जनसामान्याच्या प्रश्न चित्रपटातील वाढते हिंसाचार व अश्लील दृश्ये

जनसामान्याच्या प्रश्न चित्रपटातील वाढते हिंसाचार व अश्लील दृश्ये

बेधडक रोखठोक

नुकतेच प्रदर्शित झालेले चित्रपट ॲनिमल, पठाण, लिओ हे पहाण्यात आले. यात असे दिसते कि कथे पेक्षा हिंसाचारास अधिक
प्राधान्य देण्यात आले आहे. अगदी कमी अंतराने मारामारी ची
दृश्ये दिसतात. त्याच बरोबर उत्तान सेक्सी दृश्ये प्रदर्शित करून
चित्रपटाचे आकर्षण वाढवितात.
हे चित्रपट गर्दी खेचतात. यात तरुणाईचे प्रमाण अधिक असते हे
सांगण्याची गरज नाही. अमुक
चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर इतका गल्ला गोळा केला याची
जाहिरात केली जाते जेणेकरून
चित्रपटाची जाहिरात होत असते.
गुगल मध्ये तर प्रत्येक दिवशी
कोणत्या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर एकूण किती कलेक्शन झाले त्याची आकडेवारी दिली जाते.आज अनेक माध्यमे उपलब्ध आहेत. त्यात सर्वात प्रभावी माध्यम म्हणून चित्रपट चा विशेष गौरव होतो. कारण चित्रपटाचा समाजावर विपरित परिणाम होतो. त्यातील कथेचे, दृष्येचे अनुकरण होते. तरुणाईवर विशेष
प्रभाव पडतो.चित्रपटाचा मिश्र प्रभाव होत असतो. अनेक गुन्ह्यांची नक्कल केली जाते. त्यांचा अभ्यास करून गुन्हेगार गुन्हे करीत असतात. काही समाज उपयोगी संदेश सुद्धा चित्रपट पासून मिळतात.
अनेक तरुण हिंसाचाराचे धडे घेऊन गुन्हेगार प्रवृतिकडे वळतात
हा अनेक समाजांचा अनुभव आहे. तसेच देशात जे बलात्काराची संख्या वाढत आहे
त्यास चित्रपट कारणीभूत आहे .
अत्यंत हिन दर्जाचे अश्लील दृष्यांचा तरुणाईवर त्वरित परिणाम होऊन अवैध कृत्ये करत
असतात.अनेक चित्रपट परिवार बरोबर पाहण्या लायकीचे नसतात. ज्या प्रमाणे खाटीक चाकू सुरा घेऊन जनावरांची कत्तल करतो त्या प्रमाणे नायक खलनायक हत्त्यारे घेऊन माणसांची कत्तल करीत असतात.एकमेकांना उचलून आपटतात. अंगावर रक्ताचे डाग
पसरलेले असतात. क्षणा क्षणाला ही हिंसाचाराची दृश्ये पाहून मानवी मनावर किती वाईट परिणाम होत असतो. आपण चित्रपट पाहायला जातो की भयानक हिंसाचार पाहण्यास जातो हेच कळत नाही. तीच ती
दृश्ये पाहून मनाला किती खोलवर
परिणाम होतो. त्याचाच परिणाम
आजच्या तरुणावर होत आहे हे कबूल करावे लागेल. त्यामुळे गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.पूर्वीचे व आताचे चित्रपटात खूप अंतर आहे. त्यांची तुलना होऊ शकत नाही इतका दर्जा घसरला आहे. आजही जुनी गाणी समाज मोठ्या आवडीने ऐकत असतो. त्यात संगीताची लय आहे. गीतांमध्ये अर्थ आहे. कानाला गोड आवाज ऐकायला मिळतो.मन कसे प्रसन्न होते.सत्तर
आईंशी वर्षे झाली तरी गाणी, संवाद ऐकण्यास आपण उस्तुक असतो. आजची गाणी कुठे विरली जातात पत्ताच लागत नाही.जुन्या कलाकारांचे हावभाव
आजही विसरू शकत नाही .स्त्री
कलाकारांचे ते रडणे, डोळ्यातून
अश्रू टिपकने म्हणजे उच्च दर्जाची कलाकृती पाहणे होते. ही
कलाकारी आज पहावयास मिळत नाही. सारा परिवार बरोबर चित्रपट पाहायला येत असे. मोठ्या खुशीने घरी परत असे. कारण ते चित्रपट उत्कृष्ट दर्जाचे होते..

