मुख्यमंत्री खान्देश कडे केव्हा

मुख्यमंत्री खान्देश कडे केव्हा

मुख्यमंत्री पदाची महत्वाकांक्षा प्रत्येक खान्देशी माणसाच्या अंगात मुरली पाहिजे!
 
कुठल्याही विभागाला मुख्यमंत्री पद मिळाल्या शिवाय त्या भागाचा विकासाचा मुद्दा ऐरणीवर येते नाही. राज्यातील हे सर्वशक्तीमान पद मिळविण्या साठी महत्वाकांक्षी नेता असणं जेवढं आवश्यक आहे तेवढंच आवश्यक जनतेला ही मुख्यमंत्री पदाची भूक असणं गरजेचं आहे.

Khandeshi Chief Minister
Khandeshi Chief Minister

ई स 1947 ला देश स्वातंत्र झाला तेंव्हा महाराष्ट्र राज्य नव्हते, मुंबई राज्य होते. त्यात विदर्भ, मराठवाडा वगळून उर्वरित महाराष्ट्र, गुजराथ आणि उत्तर कर्णाटक राज्याचा भाग होता. त्या मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री 1947 ते 1952 पर्यंत बाळासाहेब खेर (कोकण) होते. त्यांच्या नंतर मोराराजी देसाई (गुजरात) मुख्यमंत्री झाले. 1960 मध्ये संयुक्त महाराष्ट्र म्हणजे आताचा महाराष्ट्र तयार झाला त्याच्या मुख्यमंत्री पदी यशवंतराव चव्हाण(पं महाराष्ट्र) आले.

1 बाळासाहेब खेर कोकण
1 बाळासाहेब खेर कोकण

1962 साली यशवंतराव चव्हाण केंद्रात संरक्षण मंत्री गेल्यावर त्यांच्या जागी, 1962/63 मध्ये मारूतीराव कन्नमवार (विदर्भ) मुख्यमंत्री झाले. मुख्यमंत्री पदावर असतानाच कन्नमवार यांचा मृत्यू झाला. त्यांच्या जागी 1963 मध्ये केवळ 10 दिवसासाठी पी के सावंत (कोकण) मंत्री झाले. नंतर सावंत यांच्या जागी 1963 ते 1975 या दीर्घ काळासाठी वसंतरावं नाईक (विदर्भ) मुख्यमंत्री झाले.

मुख्यमंत्री खान्देश कडे केव्हा 4
2 यशवंतराव चव्हाण पं महाराष्ट्र

वरील प्रमाणे 5 मुख्यमंत्री झाले त्यात कोकण दोन, पश्चिम महाराष्ट्र एक, विदर्भ दोन असे मुख्यमंत्री झाले. यावेळ पर्यंत फक्त मराठवाडा आणि खान्देश यांच्या वाटेला मुख्यमंत्री पद मिळाले नव्हते. हां सत्तेचा विभागिया असमतोल आहे. खान्देश आणि मराठवाडा यांच्याही वाटेला मुख्यमंत्री पद यायला हवे होते. पण तशी चिन्ह दिसत नव्हती.

महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक आणि वसंतदादा पाटील यांची घट्ट मैत्री होती. राज्याची सर्वं सूत्र या त्रिकुटच्या हातात होती. ई स 1969 साली राष्ट्रपती पदाच्या निवडणुकी वरून काँग्रेस पक्षात फूट पडली. काँग्रेस पक्षाने डॉ नीलम संजीव रेड्डी यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार केले.

मुख्यमंत्री खान्देश कडे केव्हा 6
4 शंकरंरावं चव्हाण मराठवाडा

काँग्रेसच्या पंतप्रधान पदी इंदिराबाई असल्यामुळे रेड्डी हे इंदिराबाई यांचेच उमेदवार होते. पण इंदिराबाई यांनी ऐन वेळी भूमिका बदलली. त्यांनी अपक्ष उमेदवार व्ही व्ही गिरी यांना शेवटच्या क्षणी पाठीबा जाहीर करून विरोधी पक्षाच्या पाठीम्ब्यावर व्ही व्ही गिरी यांना निवडून आणले.

यावेळी काँगेस पक्षात दोन गट झाले. मोरारजी देसाई यांचा सिंडीकेट गट आणि इंदिराबाई यांचा इंडिकेट गट. सिंडिकेट गटाने रेड्डी यांना मतदान केले तर इंडिकेट गटाने गिरी यांना मतदान केले. यावेळी महाराष्ट्र काँग्रेस, चव्हाण, नाईक, दादा यांच्या नेतृत्वात एकसंघ होती.

