उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या – विकास पाटील

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या – विकास पाटील

नार-पारचे पाणी गिरणा खोऱ्यात वळवा

जलपरिषदेतील सूर उत्तर महाराष्ट्राच्या समृद्धतेसाठी एकमेव रामबाण उपाय, विविध ठराव मंजूर

खानदेशवासीयांनी पाणी प्रश्नावर जागरूक होणे काळाची गरज आहे. तापी, गिरणा आणि नार-पार खोरे हे तिन्ही खोरे म्हणजे ४०० ‘टीएमसी’हून अधिक पाणलोट व जलस्रोताचे क्षेत्र असून, हे खोरे उत्तर महाराष्ट्राची जीवनदायिनी ठरणार आहेत. अतिवृष्टीच्या नार-पार खोऱ्यातील पाणी अतितुटीच्या गिरणा खोऱ्याकडे वळविणे हाच उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृद्ध करण्यासाठी प्रभावी व रामबाण उपाय ठरेल,असा ठाम विश्वास जलपरिषदेत व्यक्त झाला.

धुळे शहरातील केशरानंद उद्यानात उत्तर महाराष्ट्र जलपरिषदेची एकदिवसीय जलपरिषद झाली. उपस्थित जलप्रेमींनी विविधांगी विकासाची भूमिका मांडली. जलपरिषदेचे अध्यक्ष विकास पाटील, बापू हटकर, माजी आमदार प्रा. शरद पाटील, मोतीलाल पोतदार, आर. एम. पाटील, सचिन भदाणे,जवाहर पाटील, जलअभ्यासक : भिला पाटील, दीपक पाटील, सुभाष चौधरी, मगन सूर्यवंशी, शुभांगी पाटील आदी उपस्थित होते.

श्री. हटकर म्हणाले, की तापी खोऱ्याच्या सातपुडा डोंगररांगेतील सूर्यकन्या तापी, अरुणावती, अनेर, बोरी, वाघूर, उमरी, सुसरी व गोमाई या पश्चिम वाहिनी, तर गिरणा, पांझरा, मोसम, बुराई या पूर्ववाहिनी नद्या आहेत. पेठ- सुरगाणा अर्थात सह्याद्रीच्या डोंगररांगेतील नार-पार, तान, मान, औरंगा, अंबिका अशा १९ हून अधिक नद्या पश्चिम वाहिनी आहेत. त्यापैकी तापी खोरे हे खचदरीचे अर्थात खोलदरीचे खोरे आहे. गिरणा खोरे हे अतितुटीचे खोरे आहे आणि नार-पारचे खोरे हेहै अतिवृष्टीचे खोरे आहे.

अध्यक्ष पाटील म्हणाले, की उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून पुढील प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी देऊन लवकरात लवकर पुढील प्रकल्प पूर्ण करावेत जेणेकरून उत्तर महाराष्ट्र (खानदेश) दुष्काळमुक्त होईल, यासाठी एकत्रित येणे गरजेचे आहे. तिन्ही खोऱ्यांसाठी एकात्मिक नदीजोड प्रकल्पांतर्गत बारमाही मोठ्या नद्या लहान नद्यांना व लहान नद्या अतिलहान नद्यांना जोडल्यास कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त वा दुष्काळग्रस्त उत्तर महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारा हा प्रयोग ठरेल.

असे व्हावे जलव्यवस्थापनाचे नियोजन

नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेषा असणाऱ्या नार-पार योजनेतर्गत मांजरपाडा-१