आजच्या चित्रपटावर आता चोहो
बाजूने टीका होत आहे. आज जे
चित्रपट प्रदर्शित होत आहे त्यात पूर्ण हिंसा भरलेली असते. अश्लील दृश्ये चित्रण झालेली दिसेल ती पण हिन दर्जाची!आजची तरुण पिढी काय आदर्श घेणार! त्यांच्यावर कोणते संस्कार
घडणार हा संशोधनाचा विषय आहे . कोणता उपदेश, संदेश घेणार? बोध घेणार. चित्रपटात तीच ती हिंसा व सेक्सी दृश्ये पाहून समाज काय शिकणार?
म्हणून शासनाने अशा चित्रपटांना
सर्टिफिकेट देताना सामाजिक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे.चित्रपट नगरीला मायावी नगरी म्हणतात. कारण त्यात पैसा आहे, प्रसिद्धी आहे. आकर्षण आहे. चित्रपट निर्माण केला की
करोडेने पैसा जमा करता येतात.
आजच्या काळात अनेक उद्योगपती, मोठे व्यावसायिक
सुद्धा त्यात भांडवल गुंतवून उत्पन्न मिळवित आहेत. सखोल
विचार केल्यास मिळविलेला पैसा
नैतिक दृष्ट्या योग्य आहे का? वाटेल तसे वाईट दृश्ये चित्रित करून समाज जीवन दूषित करीत असतात. त्यात नैतिकता
दिसत नाही. समाजाला वाईट मार्ग दाखवून पैसा ओढत आहेत.
जनता सुद्धा हिंसक दृश्ये पाहून
विटली आहे. आपण अशा चित्रपट पासून काय नैतिकता घेणार? चित्रपट व्यवसायाला आता धंद्याचे स्वरूप आले आहे.
जो समाज हिताचा उद्देश होता
त्यास काळे फासले गेले आहे .
चित्रपट पाहून समाज मनावर प्रभाव पडून गुन्हे वाढत आहेत.
एक प्रकारे दुष्कृत्यांचा उदो उदो होत आहे. त्याचाच प्रभाव टीवी
सिरियल वर पडत आहे. ते सुद्धा
त्याचाच कित्ता गिरवत आहेत.
अवैध सामाजिक कृत्यांना प्रोत्साहन देऊन नैतिकतेची पातळी घसरत आहे.म्हणून समाजाने आता जागरूक होऊन
अशा चित्रपटांचा निषेध करून
अशा हिन दर्जाच्या दृष्यांवर नियंत्रण आणण्यासाठी मागणी करावी. त्यासाठी समाजाच्या सर्व
थरात चळवळ उभारणे आवश्यक आहे. देश व समाज जिवंत राहण्यासाठी नैतिकतेची अत्यंत
आवश्यकता असते.सर्वात जास्त हिंसाचार असलेला चित्रपट ऍनिमल यास आता सिख
समुदाय विरोध करीत आहेत. त्यातील काही हिंसक दृश्ये काढण्याची मागणी करीत आहेत.कारण त्या चित्रपटात हिंसाचाराचे इतके चित्रण आहे की शेवटी ती दृश्ये किळसवाणी
वाटत आहेत. तसेच सिख धर्मगुरू यांच्या काही पवित्र लेखणी वर अनेक हिंसेची दृश्ये
दाखविली आहेत.या मुळे त्यांचे
महत्त्व कमी केल्यासारखे वाटते असे सिख जनतेची संघटनेने निवेदन दिले आहे. अनेक निर्माते,
डायरेक्टर, उद्योगपती , व्यावसायिक यांना चित्रपट म्हणजे कमाईचे साधन आहे असे
वाटते. फक्त खोऱ्या सारखा पैसा
जमा करणे एवढेच त्यांचे ध्येय असते.निर्माण केलेला चित्रपट
समाजाच्या नैतिक पातळी वर हल्ला करीत आहे, आघात होत आहे यांचा विचार करीत नाही .
अशा चित्रपटांचे अनुकरण होऊन
तरुणाई भ्रष्ट मार्ग स्वीकारते व देश रसातळाला जातो. म्हणून
आता जनतेनेच अशा चित्रपटांवर
बहिष्कार टाकला पाहिजे. त्या विरुद्ध आवाज उठविला पाहिजे.

खान्देश सम्राट संपादक हेमंत जगदाळे धुळे

Leave a Comment