bjp maharashtra भाजप आणि खान्देशी नेते

bjp maharashtra

भाजप आणि भाजप मधील खान्देशी नेते!
 
                   भाग पहिला


             भारतीय जनता पार्टीवर प्रादेशिक अधिकार दाखवायचाच असेल तर तो पहिला अधिकार खान्देशचा आहे.


        महाराष्ट्राच्या जनतेची राजकीय मानसिकता बघितली तर ती अशी आहे, वैदर्भीय जनता ही नेहरू गांधी घराण्यावर प्रेम करणारी म्हणजे काँग्रेसवादी होती. या जनतेच इंदिराबाईवर एवढं प्रेम होतं कीं, बाई म्हणतील ती पूर्व दिशा. इंदिरा बोलें विदर्भ डोले. इंदिराबाईनी काश्मीर मधून गुलाम नबी आझाद यांना आणून वाशीम लोकसभेत तीन वेळा उभ केलं, त्यांना वऱ्हाडी माणसांने भरघोष मत टाकून निवडून दिले.

पी व्ही नरसिंह स्वतःचं राज्य आंध्रत पराभूत झाले. त्याना इंदिराबाईनी रामटेक मधून उभे केले. त्यांनाही वऱ्हाडी लोकांनी प्रचंड मतांने निवडून दिले. आणीबाणी नंतर उभादेश इंदिराबाईंच्या विरोधात गेला पण विदर्भ इंदिराजीं सोबत ठाम उभा राहिला. आणीबाणी नंतरच्या लोकसभा निवडणुकीत नंतर इंदिराजिचा दारुण पराभव झाला.

त्यात  जनता पार्टी सत्तेत आली. त्यानंतर काँग्रेस फुटली. अर्धी काँग्रेस इंदिराबाई सोबत तर अर्धी काँग्रेस यशवंतराव चव्हाण यांच्या सोबत गेली. विदर्भातील बडे नेते शंकरावं बोबडे, मधुसूदन वैराळे वगैरे सर्वं चव्हाणा सोबत गेले. पण मतदार मात्र इंदिराजी सोबत होते. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत चव्हानांचे सर्वं दिग्ज नेते पराभूत झाले आणि त्यावेळी नुकतीच कॉलेज मधून बाहेर पडलेली मुलं, सुधाकर गणगाlणे, अजहर हुसेन निवडून आले आणि मंत्रिही झाले.


          प महाराष्ट्रातील जनता काँग्रेसवादी म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील वं शरद पवारवादी होती. काँग्रेसच बोट धरून इथे मोठ मोठे साखर सम्राट वं शिक्षण सम्राट उभे राहिले. त्यांनी तिथला मतदार करकचून काँग्रेस मध्ये बांधून ठेवला. म्हणून ती जनता काँग्रेसवादीच होती. मराठवाड्यातील जनता ही काँग्रेसवादी होती.


         देशात ई सं 1952 लां सार्वजनिक निवडनुका  झाल्या. त्यात जनसंघाला एकही जागा मिळाली नाही. दुसरी निवडणूक 1957 लां झाली यात संपूर्ण देशातून जनसंघाच्या फक्त दोन जागा निवडून आल्या. त्यात एक बलरामपूर जि गौडा उत्तर प्रदेश मधून स्व अटल बिहारी वाजपेयी निवडून आले आणि दुसरी जागा धुळे खान्देश मधून अड. उत्तमरावंनाना पाटील वाघडीकर हे निवडून आले होते. एवढी जूनी साथ आहे खान्देशचीं भाजपला.


        आताही 2019 च्या निवडणुकीत खान्देश मधील सर्वं जागा भाजपलां मिळाल्या. नंदुरबार, धुळे, रावेर, जळगाव, दिंडोरी या पाच जागा भाजपला आणि नाशिकचीं एक जागा भाजपचा मित्र पक्ष शिवसेनेला दिली.


          शिरपूर मध्ये प्रल्हादराव तात्या पाटील हे श्रीमंत शेतकरी होते. ते सतत शिरपूर विधानसभा मतदार संघातून जनसंघातून निवडणूक लढवायचे. त्यांची बरीच शेती या निवडणुकीत विकली गेली पण त्यांनी जनसंघ/भाजप सोडलां नाही. मला वाटत ते एकदा निवडून आले होते. पण ती विधानसभा इंदिराबाईंनी लगेच विसर्जित करून टाकली. असे खूप खान्देशी कार्यकर्ते जनसंघासाठी राबले.


         धुळ्याचे लखन भतवाल म्हणून एक नेते आहेत. त्यांना तर जनसंघाची मुलुख मैदान तोफ म्हणत असत. मी त्यांचं भाषण ऐकलं होतं.  त्यातलं त्यांचं एक वाक्य मला आजही आठवत. प्रचाराचा शेवटचा दिवस होता. पाच वाजता प्रचाराची वेळ संपणार होती.

शिरपूरला पाचकंदील रस्त्यावर सभा होती. शेवटचे वक्ते लखनजीं भतवाल बोलायला उभे होते पाच वाजता पोलिसांनी वेळ संपल्याचा इशारा केला. भतवाल साहेब वरूनच बोलले, माझ्या घड्याळात अजून पाच मिनिट बाकी आहेत. एस टी च्या गाड्या एस टी च्या घड्याळातील वेळे प्रमाणे सुटतील आणि जनसंघाच्या सभा जनसंघाच्या घड्याळाच्या वेळे प्रमाणे चालतील. आणि सभेत हास्याचा स्फ़ोट झाला. असे हजर जबाबी वक्ते आहेत. भतवाल साहेब.


          उत्तमरावं नानां पाटील तर भीष्माचार्य होते भाजपचे. बघू या त्यांच्या बद्दलचीं माहिती पुढच्या भागात.bjp maharashtra Part-2


बापू हटकर