प्रकल्प, वांजूळपाणी योजना, नार-पार-गिरणा नदी लिंक प्रकल्प जोडणे, जळगाव जिल्ह्यासाठी उर्ध्व तापी अर्थात हतनूर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी गाळ काढणे व उजव्या कालव्याप्रमाणे डाव्या कालव्याची बांधणी करणे, वरखेड-लोंढे, शेळगाव बरेज व सुलवाडे-जामफळचा समावेश बळीराजा संजीवनी प्रकल्पात करून अतिरिक्त हक्काच्या व हिश्श्याच्या पाण्यात सौर तंत्रज्ञान व बंदिस्त पाइपलाईनचा वापर करून कायमस्वरूपी रिझर्व्हरसची निर्मिती करणे, निम्न तापी प्रकल्प पाडळसरे, शेळगाव, सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बरैजस प्रकल्पांतर्गत जळगाव जिल्ह्यातील १४, धुळे व नंदुरबार जिल्ह्यांतील २२, जल उपसा सिंचन योजनांसाठी सौर तंत्रज्ञानाचा, बंदिस्त पाइपलाईनचा आणि तुषार सिंचन व सूक्ष्म ठिबक संचाचा वापर केल्यास शून्य वीजबिल व शत प्रतिशत पाणीबचत होईल. शेकडो गावांची पाणीटंचाई दूर करणारे व भाग्यरेखा ठरणारे गिरणा नदीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सात बलून बंधाऱ्यांचे प्रकल्प पूर्ण करणे, तापी-बुराई नदीजोड प्रकल्पाचे अग्रक्रमाने कार्यान्वयन करणे.

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या - विकास पाटील 3

जलपरिषदेतील महत्त्वपूर्ण ठराव

■ पाडळसरे धरणाचा प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा

■ सुलवाडे जामफळ प्रकल्पाचे नामकरण प्रतापसागर करावे

■ नार-पार योजनेत गिरणा, पांझरा, बोरी, मोसम नदीजोड प्रकल्प

पूर्ण करावा

■ हतनूर धरणावर डावा कालवा बांधावा

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या - विकास पाटील 5

उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून पुढील प्रकल्पांसाठी केंद्र व राज्य शासनाने भरीव निधी देवून

लवकरात लवकर पुढील प्रकल्प पुर्ण करून उत्तर महाराष्ट्र (खान्देश) दुष्काळ मुक्त करावा
विकास पाटील


खान्देशच्या पाणी प्रश्नासाठी उत्तर महाराष्ट्र जल परिषदेला सज्ञकआर्य करा – प्रा.शरद पाटील माजी आमदार

खान्देशच्या पाणी प्रश्नांसाठी एकत्र या – शुभांगी पाटील


पाणी प्रश्नावर सर्व खान्देशवासीयांनी जागरूक होणे काळाची गरज -बापूसाहेब हटकर


पाणी हे परीसच नव्हे तर पाणी हे तुम्हांआम्हां सर्वांचं जीवन आहे.

तापी खोरे,गिरणा खोरे व नार पार खोरे हे तिन्ही खोरे म्हणजे ४०० टिएमसी हून अधिक पाणलोट व जलस्रोताचं क्षेत्र आहे.हे तीनही खोरे उत्तर महाराष्ट्राची जीवनदायीनी(लाईफलाईन) ठरणार आहेत.ह्या तीनही खो-यांमध्ये ५० हून अधिक लहान मोठ्या नद्यापैकी काही नद्या पुर्ववाहिनी तर काही नद्या पश्चिम वाहिनी आहेत.तापी खो-याच्या सातपुडा डोंगर रांगेतील सूर्यकन्या तापी,अरुणावती,आनेर,बोरी,वाघुर,उमरी,सुसरी व गोमाई या पश्चिम वाहिनी तर गिरणा,पांझरा,मोसम,बुराई या पुर्ववाहिनी नद्या आहेत.

