नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई


   नार पार साठी आर पार लढाई
जागेगा खान्देश की यह जंग जितेंगा


       नार पारच्या पाण्यासाठी 16 ऑगस्टला माजी खासदार उन्मेष पाटील यांच्या नेतृत्वाखाली चाळीसगाव शहरात एक भव्य ट्रॅक्टर मोर्चा निघाला, त्याच वेळी कल्याण महानगरांत भय्यासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसाच भव्य रिक्षा मोर्चा निघाला. ईतर ठिकाणी काही कार्यकर्ते तहशीलदार कार्यालयावर मोर्चे घेऊन गेले. लीलाधर सोनार नावाचा कार्यकर्ता तर एकाच दिवशी धुळे, शिरपूर आणि शिंदखेडा या तीनही तहशिलदार कार्यालयांत जाऊन निवेदन देऊन आला.

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत
खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत


         माजी खा उन्मेष पाटील यांनी प्रांताधिकारी चाळीसगाव आणि भैय्यासाहेब पाटील यांनी प्रांताधिकारी कल्याण यांना नार पार गिरणा लिंक योजना पुन्हा सुरू करा म्हणुन निवेदन देवून आले. 

नार पार साठी खान्देशी जनतेची लढाई 4


         नार पार ही खान्देशची जिवन रेखा आहे. केंद्र सरकारचे जलशक्ति मंत्री ना सी आर पाटील यांनी ही योजना रद्द केल्याची घोषणा करताच त्याच्या तीव्र प्रतिक्रिया खान्देशात उमटल्या. म्हणुन उपमुख्यमंत्री ना देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांच्या सहीचे एक थातूरमातूर पत्र तयार करून मीडियात सोडून दिले. पण हा केवळ चुनावी जूमला आणि या चुनावी जमल्याला खान्देश बधनार नाही.


        या आधी सुद्धा नार पार गिरणा लिंक मांजरपाडा दोनच्या रूपाने आमची फसगत झाली आहे. ही फसवणूक करणारे अजितदादा पवार आणि भुजबळ साहेब आजही मंत्री आहेत. त्यांनी वचन दिले होते, मांजरपाडा एक आणि दोन एकाच वेळी सुरू करून पूर्ण करू. पण तस घडल नाही. मांजरपाडा एक पूर्ण झाले पाणी वापरायला सुरुवात सुद्धा झाली पण मांजरपाड दोनवर एक वीट सुद्धा नाही. हेच मांजरपाडा दोन खान्देशसाठी आहे. 


दुधाने पोळलेला ताक सुद्धा फुंकून पितो. आम्ही तर कुल्फी सुद्धा फुंकून फुंकून खायचे ठरविले आहे.

कुर्‍हाडिंचा दांडा गोतास काळ!
           मोदी शहा हे पट्टीचे गुजराथी व्यापारी आहेत. ते मस्त चाल खेळले आहेत. सी आर पाटील हे मुळ खांदेशी त्यांच गाव मुक्ताईनगर तालुक्यात आहे. ते गेली चार खेप वापी-नवसारी लोकसभा मतदारसंघातून निवडून जातात. या मतदारसंघात 50% अहिराणी, 20% मराठी आणि 30% गुजराथी मतदार आहेत. अहिराणी मराठी 70% मतदार हे सी आर पाटील यांच्या पाठीशी असतात म्हणुन ते कायम गुजराथी उमेदवाराचा पराभव करून निवडून येतात. या खांदेशी माणसाचा वापर मोदी-शहानी खान्देशच पाणी तोडण्यासाठी केला. लोहा लोहेको काटता है, काट्याने काटा काढला, कुर्‍हाडिचा दांडा गोतास काळ ठरला आणि खांदेशी माणसाच्या हुकुमावरून खान्देशच पाणी तोडले. यालाच म्हणतात बनियेगिरी किंवा बनवेगिरी!


        पण आता हे होणार नाही, आम्ही आता ते होऊ देणार नाही. हे 16 ऑगस्टच्या कल्याणचा रिक्षा मोर्चा आणि 40गावचा ट्रॅक्टर मोर्चा यानी ते सिद्ध केलं आहे. आम्ही कोणताही प्रचार केला नाही. पत्रक वाटली नाहीत. रोजंदारीवर माणस गोळा करण्याची आमची ऐपत नाही. तरी हा जन सागर उसळला फक्त तोंडातोंडी निरोप गेला आणि लोक जमा झाले.


अकेलेही निकल पडे थे जानीब-ए-मंजील,
लोक आते गये और कारवा बनता गया l


       या आंदोलनाच्या रूपाने आज भय्यासाहेब पाटील आणि उन्मेषदादा पाटील एकत्र आले आहेत.  उन्मेषदादाना राजकीय पार्श्वभूमी आहे. त्यांचा राजकीय पक्ष आहे. भय्यासाहेब पाटील यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नाही. केवळ सामाजिक सेवेसाठी *खान्देश हित संग्राम* या संघटनेच्या माध्यमातून ते आणि त्यांचे सर्व सहकारी, मुंबई परिसरातील खांदेशी बांधवांची निस्वार्थ सेवा करत आहेत. आता ते नार पार साठी आर पार लढाई करायला रणांगणात उतरले आहेत. उन्मेषदादा त्यांना येवून मिळाले आहेत.


     खान्देशातील जल योद्धे जे नार पार साठी लढू इच्छितात त्यांनी या जोडी सोबत या. राजकीय सामाजिक सर्व क्षेत्रातील लोक एकत्र या. आपण एक विराट अस खान्देश व्यापी युद्ध लढू या.

हर जोर जुल्मकी टक्करमे संघर्ष हमारा नारा है!
         जंग सुरू हो गई हैl लोकांनाच नारपारच्या पाण्याची तहान लागली आहे. हे युद्ध पाणी मिळाल्या शिवाय थांबणार नाही. गुजराथ खान्देशला लुटत आहेत. अहिराणी नेत्यांच बुजगावणे झाले आहे आणि मराठी नेते तमाशा बघत आहेत. अशा वेळी आपल्यालाच आपली लढाई लढावी लागेल. 


जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला l
म्हणुन सर्व अहीर खान्देशी बंधू भगिनींना विनंती आहे, सज्ज व्हा, सिद्ध व्हा, नार पारच पाणी तुटल तर खान्देशच वाळवंट होईल.
काय पण सरकार आहे?


        खान्देशच पाणी पळवून कच्छ भुज वाळवंटाच नंदनवन करत आहे. ते करायला आमची हरकत नाही पण त्यासाठी खान्देशच्या नंदनवनाच वाळवंटात रूपांतर करायची काय गरज आहे? आम्ही ते होऊ देणार नाही.


शूर बहादूर झाशीवाली शिरीष खाज्या वीरमणी l
न्यायासाठी रक्त सांडले शहीद झाले रणी ll
त्या रक्ताची शपथ तुला कर अस्थी जाळून धुनी l
खान्देश हो जागा सारा दाही दिशा उलथूनी ll

अब जागा है खान्देश की यह जंग जीतेगा ll
बापू हटकर

Leave a Comment