बेधडक रोखठोक जनसामान्याच्या प्रश्न नेता कसा असावा
खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे
विश्वात प्रत्येक देशात लोकशाही व हुकूमशाही पद्धतीने राज्य कारभार चालू आहे.
हुकुमशाही म्हणजे एकाधिकार शाही होय! फक्त ठराविक नेत्यांच्या हाती सत्ता असते.तेथे सार्वजनिक निवडणुका घेतल्या जात नाहीत राष्ट्र प्रमुखाच्या मर्जीने कारभार चालू असतो जनता जनार्दनच्या विचारांना व मतांना किंमत
नसते फक्त राष्ट्रप्रमुख जसे सांगेल तसे वागायचे असते.
लोकशाही प्रणाली मध्ये जनता राज्य करीत असते.कारण;लोकशाहीमध्ये ठराविक काळानंतर सार्वजनिक निवडणुका होतात. प्रत्येक मतदार त्याच्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान करून निवडून आणतो. म्हणजे निवडून
येणारा उमेदवार हा जनतेचा प्रतिनिधी असतो जनतेचे प्रतिनिधित्व करतो. प्रतिनिधी जनतेचे समस्या मांडतो,गाऱ्हाणी कथन करतो. जनतेचे विचार जाहीर करतो.म्हणजे प्रत्येक नागरिकाला स्वातंत्र्य असते.तो देशाच्या राज्यकारभारात भाग घेत असतो. त्याच्या विचारांना किंमत असते.
एकाधिकारशाही मध्ये एकच पक्षाची राजवट असते. त्यामुळे येथे नेत्यांचा सुळसुळाट नसतो लोकशाही मध्ये अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असतात.कारण प्रत्येकाला बोलणे,लिहिणे, संघटना व पक्ष स्थापन करणे असे अनेक अधिकार प्राप्त झालेले असतात. म्हणून लोकशाही मध्ये
अनेक नेते निरनिराळ्या राजकीय पक्षांचे असतात.प्रत्येक पक्षाची विचार शैली अलग असते.जो निवडून येतो तो नेता म्हणून गणला जातो.
बहुमताच्या जोरावर देशाचा नेता निवडला जातो.एकाधिकार शाही मध्ये
जर कोणी विरोध केला तर त्यास रहस्यमय ने व गुप्त रित्या मारले जाते. अशा घटना चीन, रशिया व उत्तर कोरिया या हुकुमशाही राजवटीत नेहमी घडत असतात तेथे कायद्याचे राज्य नसते.
आजच्या काळात लोकशाही प्रणाली यशस्वी ठरली आहे. अनेक राष्ट्रात लोकशाही पद्धत अस्तित्वात आहे या पद्धतीत निवडून येण्यासाठी उमेदवाराला बराच पैसा खर्च करावा लागतो. अनेकदा तो उधार उसनवार करून खर्च करीत असतो. सगळेच उमेदवार जन सेवेसाठी पैसा खर्च करीत नाहीत हे चित्र आपण देशात पाहत आहोत.ठराविक व मोजके सामाजिक कार्यकर्ते समाज व देशासाठी त्याग करीत असतात.
आज आपल्याला आपल्या देशाचे काय चित्र दिसत आहे? अनेक
नेत्यांचे राजकारण म्हणजे त्यांचा व्यवसाय व धंधा झालेला आहे.गल्ली ते दिल्ली पर्यंत नेत्यांची धनसंपत्ती चे आपण मोज माप करू शकत नाही.एकदा निवडून आल्यावर अचानक त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारते. याचे कारण जनतेला माहीत आहे. यांना नेते म्हणण्यास लाज वाटते.ते लोकशाही प्रणाली चा दुरुपयोग करून स्व हित साधत असतात.म्हणून चीनच्या तुलनेत आपण सर्व क्षेत्रात खूप मागे आहोत.
भारतातील काही नेत्यांनी फक्त संपती गोळा केली त्यांना देश विकास काय असतो याचे त्यांस भान नसते .आपल्या मुलांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आणणे यातच ते धन्यता मानतात. म्हणून आपण मागे पडलो.
स्वातंत्र्य पूर्व काळात देशासाठी अनेकांनी बलिदान केले. आपल्या
परिवार कडे लक्ष दिले नाही पण समाज व देशासाठी सर्वस्व पणाला लावले. हे खरे नेते. त्यांनी स्वार्थ पाहिला नाही.
