यावलमध्ये उभारणार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय

दैनिक पोलीस शोध
संपादकीय…
दि. 24/1/2024

यावलमध्ये उभारणार आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालय !

यावल विधानसभा क्षेत्रात यावल शहरासह तालुक्याचा विकासात भर टाकण्यासाठी आजपर्यंन्त एकाही लोकप्रतिनीधीने ठळक स्वरुपात काम केलेले नाही. त्यामुळे यावल शहरासह तालुका तसाच भकास राहीला, अविकसित राहीला. उलट यावल मतदार संघ पळवून नेण्यात काँग्रेस नेत्यांनी धन्यता मानली.

उत्तर महाराष्ट्रात भाजपाच्या उभारणीत खर्‍या अर्थाने सिंहाचा वाटा कुणाचा असेल तर विरोधक सुध्दा नाथाभाऊ खडसे यांचेच नाव घेतील. जळगांव जिल्हयातील दोन्ही खासदार,14 तालुक्यामधील 12 आमदार भारतीय जनता पक्षाचे निवडून आणण्यासाठी या जिल्हयांच्या गांवागांवात आणि घरा-घरात एकनाथ खडसेनी ज्या पध्दतीने भाजपा कार्यकर्त्यांचे संघटन वाढविले त्याला तोड नाही. एकेकाळी बाळासाहेब चोधरी, जे.टी.महाजन सर, प्रतिभाताई पाटील, एम. के.आण्णा पाटील यांचे नावाचा काँग्रेस पक्षात दबदबा होता. बाळासाहेब चौधरी खर्‍या अर्थाने गांधी विचारांनी जगत होते.

परंतू या व्यक्तिनी जळगांव जिल्हयात काँग्रेस पक्षांची फळी मजबुत करण्यात आपले आयुष्य वेचले. जिल्हयातील दोन्ही खासदार आणि जवळपास सर्वच 14 आमदार काँग्रेस पक्षांचे असायचे हा इजिहास आहे.अशा या काँग्रेसमय जिल्हयात भाजपाचा एक- एक आमदार उभा करण्यात नाथाभाऊंचा वाटा हा सिंहाचाच म्हणावा लागेल. खा. गुणवंत सरोदे यांचे पासून तर ए. टी. पाटलापर्यन्त आणि आमदार हरीभाऊ जावळेपासून तर रक्षाताई खडसे पर्यन्तच्या सर्व नेत्यांना उभे करण्यात एकनाथ खडसेचा वाटा हा पक्ष नेतृत्वाला कळाला नाही. देवेन्द्र फडणवीस हे नाथाभाऊच्या समोर बसतसुध्दा नव्हते एव्हढे ते भाजपातील वरीष्ठ नेते होते. असो. सांगण्याचे तात्पर्य एव्हढेच की जळगांव जिल्हा आज भाजपाच्या ताब्यात असतांना सुध्दा यावल तालुक्याचा विकास हा मागील 40-50 वर्ष वर्षात दहा टक्के सुध्दा झाला नाही. पाल, लगंडा आंबा ही अभरयारण्य आणि पर्यटन क्षेत्र बनविण्यात देखील बाळासाहेब चौधरी यांनी पुढाकार घेतला होता.

परंतू नंतरच्या नेत्यांनी त्यांकडे लक्ष दिले नाही. जळगांव जिल्हयात यावल, चोपडा, रावेर या भागात सिंचन क्षेेत्रात सुध्दा एकनाथ खडसे पाटबंधारे मंत्री असतांना त्यांनी खुप मोठया प्रमाणावर काम केले आहे. मा.आ.रमेश विठ्ठल चौधरी विद्यमान आ. शिरीष चौधरी,भाजपाचे मा.आ.हरीभाऊ जावळे यांनी मात्र वर्षानुवर्षे मतदारांच्या तोंडाला पानेच पुसली. यावल शहरातील राजे निबांळकरांच किल्ला जो पर्यटनाच्या दृष्टीने दुरुस्त करुन पुरातत्व विभागाकडे वर्ग करण्यात येवू शकतो. तसेच भारतातील सुप्रसिध्द व्यासांचे मंदीर याच यावल नगरीत आहे. या मंदीराचा विकास देखील पर्यटनाच्या दृष्टीने करता येवू शकतो. परंतू याकडे लोकप्रतिनीधीनी लक्षच दिले नाही. यावल हे तालुक्याचे ठिकाण असतांना या शहराचा विकास होवू शकला नाही. राज्यकर्त्यांनी होवू दिला नाही. यावल शहरातील पोलीस स्टेशन समोरील भव्य अशा किल्ले सदृष्य चौथर्‍यांवर शिवाजी महारांचा भव्य असा पुतळा होऊ शकतो. परंतू राज्यकर्ताच्या निराशावादी भुमिकेमुळे तो चौथरा जैसे थे स्थितीत पडुन आहे.उलट रावेर,फैजपूर या लहान गावाच्या विकास चांगल्या पध्दतीने झाला.

