उत्तर महाराष्ट्र नको कोकान्हदेश विभाग तयार करा
प्रशासकीय कारणासाठी असलं तरी विभागवार रचना करताना, त्या भागातील भाषा, संस्कृती, खाद्य पदार्थ, वेशभूषा, भौगोलिक सलगता आणि समान समस्या वं समान विकास मुद्दे याचा विचार करूनच विभागवार रचना करावी. भाषावार प्रांत रचना करतानाही हेच मुद्दे लक्षात घेण्यात आले होते. महाराष्ट्रात विदर्भ, कोकण, मराठवाडा, दाख्खन(मानदेश/वायंददेश मिळून), खान्देश असे पूर्वापार विभाग नैसर्गिक दृष्ट्याच तयार झाले आहेत.
यात विदर्भ, मराठवाडा, कोकण हे भाग आहेत तसेच ठेवून विगाग रचण्यात आले आहेत. दख्खनचं पं महाराष्ट्र करून घेतलं आणि दख्खन मधला नगर जिल्हा खान्देशांत टाकून त्याचा उत्तर महाराष्ट्र बनवून घेतला. हे संयुक्तिक नाहीं.
अहमदनगर ऐवजी पालघर जिल्हा खान्देशांत घेऊन वेगळा विभाग तयार करून त्याच नावं कोकान्हदेश असं करता आलं असत. त्यात कोकण ही आहे आणि खान्देशही आहे. आणि ते नावं योग्य आहे.
नंदुरबार, धुळे, नाशिक आणि पालघर याला लागून गुजराथचीं सीमा आहे. या सीमा रेषेच्या दोन्ही बाजूला एक चिंचोळी पट्टी आहे. नंदुरबार पासून पालघर पर्यंतच्या या पट्टीला ही कोकण असेच म्हणतात. या पट्यातील आदिवासीना कोकणा भिल आणि त्यांच्या भाषेला कोकणी बोली म्हणतात. ही कोकणी बोली गोवा किंवा वसई मध्ये बोलल्या जाणाऱ्या कोकणी भाषेपेक्षा वेगळी भाषा आहे. या भाषेच साम्य अहिराणी भाषेसी आहे.
या सीमेवरील डांग जिल्हा हां अहिराणी भाषिक जिल्हा आहे. त्याला सुद्धा कोकणच म्हणतात. हां सर्वं सीमावर्ती कोकण आणि खान्देश एकत्र करून कोकान्हदेश नावाचा नवा विभाग तयार केला तर ते अधिक नैसर्गिक आणि स्वाभाविक होईल.
पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार वं जळगाव या प्रदेशात भौगोलीक सलगते सोबतच इतरही बरेच साम्य आहे. या भागातील संस्कृती एक आहे. इथे रामायण सादर करण्याचा एक लोककलेचा प्रकार आहे. त्याला जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात वन्ह किंवा सोंगे म्हणतात. हाच प्रकार नाशिक जिल्ह्यात आहे त्याला भवाडा म्हणतात. आणि तोच प्रकार पालघर जिल्ह्यात आहे त्याला बोहाडा म्हणतात.
या खेळात रामायण काळातील, रावण, हनुमान, राक्षस वगैरे पात्र मुखवटे घालून नृत्य करतात. त्यातील नृत्य पाचही जिल्ह्यात सारखी असतात. यात वाद्य म्हणजे, संभळ, सूर आणि सनई ही असतात. नाचाच्या पदन्यासही सारखेच आहेत. या प्रदेशातील स्त्रियांची वेशभूषा सारखी म्हणजे स्त्रिया कमरेला साडीचा एक तुकडा नेसतात आणि डोक्या वरून दुसरां तुकडा किंवा फडकी (ओढणी) घेतात.

आखाजी गौरांई हां सण या सर्वं पट्यात सारखा असतो. धुळे जळगाव, नाशिक, नंदुरबार जिल्ह्यात पावरी हे एक स्वर वाद्य आहे. त्याला ठाणे, पालखर जिल्ह्यात तारपा म्हणतात. तारपा आणि पावरी एकच आहे आणि ती फक्त कोकान्हदेश परिसरातच आहेत. ईतर कुठेही नाहीत.
भौगोलिक दृष्ट्या विचार केला तर हां सर्वं डोंगरी भाग आहे. महाराष्ट्रातील अंदाजे 75% आदिवाशी याच पट्यात राहतात. महाराष्ट्रात आदिवाशीसाठी लोकसभेच्या 4 जागा राखीव आहेत. त्यातील 3 जागा याच पट्यात आहेत.
या पट्यात आरोग्य आणि दळणवळणच्या समस्या सारख्याच आहेत. कुपोषित बालके आणि माता याच पट्यात आहेत. त्यांच्या मृत्यूचं प्रमाण सुद्धा सुद्धा याच पट्यात अधिक आहे. त्यांच्यासाठी समान पातळीवर काही आरोग्याचे कार्यक्रम राबाविता येतील. कोकान्हदेशासाठी, कोकण रेल्वे सारखं स्वतंत्र रेल्वे बोर्ड तयार करून यां भागात, लोह मार्ग तयार करता येतील. पाण्याची खूप मोठी समस्या याच भागात आहे. त्यासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ तयार करता येईल.
दार्जिंलिंग हिल कॉन्सिल सारखी सारखी ऍटोनोमस हिल कॉन्सिल तयार करून डोंगरी भाग आणि आदिवाशीसाठी केंद्र सरकार कडून विशेष विकास निधी आणता येईल. त्यामुळे खान्देश वर जो 70 वर्षे अन्याय झाला तो भरून काढता येईल.
बापू हटकर
1 thought on “उत्तर महाराष्ट्र नको कोकान्हदेश विभाग तयार करा”