श्री शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य साठी आपले पूर्ण कुटुंब पणाला लावले. स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले पण समाज व देशाकडे पूर्ण लक्ष दिले.म्हणून ते अजरामर झाली. घरोघर त्यांची पूजा होत आहे हेच खरे देशाचे नेते आहेत.
माजी राष्ट्रपती डॉक्टर कलाम हे तर देशासाठी अविवाहित राहिले. त्यांना मिसाईल मॅन म्हणून संबोधले जाते. त्यांनी संपत्ती गोळा केली नाही. सारे आयुष्यदेशासाठी समर्पण केले. माजी पंत प्रधान लाल बहादूर शास्त्री हे तर कर्ज बाजारी होते. त्यांच्या गाडीचे कर्ज पत्नीने फेडले.असे हे त्यागी नेते अजरामर होतात हे समाज व देशाचे नेते होत!
लोकशाही प्रणाली मध्ये अनेक नेते निर्माण झालेले असतात. पण
लक्षात राहतात फक्त देश व समाजासाठी त्याग करणारे ! ते बलिदान करण्यास मागे पुढे पाहत नाही. भ्रष्ट मार्गाने संपत्ती
गोळा करत नाही. म्हणून त्यांची
सच्चे नेते म्हणून नावारूपाला येतात. तेच देशाचा विकास घडवून आणतात. समाजाच्या समस्या सोडवून त्यांची प्रगती
करतात. आपल्याला अनेक नेते
दिसतील पण कीर्ती कोण प्राप्त
करतात? कोण अजरामर होतात? सामाजिक नेते म्हणून त्यांचा उदोउदो होतो. असे नेते
जे स्वतःचे हित न पाहता प्रथम
समाज हिताकडे लक्ष देतात.त्यांच्या प्रगती साठी झटतात. समाज एकी साठी प्रयत्न करतात. समाजात शांतता
निर्माण करण्यासाठी झटतात.
समाजातील भेदभाव नष्ट करून
समानता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात. हे खरे समाज नेते! सामाजिक सेवा व कार्य करणारे मसीहा ! समाजाला धीर
देणारे महान कार्यकर्ते! अशा त्यागी कार्यकर्त्यांमुळे देश घडतो.
समाजाची उन्नती होते. विश्वात देशाचे नाव उज्वल होते. आज
आपल्या देशाचे नाव विश्वात
आघाडीवर आहे हे आपणास कबूल करावे लागेल! आर्थिक आघाडीत सुद्धा आपण बराच
पल्ला गाठला आहे. अनेक क्षेत्रात
आघाडीवर आहोत केवळ त्यागी
नेतृत्व लाभल्यामुळे! म्हणून देशाला आज अशा निस्वार्थी नेत्यांची गरज आहे. देश व समाजासाठी झटणारे नेते हेच खरे नेते होय!नेता म्हणजे फक्त नेणारा नव्हे! समाजासाठी देणारा हवा! नेता व सामाजिक कार्यकर्ता यात फरक आहे. नेता हा सामाजिक कार्यकर्ता असू शकतो पण सामाजिक कार्यकर्ता नेता असतोच असे नाही. नेता म्हणजे
समाजातील प्रत्येक व्यक्तीला,घटकाला आपल्या कार्याने प्रभावित करणारा व्यक्ती!
त्यामुळे सर्व घटक त्याच्या भोवती
जमा होतात. त्याची इच्छा, आकांक्षा विस्तारित जाते. समाजाचे नेतृत्व करण्याची त्याची
प्रबळ इच्छाशक्ती असते. सामाजिक कार्यकर्ता , सेवा करणारा समाजाची उपयोगी कामे
करतो. त्यांची प्रगती करत असतो .पण नेतृत्व करण्याची त्याची इच्छा नसते. शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर , महात्मा फुले ह्या थोर
नेत्यांनी व सेवकांनी समाज सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न करून त्यात त्यांना यश आले. यांनी सर्वस्व पणाला लावून समाज व देशात सुधारणा केल्या.
हे खरे थोर नेते व महान समाज
कार्यकर्ते! हे नेतेही होते व समाज
कार्यकर्तेही होते. त्यांनी इतके
महान कार्य केले आहे की त्यांना
समाज ईश्वर रूप मानतात. असे नेते समाजाच्या प्रत्येक ह्रुदयात
स्थान करून आहेत. हेच खरे
नेते होत! नेहमी स्मरणात राहणारे!