पेठ सुरगाणा अर्थात सह्याद्रीच्या डोंगर रांगेतील नार,पार,तान,मान,औरंगा, अंबिका अशा १९ हून अधिक नद्या पश्चिम वाहिनी आहेत.त्यापैकी तापी खोरं हे खचदरीचं अर्थात खोलदरीचं खोरं आहे तर गिरणा खोरं अतीतुटीचं खोरं आहे आणि नारपारचं खोरं हे अतीवृष्टीचं खोरं आहे.अतिवृष्टीच्या नार-पार खो-यातील पाणी अतीतुटीच्या गिरणा खो-याकडे वळविणे हाच उत्तर महाराष्ट्र जलसंपन्न व जलसमृध्द करणेसाठी प्रभावी व रामबाण ठरेल.या तीनही खो-यासाठी एकात्मिक नदीजोड प्रकल्पांतर्गत बारमाही मोठ्या नद्या लहान नद्यांना व लहान नद्या अती लहान नद्यांना जोडल्यास कायमस्वरूपी अवर्षणग्रस्त वा दुष्काळग्रस्त हे उत्तर महाराष्ट्रासाठी नवसंजीवनी देणारा प्रयोग ठरेल यांत तिळमात्र शंका नाही. फक्त गरज आहे ती सुयोग्य नियोजनाची,तीव्र राजकीय इच्छाशक्तीची व आक्रमक सातत्यपुर्ण जनरेट्याची,जनलढ्याची व जनसमर्थनाची…!

उत्तर महाराष्ट्राच्या सर्वांगीण व संतुलित विकासासाठी जलक्रांती,कृषीक्रांती व उद्योगक्रांती ही त्रिसूत्रीच फलदायी ठरेल.त्यामुळे सुजलाम् सुफलाम् उत्तर महाराष्ट्र हेच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेचं अंतिम उध्दिष्ट आहे.उत्तर महाराष्ट्रातील नदीजोड प्रकल्पांतर्गत अपुर्ण,प्रलंबित व प्रस्तावित जलसिंचन प्रकल्प पुर्णत्वास नेण्यासाठी केंद्रसरकारचं जलशक्ती मंत्रालय,केंद्रीय जल आयोग व राज्य सरकारचं जलसंपदा मंत्रालय यामध्ये सुसंवाद,सुसंपर्क व सुसमन्वय असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच उत्तर महाराष्ट्र जल परीषदेने गावागावात,घराघरात व मनामनात लोकांमध्ये जनजागृती व जनजागरण करणेसाठी,जनआंदोलन व जनलढा उभारण्यासाठी आणि जलदूत व जलप्रेमी मार्फत जलसाक्षरतेचा प्रचार व प्रसार करणेसाठी दि.१० डिसेंबर,२०२३ रोजी दुपारी १२.३० ते ४.३० यावेळेत केशरानंद लॉन्स,नगावबारी,धुळे येथे जल परीषदेचं आयोजन केलं आहे.उत्तर महाराष्ट्र जल परीषद व विविध स्थानिक जलसिंचन प्रकल्प संघर्ष समिती यांचेतर्फे

उत्तर महाराष्ट्रातील विविध जलसिंचन प्रकल्पासंदर्भात चिंतन,मंथन व मागण सादर होणार आहे…!


ठराव

१) पाडळसरे धरण पुर्ण १९ टिएमसीच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेत समावेश करावा.
२) नाशिक जिल्ह्याच्या उत्तर भागाची भाग्यरेषा असणाऱ्या नार-पार योजनेंतर्गत मांजरपाडा-१ प्रकल्प ,वांजुळपाणी योजना, नार-पार-गिरणा नदी लिंक प्रकल्प जोडणे.
३) सुरवाडे जामफळ प्रकल्पाचे नामकरण प्रताप सागर असे करावे. जळगाव,जिल्ह्यासाठी उर्ध्व तापी अर्थात हातनूर धरणाचं पुर्ण क्षमतेने भरण्यासाठी गाळ काढणे व उजव्या कालव्याप्रमाणे डाव्या कालव्याची बांधणी करणे.

३) वरखेड-लोंढे,शेळगांव बॅरेज बॅरेज व सुलवाडे-जामफळ यांचा समावेश बळीराजा संजीवनी प्रकल्पात समावेश करुन अतिरिक्त हक्काच्या व हिश्याच्या पाण्याचा सौर तंत्रज्ञानाचा व बंदिस्त पाईपलाईनचा वापर करुन कायमस्वरूपी रिझर्व्हरसची निर्मिती करणे.

