खान्देशातील नेते
खान्देशातील नेते ना गाईच्या कामाचे,ना औताचे कामाचे…
सध्या नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचे आंदोलनाचे वावटळ उठलय, सरकारच्या दालनात हे वादळ लवकरच नक्की घोंघावनार आहे !.. परंतु सध्याचे सरकार म्हणजे खोट बोल पण रेटून बोल असे आहे. खान्देशातील मंत्र्यांना जलसंपदामंत्रींनी बरोबर कामाला लावले आहे. *म्हणजे साप ही मेला पाहिजे आणि काठी तुटायला नको… पण आपले नेते लाचार झाले आहेत. आज यांना नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाचा इतका पुळका आला आहे की, कोण प्रेझेंटेशन करतय,?
कोण भिमगर्जना करतय? मग इतके वर्ष हे झोपले होते का? आज सुध्दा सरकारच्या दबावाखाली यांचे वक्तव्य चालु आहे. मुळात नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाची केंद्र सरकारच्या नदीजोड प्रकल्पअभियानात कोठेच नोंद नाही नार पार नर्मदा नदीजोड प्रकल्प.. दमणगंगा पिंजाड नर्मदा प्रकल्प*… म्हणजे पाणी गुजरातला जातय हे शंभर टक्के आहे.
हा प्रकल्प जर राज्यअंतर्गत आहे तर मंग केंद्र सरकारच्या ३० नदीजोड प्रकल्पाच्या यादीतून का वगळण्यात आला? सरकार जर हा प्रकल्प राज्यअंतर्गत आहे असे सांगत आहे, तर मग केंद्र सरकारचे जलशक्ती मंत्री संसदेत अव्यवहारी म्हणून कसे काय घोषित करतो? हे सर्व विषयात गौडबंगाल आहे. हे विषय सर्व सामान्य लोकांना कळतात, मग आपल्या नेत्यांना का कळत नाही?
नारपार नदी जोड प्रकल्पास सरकारने मंजुरी दिली असे आपण गृहीत धरू या. परंतु १० टीएमसी वर आपण समाधानी आहोत का? हे खान्देशातील नेत्यांनी स्पष्ट करावे. तसेच काही दिवसापूर्वी लगेच श्री भुजबळांनी घोषणा केली की, पार नदीच्या खोऱ्यातुन अजून ५ टीएमसी पाणी उचलणार. आता हे महोदय आधीच मांजरपाडा १ घेवुन गेले. आम्हाला मांजरपाडा २ चे गाजर दाखवून, त्या गाजराची पुंगी बनवुन तेच खावून गेले. परत त्यांचा डोळा नारपार प्रकल्पावर आहे, ही सत्यता नाकारता येणार नाही.
इतक सर्व चालु असतांना आमचे पुढारी नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प आम्ही कसा खान्देशला दिला. आम्ही किती खान्देशवर उपकार केले. असे भासवतात. परंतु रस्त्यावर येवून लोकांना नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पाची सविस्तर माहिती पुराव्यासह का दाखवित नाहीत?नारपार गिरणा नदीजोड प्रकल्पा बाबतीत अनभिज्ञ असणारे नेते स्वतःच श्रेय घेत आहेत. परंतु ह्या प्रकल्पाचा गाजावाजाच चालु आहे, तेवढ्यात श्री भुजबळ महादयांनी पार नदीच्या खोऱ्यातुन ५ टीएमसी पाणी उचलणार म्हटले. परंतु आमच्या एकाही नेत्यांनी विरोध किंवा निषेध नोंदवला नाही. म्हणून यांना साडीचोळी, बांगडी, टिकलीचा आहेर का पाठवु नये? खान्देशातील असे, जे ना गायीच्या कामाचे, ना औताच्या कामाच्या राजकीय नेत्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो.
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
9004933626