान्देश बाहेर मोठंमोठी धरण आहेत. कारखाणे, रोजगार आहे. रेल्वे, लोकल रेल्वे, मेट्रो, वंदे भारत ट्रेन, अमृत भारत ट्रेन, बुलेट ट्रेन. अशा आरबो खरगो रुपयांच्या योजना राबाविल्या जातं आहेत, तर खांदेशात साधं प्यायला पाणी मिळत नाही. कोणाचं पाप आहे हे? पुढारी तर पापी आहेतच पण जनताही निर्दोष नाही. अरे रडल्या शिवाय आई सुद्धा दूध पाजत नाही.
मग तुमच्या हक्का साठी तुम्ही कधी रस्त्यात उतरून लढणार आहात कीं नाही? मौनी बाबा बनून किती दिवस बसणार?
सामान्यत: मौन ठीक हैं लेकिन मननके लिए l
जब शोर हो सब तरफ सत्यके हननं के लिए l
तब तुम्हे तुम्हारी बात उचे शब्दोमे कहींनी चाहिए l
सर कटवाना पडे या ना पडे उसकी तय्यारी तों होनी चाहिए!
3 thoughts on “खान्देशात पाणीटंचाई Water shortage in Khandesh”