अस्तित्व

अस्तित्व


नानाभाऊ माळी

अस्तित्व कोशातून जन्म घेत असावं!बीजातून जन्म घेत असावं!गर्भातून जन्म घेत असावं!मातीच्या उदरातून जन्म घेत असावं!तिमिरातून जन्म घेत असावं!प्रत्येक जीव मादी उदरातून जन्म अस्तित्व निर्माण करीत असावा!अंधारातून उजेडाचां प्रवास अस्तित्वाची ओळख असतें!🌹

अस्तित्व पाऊलखुणा मागे ठेवून निघून जातं असतो!माणसाचं जगणंचं मुळी स्वतःचा शोध घेणे असतं! ‘मी कोण आहे ?’ ‘स्व’ ला शोधणे असतं! ‘मी’ चां शोध घेणे असतं!’मी’ अन ‘स्व’ दोन्ही परमात्म्यात विसर्जित होतात!दोन्हीचं अस्तित्व भिन्न असूनही एकत्र येतात!एकजीव होतात!पून्हा विभक्त होऊन आपलं असण्याचा ठोस पुरावा देणे म्हणजेचं अस्तित्वाचा शोध असतो!शोधात ‘स्व’ शोधत जीवन नौका पार पलीकडे निघून जाते!पलीकडे निघून गेल्यावर अलीकडे असणारे ‘त्याचं’ अस्तित्व शोधू लागतात!त्याच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा सापडू लागतात!त्या खाणाखुणा हृदयी कवटाळण्यासाठी अलोट जनसागर लोटू लागतो!🌹

सत्कर्माच्या फळानें अस्तित्वाची भेट होते!भेट चिरकालीन ठसा असतो!प्राचीन काळापासून अनेक महामानव आपल्या हृदयी निवासाला आहेत! त्यांचं अस्तित्व श्रद्धेतून जीवंत आहे!श्रीराम,श्रीकृष्ण,मो.पैगंबर,येशू ख्रिस्त,गौतम बुद्ध,महावीर,गुरुनानक देव.. हे देवात्मे धार्मिक श्रद्धेचां परम गाभारा होते!दृष्टीदाता होते!श्रद्धेयं महाआत्मे होते!त्यांचं ‘असणं’ परम शांतीचा गाभारा होते!🌹

जगातील अनेक आश्चर्य तरी काय आहेत? हे सारे स्मृतीचा ठेवा आहेत!त्यांच्या अस्तित्वाची भेट आहे! येणाऱ्या पिढीस स्मृतीरूपाने ओळख असावी म्हणून त्यांचे अवशेष आजही अस्तित्वात आहेतं!अस्तित्वाच्यां खाणाखुणा दृश्य रूपात जीवंत आहेत!अनेक गड-किल्ले,दुर्ग हे मागील पिढीच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा आहेत!🌹

प्रत्येक प्राणी अस्तित्वासाठी धडपडत असतो!लढत असतो!कधी आक्रमक होतो!कधी चिवट झुंजीतून जीवंत असतो!माणूस सोडला तर इतर प्राणी पोटासाठी जगत असतात!पोट भरलं की पुढील काही काळ विश्रांती घेऊन भुकेल्या पोटी पुन्हा पोटासाठी पळत असणं असतं!याला अस्तित्व म्हणावं का?मनुष्यप्राणी पाट-पोट, भविष्य लोभाने धडपडत असतो!भविष्य सुरक्षित करण्यासाठी झुंजत असतो!यातून अस्तित्वाची लढाई सुरु होते!अस्तित्व टिकविण्यासाठी साम,दाम, दंड,भेद माध्यमाचां उपयोग होत असतो!अनितीनें जग निर्माण करणारा देखील इतिहासाच्या पानावर अस्तित्व टिकून आहे!

रावण-राम,कंस-कृष्ण,दुर्योधन-युधीष्ठ र हे दुरात्मे-देवात्मे चांगल्या-वाईट कर्माचे गुण-तुलनात्मक वजन मापं आहेत!अस्तित्वाचे कंपॅरेटर आहेत!सगुण-दुर्गुणाच्या मोजमापातून दोन्हीचे अस्तित्व मान्य करावं लागतं!त्यातून सर्वहीत गुण घेऊन आनंद घेणे असतं!आत्मिक सगुणात्मक ओढ देवात्म्याशी तादात्म पावते!सगुण अस्तित्व हृदयाच्या तळाशी जावून बसतं!वर वरचां नकोसा गाळ-कचरा फेकून देत असतो!संत अन गुरुजन सगुण दर्शनकार असतात!संत पावित्र्याच्या उजेडाकडे नेत असतात!संत ज्ञानेश्वर,गोरोबा काका,संत नामदेवांनी हाती घेतलेली भागवत धर्माची पताका पुढे जगद्गुरू संत तुकारामांच्या हाती विठ्ठल दर्शन करून देते!दर वर्षी दिंडी पंढरपूर वाटेवर निघते!हे प्राचीन संत परंपरेच अस्तित्व आहे!वारकरी म्हणून आपण त्या पाऊलखुणा भक्तीभावाने जपतो आहोत!🌹

जगातील अनेक शोध नवनिर्मितीचा अविष्कार आहेत!संशोधक
काळासोबत देह ठेवून निघून गेलेत तरी त्यांच्या अस्तित्वाच्या खुणा चिरकाल टिकून राहतील!शोधाच्या उपयोगात संशोधकाचं अस्तित्व सतत जाणवत असतं!🌹

‘असणं’ ही खऱ्या अस्तित्वाची ओळख असतें!संपूर्ण ब्रह्मांड अनाकलनीय अस्तित्वाची ग्वाही देत असतं!काल-स्थलपरत्वे अस्तित्व ठळक किंवा पुसट होत जातं!ब्रह्मांडातील सजीव-निर्जीवांची उत्पत्ती अन निर्मिती साक्षात्कारी असतें!दररोज सूर्य-चंद्र उगवतात,मावळतात!पृथ्वी सूर्यभोवती फिरते!उजेड-अंधार ही अस्तित्वाची रूपं आहेत!मानवी अस्तित्व निर्मितीचं अंग आहे!🌹

‘असणं’ ही अस्तित्वाची खूण असतें!’कसा आहे?’ ही तुलनात्मक बाब आसं लावीत असतें!काळ अन वेळेसोबत अस्तित्व ठळक किंवा पुसट होत जात असतं!पुसट होत जाणे म्हणजे खाणाखुणा पुसल्या जाणे असतं!सदगुणांची पेहरणी करीत जगलो तर अस्तित्वाच्या खुणा जीवंत राहतील!चांगल्या कार्यातून अस्तित्व ठळक होत जातं!आपणही चांगलं वर्तन ठेवून जगलो तर मागील पिढी आपलें सद्गुण गोळा करून जपून ठेवतील!अनुयायी होऊन आपल्याला पूजतील!चांगलं ते देत राहू!वाईट गिळून पचवून घेऊ!संघर्ष अटळ आहे!जग कल्याणा तो केला पाहिजे!आप,तेज,वायू,मृधासं अर्पण होऊन आपलं अस्तित्व ठेवून जाऊ!
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
***********************
… नानाभाऊ माळी
हडपसर, पुणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-३० डिसेंबर २०२३
n

1 thought on “अस्तित्व”

Leave a Comment