यावल मतदारसंघ देखील राजकीय षडयंत्रतून पळवून नेण्यात आला. आणि रावेर मतदार संघ करण्यात आला. अर्थात ही खेळी कोणत्या नेत्याने केली हे न समजण्याइतके यावल मतदारसंघातील लोक दुधखुळे नाहीत. या शिवाय जे.जे.नेते होऊन गेलेत ज्यामध्ये बाळासाहेब चौधरी, जे.टी.महाजन यांचे सुध्दा नाव घेता येवू शकते ज्यांनी ज्या विविध शैक्षणिक संस्था उभ्या केल्या, त्या आपल्याच गावात आणि परिसरात सुरु केल्या. बाळासाहेब चौधरी सहकारी साखर कारखाना सुध्दा यावल शहरात किंवा शहराजवळ उभा न करता आपल्याच गांवात उभा केला. त्यामुळे यावल केवळ कागदावर लिहीण्यासाठी तालुका म्हणून उरला आहे. यावल मतदारसंघ ही ओळख सुध्दा काँग्रेसच्या नेत्यांनी पुसन टाकली हे यावल शहरातील नागरिकांचे दुर्देव म्हणावे लागेल. परंतू यावल शहरात 10 कोटी रुपये खर्चुन आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालयात उभारण्यात खा. रक्षाताई खडसे यांनी जो पुढाकार घेतला आहे त्या बदल आम्ही त्यांचे जाहीर आभार व्यक्त करतो. खर्‍या अर्थाने नाथाभाऊंच्या कार्याला, नावाला शोधले अशा प्रकारचे काम रक्षाताई खडसे यांनी केले आहे. 30 खाटांच्या या रुग्णालयासाठी आयुर्वेद महाविद्यालयात देखील सुरु होणार आहे. त्यामुळे जिल्हयातील रुग्ण या रुग्णालयात उपचार घेतील. आयुर्वेदाचे शिक्षण – घेण्यासाठी विद्यार्थ्यांना संधी मिळेल. त्यामुळे यावल शहरात बाहेरुन येणार्‍या शंभर खाटांचे देखील घेऊ शकेल. म्हणून आतापासूनच मोठया जागेची निवड प्रशासनाने करावी.

या शिवाय यावल शहरात व तालुका रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून मीनी एमआयडीची उभारण्याची देखील आवश्यकता आहे. त्यादृष्टीने देखील खा. रक्षाताई खडसे यांनी प्रयत्न करावा. यावल तालुक्यात आदिवासी बांधव देखील मोठया प्रमाणावर राहतात. यावल तालुका असतांना सुध्दा यावल मतदार संघ तर पळवला गेलाच परंतू प्रांत कार्यालयात जे यावल शहरात हवे होते ते सुध्दा फेजपूर सावदा येथे पळविण्यात आले. त्यामुळे प्रशासकीय कार्यालये यावलमध्ये असावीत अशी मागणी यावल मतदार संघातील आणि यावल शहरवासीयांची आहे. याकडे सुध्दा खा. रक्षाताईनी यापुढे लक्ष घालावे अशी जनभावना आहे. आयुर्वेद महाविद्यालय आणि रुग्णालयाची परवानगी मिळाली. असली तरी वर्षानुवर्षे हे महाविद्यालय व रुग्णालय सुरु करण्यात दिरगांई होऊ नये यांची काळजी रक्षाताईनी घ्यावी. जागेचा शोध युध्द पातळीवर घेण्यात येवून ताबडतोबीने रुग्णालय व महाविद्यालय सुरु व्हावे, जेणे करुन मतदारांना दिलासा मिळेल. रक्षाताई या एक तरुण खासदार आहेत. त्यांनी धडाकेबाज कामगिरी करुन यापुढील काळात चांगले काम करावे अशी जनभावना आहे. त्याच्या कार्यासाठी आमच्याही शुभेच्छा. परंतू यावल शहरात एखादा नेता काहीतरी करु इच्छीतो याचा आम्हाला अभिमान आहे. तूर्तास एव्हढेच.

Leave a Comment