एक होता कार्व्हर शेतकरी बांधवानो सावधान
दैनिक पोलीस शोध
संपादकीय
दि.27/12/2023
एक होता कार्व्हर
शेतकरी बांधवानो सावधान !
अधिकाधिक उत्पादनाच्या हव्यासामुळे सर्व कृषी उत्पादक एका विचित्र वळणावर येवून ठेपले आहेत. नैसर्गिक साधन संपत्तीच्या विनाश करणार्या आत्मघातकी मार्गावर हताशपणे चालत रहायचे किंवा परत मागे फिरून कार्व्हरने दाखविलेल्या शाश्वत कृषी संस्कृतीचा स्विकार करायचा हे दोनच उपाय आता उरलेले आहेत. येणार्या काळात भावी पिढ्यांच्या सुख-समृद्धीचा विचार करायचा असेल तर एक होता कार्व्हर हे पुस्तक प्रत्येक शेतकर्याने वाचावे असे आहे.
एक होता कार्व्हर हे जार्ज वाशिंग्टन यांचे चरित्र आहे. कार्व्हर हे थोर शास्त्रज्ञ होते. ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ होते. त्यांनी शेती विषयक क्षेत्रात आपले शिक्षण पूर्ण केले. चित्रकला व इतर कलेत प्राविण्य असूनही त्यांनी पुढील आयुष्यात आपल्या कार्याचा उपयोग आपल्या कृष्णवर्णीय बांधवांना व्हायला हवा या जाणीवतेतून त्यांनी आपले आयुष्य शेती विषयक संशोधनाला वाहुन घेतले. शेगंदाण्यापासून तेल, डिंक, रबर इत्यादी वस्तू तयार करण्यासाठीच्या प्रक्रियांचा त्यांनी अभ्यास केला. त्यानुसार कोणत्याही पदासाठी पैशांच्या मोबदला मिळावा यासाठी हव्यास न धरता ते आपले कार्य करत राहिले. आज कार्व्हर यांचा अमेरिकेला घडविणार्या महानायकांमध्ये समावेश होतो. एक साधा लाजाळू दुबळा निग्रो मुलगा ज्याला धड निट बोलताही येत नव्हते तो स्वकष्टावर आणि दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर विविध क्षेत्रांचे प्रचंड ज्ञान असूनही त्याने शेतकरी होण पसंत केले आणि एका आसोड माळरानाला त्यांनाी नवजीवन दिले. त्या माळरानाला फुलवल होत. ‘माझ्या बाधंवांना माझी गरज आहे’ म्हणत त्यांनी त्या ओसाड माळरानावर नाविन्याची निर्मिती केली आणि बघता-बघता त्यात यशस्वी होत 1940 सालचा ‘महामानव’ म्हणून या त्यांची ओळख झाली. जार्ज डब्ल्यू कार्व्हर यांचा हा प्रवास इतका भन्नाट आणि प्रेरणादायी आहे की ज्या शेतकर्याला शेतीतून नैराश्य आले असेल, शेतीतून कर्जबाजारी झाला असेल, शेती सोडून द्यावी असे वाटत असेल, किंवा शेतीतून मला काहीच मिळणार नाही अशी खात्री पटून आत्महत्या करावीशी वाटत असेल अशा प्रत्येक शेतकर्याने ‘एक होता कार्व्हर’ हे पूस्तक वाचण्याची आवश्यकता आहे, असे आमच्या समाजवादी शेतकरी मित्राला वाटते. तुम्ही कुणाला काही देऊ शकत नाही परंतू त्याच्यात जे मुळातच आहे त्याचा विकास नक्की करू शकतात. या भावनेतून कार्व्हर यांनी लोकांच्या डोळ्यावर असलेल्या ‘डॉलर्स’च्या पट्ट्या काढून त्यांना ‘बघायला’ शिकवल. त्यामुळे ते लोकही डॉक्टर कार्व्हर प्रमाणे चिखलात, मुळात, पाना-फुलात ‘देव’ शोधायला लागले होते. निसर्गाच्या रहस्याच्या मागोवा शोधु लागले होते. सद्य स्थितीत देखील प्रत्येक शेतकर्याला निसर्गाशी आपली नाळ जोडून देवू शकणार्या कार्व्हर यांची नितांत गरज आहे. भारतातील कोणत्याही राज्यात गेलात तरी शेतकरी म्हणतो की शेती परवडेनाशी झाली आहे. मग तो