मुख्यमंत्री खान्देश कडे केव्हा 8
3 मारुतीराव कन्नमवार विदर्भ

या महाराष्ट्र काँग्रेसनें नीलम संजीव रेड्डी यांना मतदान केले वं निवडणुकी नंतर रातोरात ही सर्वं मंडळी इंडिकेट काँग्रेसमध्ये सामील झाले. असे असले तरी, महाराष्ट्र काँग्रेसनें रेड्डी यांना जे मतदान केले त्याचा राग इंदिराबाईंच्या मनात होता. इथे यशवंतराव चव्हाण आणि इंदिराबाई यांच्यात सुप्त वितुष्ट सुरु झाले. इंदिराबाई यांनी चव्हाण, नाईक, दादा हे त्रिकुट हटवून स्वतःचा माणूस महाराष्ट्र काँग्रेस नेते पदी आणायचे ठरविले होते.

त्याचे पहिले पाऊल म्हणजे बाईनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरून वसंतराव नाईक यांना हटविण्याचे ठरविले. यावर यशवंतराव चव्हाण यांनी वसंतदादा पाटील यांना मुख्यमंत्री पदी आणण्याचा विचार चालविला होता. पण इंदिराबाईना ते होऊ द्यायचे नव्हते.


इंदिराबाई यांनी या सत्ता संक्रमाणात शंकरराव चव्हाण यांना मोहरा बनविण्याचे ठरविले. बाईंच्या आशीर्वादाने शंकरराव चव्हाण यांनी मुख्यमंत्री पद मिळविण्याची हालचालं सुरु केली. त्याच क्षणी मराठवाडा मुक्ती संग्रामचे एक सेनानी गोविंदभाई श्राफ पुढे आले. त्यांनी मराठवाड्याला मुख्यमंत्री पद मिळावे म्हणून आंदोलन उभे केले.

त्या आंदोलनाला इंदिराबाईनी छुपा पाठीबा देऊन शंकरराव चव्हाण यांना 1975 साली मुख्यमंत्री केले. त्यामुळे वसंतदादानी राज संन्यास घेतला. मराठवाड्याला न्याय मिळाला. पण खान्देशचं कांय? खान्देशला अजूनही मुख्यमंत्री पद मिळालं नाही. ते मिळावे म्हणून आपण सुद्धा आंदोलन उभे केले पाहिजे.

खान्देश जागा झाला पाहिजे. घराघरातून मुख्यमंत्री पदाची मागणी झाली पाहिजे. त्यासाठी मी गिल्ली दान्डूना खेय हे गाणं तयार करून यूट्यूबवर टाकले आहे. हे गाणं शाळे शाळेत पोहचवा. स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट आणि प्रजास्ताक दिन 26 जानेवारीला खान्देशातील शाळेतील विद्यार्थ्यांकडून हे गाणे नृत्य रूपात बसवून स्टेजवर सादर करा.

म्हणजे त्यांना मुख्यमंत्री पदाचे बाळकडू बाल वयातच मिळेल. पुढे यांच्यातीलच कोणी बालवीर शिरीष कुमार सारखा राष्ट्र भक्त बनून मुख्यमंत्री पद ओढून आणेल!


खान्देश की सोच पगले मुशीबत आने वाली हैंl
तेरे बरबादीके मशवरे हैं जहाँ मे l
ना समजोगे तो मीट जाओगे खान्देशीयो l
तुम्हारी दास्ता तक नही होगी दास्तानोमे l


विनंती आहे सर्वं खान्देशी बांधवाना. बापू हटकर प्रस्तुत, खान्देश दर्शन युट्युब चॅनेवर जा. तिथे गिल्ली दान्डुना खेय गाणं आहे. ते संपूर्ण ऐका. त्याच्या शेवटच्या कडव्यात खांदेशाच्या मुख्यमंत्री पदा बद्दल भाष्य केले आहे. ते खान्देशी तरुणांच्या नसा नसात भिनावे म्हणून गाणं सबस्क्राईब करा. लाईक द्या आणि खांदेशात शाळे शाळेत, घराघरात फॉरवर्ड करा.


बापू हटकर
 

Leave a Comment