बाय बाय हार्ट अटॅक-नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम एरंडोलला संपन्न

बाय बाय हार्ट अटॅक-नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम एरंडोलला संपन्न

प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरील विश्वविद्यालय, डॉ. सभाजीराजे फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम
एरंडोल (प्रतिनिधी) – येथील रा. ति. काबरे विद्यालयच्या पटांगणावर बाय बाय हार्ट अटॅक आणि नशा मुक्त भारत अभियान कार्यक्रम नुकताच संपन्न झाला.
येथील प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय शाखा एरंडोल आणि डॉ. संभाजीराजे पाटील फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमास मुंबई येथील डॉ. रतन राठोड, डॉ. सचिन परब यांनी मार्गदर्शन केले. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले. कार्यक्रमास बीके पुष्पा दीदी, सविता दीदी, रा. ति. काबरे विद्यालयाचे अध्यक्ष शरदचंद्र काबरे, सेक्रेटरी श्रीकांत काबरे, संभाजी इंगळे सर, मनोज ठाकूर, पुंडलिक पवार (जी) यांचेसह पारोळा-म्हसावद येथील ब्रह्माकुमारी दीदी उपस्थित होत्या.
याप्रसंगी नशामुक्त भारत अभियान कार्यक्रम संपूर्ण देशभर राबवला जावा, तरुणांनी नशामुक्त जीवन जगावे म्हणजे भारत स्वर्णिम भारत होईल. तहसीलदार सुचिता चव्हाण यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना सांगितले. डॉ. रतन राठोड, डॉ. सचिन परब यांनी हार्ट अटॅक टाळायचा असेल तर सात्विक आहार, व्यायाम, मेडिटेशन, सकारात्मक विचारसरणी, स्विकारभाव, साक्षीभाव ठेवून जीवन जगावे जेणेकरून आपण या आजारांपासून लांब राहून तणावमुक्त जीवन जगता येईल असे प्रतिपादन केले. कार्यक्रमास तालूका आणि परिसरातून सुमारे 500 स्त्रिया, पुरुष आणि नागरीक संख्येने उपस्थित होते. सुमारे दोन तास चाललेल्या कार्यक़्रमाचा अनेकांनी लाभ घेतला.

Leave a Comment