४)निम्न तापी प्रकल्प पाडळसरे, शेळगाव,सुलवाडे, सारंगखेडा व प्रकाशा बॅरेजस प्रकल्पांतर्गत जळगांव जिल्ह्यातील १४ धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील २२ जल उपसासिंचन योजनांसाठी सौर तंत्रज्ञानाचा,बंदिस्त पाईपलाईनचा आणि तुषार सिंचन व सूक्ष्म ठिबक सिंचन संचाचा वापर केल्यास शुन्य वीजबील व शतप्रतिशत पाणीबचत होईल.

५) गिरणा नदीवरील अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त ७ बलून बंधारे शेकडो गावांची पाणीटंचाई दूर करणारे,भाग्यरेखा ठरणारे प्रकल्प पुर्ण करणे. ६)…तापी-बुराई नदी जोड प्रकल्पाचं अग्रक्रमाने कार्यान्वयन करणे.
७) तापी नदीचं महाराष्ट्राच्या वाट्याचं १९१.४० टिएमसी अडविणं,जिरविणं,साठवणं वापरणं गरजेचं आहे. त्यासाठी महत्वाकांक्षी उकाई धरण ते मोसम नदी लिंक प्रकल्पाचं आणि उकाई धरण ते पांझरा नदी लिंक प्रकल्पाचं सर्वेक्षण व सूक्ष्म अभ्यास करणे,सुधारित प्रशासकीय मान्यता देणे व आवश्यक व पुरेशा निधीची उपलब्धता करणे.

८) नर्मदा नदीतील महाराष्ट्राच्या हिश्याचं व हक्काचं १०.२५ टिएमसी सरदार सरोवराच्या ब्याक वॉटर क्षेत्रातून पाणी सातपुडा डोंगरातील बोगद्याद्वारे व नैसर्गिक उताराद्वारे बडवाणी मार्गे नर्मदा नदी ते गोमाई नदी लिंक करुन मालकातर धरण व रहाट्यावड धरणाद्वारे सुलवाडे ब्यारेज मध्ये आणल्यास तापी नदीच्या उत्तरेकडील सातपुडा डोंगर रांगाच्या दक्षिणेकडील शिरपूर,शहादा,शिंदखेडा,तळोदा,नवापूर व नंदुरबार तालुक्यातील हजारो हेक्टर क्षेत्र शेतीसिंचनाखाली येईल.
९)…शहादा तालुक्याच्या पुर्वेकडील असणारं रहाट्यावड धरण हे ब्रिटिश काळापासून मंजुर असलेलं धरणाचं काम निधीअभावी व पाठपुराव्या अभावी आजही कासवाच्या संथ गतीने सुरु आहे.त्यामुळे पाणीटंचाईचं व भिषण संकट कायमच उभं राहत आहे…!

उपरोक्त ठराव सर्वानुमते मंजूर
प्रकल्पांसाठी शासनाने जागतिक बँक,खुल्या बाजारतून वा वॉटर बाँडच्या माध्यमातून मेट्रो प्रकल्पाच्या व समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या धरतीवर निधी उभारावा.शेतकरी वर्गास चोवीस तास पाणी व वीज हवी.सिंचनासाठी शेतकरी वर्गाकडून सिंचन कराच्या माध्यमातून कर संकलन करुन प्रकल्पाची दुरुस्ती,देखबाल व प्रकल्प खर्च भागवावा.जलक्रांतीतून कृषीक्रांतीकडे व कृषीक्रांतीकडून अर्थक्रांतीकडे व अर्थक्रांतीकडून औद्योगिक क्रांतीकडे मार्गक्रमण सुरु झाल्यास शेतकरी कर्जमुक्त, अनुदानमुक्त व आत्महत्यामुक्त होईल.संपन्न कुटुंब,संपन्न समाज व समृद्ध राष्ट्र निर्मितीचं स्वप्न साकार होईल…!

1 thought on “उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन करून भरीव निधी द्या – विकास पाटील”

Leave a Comment