पंजाबचा गहु आणि सरसो पिकविणारा शेतकरी असो की विदर्भातील संत्रा पिकविणारा शेतकरी असो, नाशिक जिल्ह्यातील कांदा, द्राक्षे उत्पादन करणारा शेतकरी असू दे किंवा केळी, कपाशी, उस पिकविणारा महाराष्ट्रातील शेतकरी असू दे शेती कुणालाही परवडत नाही अशी सर्वत्र परिस्थिती आहे. निसर्गात मोठ्या प्रमाणावर बदल झाले आहेत. एकीकडे निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या नुकसाणीला कारणीभूत ठरत आहे. तर दुसरीकडे शेतीची उत्पादकता कमी होत चालल्याने रासायनिक खतांचा, रासायनिक द्रव्यांचा म्हणजे पेस्टीसाईडचा वापर हा फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यासाठी देशभर मोठ-मोठ्या पेस्टीसाईट कंपन्या शेतकर्यांना नको त्या वळणावर नेऊन बसवत आहेत. बी.टी.कॉटन या कपाशीमुळे अमेरिकेच्या एकाभागातील शेतकर्यांना फार मोठे उत्पादन मिळालायला लागलेले असते. त्यामुळे अधिक उत्पादनाच्या मोहात शेतकरी सापडतो आणि वर्षानुवर्षे बी.टी.कॉटनचे बियाणे पेरत असतो. याचा परिणाम असा दिसून येतो की, काही कालखंडानंतर ती जमीन ‘बंजर’ होते. म्हणजे त्यातून कपाशीचे व इतर कोणतेही उत्पादन होत नाही. आणि त्यावर संशोधन सुरू होते. पून्हा रासायनिक द्रव्यांचा वापर केला जातो. परंतू निष्पन्न निघत नसल्याने शेतकरी शेती करणेच सोडून देतात. अशा या काळात जार्ज कार्व्हर या बंजर भूमीवर प्रयोग करायला सुरूवात करतात. अधिक उत्पादनाच्या लालसेतून हा प्रकार झालेला असतो हे कार्व्हर यांच्या लक्षात येते. तेव्हा त्या जमीनीतील संपलेली मुलद्रव्ये निर्माण करण्यासाठी ते हरबरा, भुईमुंग सारख्या पिकांच्या पेरणीला प्राधान्य देतात. ज्यामुळे त्या जमीनीत पून्हा विविध मूलद्रव्ये निर्माण होतात. बंजर जमीनीत कार्व्हर पून्हा ‘नंदनवन’ फुलवितात. नेमका हाच प्रकार भारतात सुरू आहे. जे बियाणे अमेरिकेने पेरणे बंद केले ते बियाणे आज भारतात आम्ही सरेआम पेरतो आहोत आणि खूप मोठ्या प्रमाणावर कापसाचे उत्पादन घेतो आहोत. याला आज किमान 30 वर्षाचा कालखंड लोटलेला आहे. परंतू देशातील कापूस उत्पादनात प्रत्येक वर्षाला घट होतांना दिसते आहे. यावर्षी देशात कापूस उत्पादनात आठ टक्के घट झाल्याचे कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने (सीएआय) यांनी सांगितले आहे. परंतू त्याची कारणे मात्र स्पष्ट केली नाहीत. भारतात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश राज्यात अधिक कापसाचे उत्पादन होते. परंतू या राज्यात देखील कापसाने यावर्षी शेतकर्यांची अपेक्षा फोल ठरविली आहे. त्यामुळे शेतकर्यांनो सावधान. रासायनिक खतांचा अतिरेक, विविध रासायनिक द्रव्यांचा भरमसाठ वापर हा कृषीसह मानवी विनाशाकडे वाटचाल करणारा प्रवास आहे हे लक्षात घ्या. आणि दोन गायी पाळून रासायनिक खतांचा वापर पूर्णपणे बंद करण्याचा संकल्प या नव्या वर्षापासून करा. येणार्या दहा वर्षात भारत सुजलाम सूफलाम झालेला दिसेल. दोन गायींच्या शेणावर पाच एकर शेती करण्याचा प्रयोग सुरू करा आणि आपल्या येणार्या पिढ्यांचे जीवन सुरक्षित व स्वास्थपूर्ण करा.
तुर्तास एव्हढेच…