धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या

धुळे पाणी समस्या

धुळरांच्या डोळ्यातून एवढ पाणी
वहात असताना अजून वेगळी पाणी
  योजना आणायची ती कशासाठी?

धुळे पाणी समस्या
धुळे पाणी समस्या



           हिवाळा नुकताच संपून उन्हाळ्याची सुरवात झाली आहे. तोच धुळ्यातील पाणी प्रश्नाने आक्राळ विक्राळ रूप धारण केलं आहे. धुळ्यात महानगर पालिका विसर्जित होऊन प्रशासकाच्या हाती महानगराची सर्वं सत्ता दिली आहे. प्रशासकाच्या नेतृत्वाखाली धुळ्याचा कारभार सुरु आहे.


        नागरिकांना दूषित पाण्याचा पुरवठा सुरु केला आहे. त्यातून शहरात अनेक साथीचे रोग सुरु झाले आहेत. जनतेला उलट्या जुलाब, सुरु आहेत. त्या सोबतच कावीळ सारखे दुर्धर आजार बळावू शकतात. दूषित घाण पाण्यामुळे किडण्या सुद्धा निकामी होऊ शकतात. लोकांची सरकारी खाजगी रुग्णालयात गर्दी वाढत आहे.


        याचा सर्वात जास्त त्रास गोरगरिबाना सोसावा लागतं आहे. दवाखाण्याचं बील भरणाची अनेकांची ऐपत नाही. त्यांनी काय करावे? श्रीमंत लोक मिनरल वाटर घेऊन जगतील. गरिबांनी कांय करावे? नळाला येणार घाण पाणी पिऊन मृत्यूचीं वाट पहात बसावं त्यांना वाली कोणीच नाही. धुळे पाणी समस्या


प्यास गजबकीं लगी थी पर पानीमे जहर था!
पिते तो भी मरते ना पिते तो भी मरते!!


         ही अवस्था धुळेकराची आहे. नगरपालिका विसर्जित झाली म्हणून कांय झाले? आमदार, खासदार कुठे आहेत? जिल्हा पालक मंत्री कुठे आहेत?विसर्जित झालेले नगरसेवक पदावर नाहीत म्हणून कांय झाले? तुम्ही नेते तर आहात ना? कोणे एके काळी त्यांच्यावर विश्वास टाकून त्यांना भूतकाळात नगरसेवक म्हणून निवडून तर दिले होते ना? मग ते कांय झोपा काढत आहेत का?


       गोरगरीब जनता पाण्यासाठी टाहो फोडत असताना हे सर्वं पुढारी कांय करत आहेत?
        मला तर वाटत धुळ्यातील सर्वं डॉक्टर्सनी एकत्र येऊन प्रशासक, लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन यांचा सत्कार केला पाहिजे. दूषित पाण्यातून शहरात जे भरमसाठ आजार पसरून तुमच्या दवाखाण्यात जीं गर्दी वाढुन त्यातून तुम्हाला उत्पन्नात जीं बरकत वाढत आहे त्याचं सर्वं श्रेय या शासन प्रशानाला जाते. शासन प्रशासनानें शहरात शुद्ध पाण्याचा पुरवठा केला तर तुमच्या कडे येणारा पेशंटचा लोंढा बंद होईल. म्हणून त्यांचा सत्कार करा.


        या दुर्दैशेला शासन, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जेवढे जबाबदार आहेत त्याच्यापेक्षा जास्त जबाबदार धुळेकर नागरिक आहेत. तुम्ही लोक सतत अन्याय सहन करता. त्या विरुद्ध कधीच लढत नाहीत. मुंबई, पुणे, ठाणे, कोल्हापूर, नागपूर, संभाजीनगर सारख्या अफाट लोकसंख्येच्या शहरात उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अशा तिन्ही ऋतुत 24 तास शुद्ध पाण्याचा पुरवठा सुरु असतो, तसा आम्हाला का नाही? हां प्रश्न कधी तुम्ही सरकारलां विचारता का? नगरसेवक, आमदार, खासदार तुमचे सेवक आहेत. खुद्द पंतप्रधान मोदी म्हणतात, मैं जनताका प्रधान सेवक हूं!

मग तुम्ही या सेवकाना धारेवर का धरत नाही? आठ दिवसातून पंधरा दिवसातून एक दिवस गलिच्छ घाणेरड पाणी तुम्हाला देतात, त्या विरुद्ध तुम्ही रस्त्यात उतरून का लढत नाही? पाण्यासाठी संघर्ष करावाच लागेल. त्या शिवाय न्याय मिळणार नाही. अरे दूषित पाणी पिऊन अंथरुणात टाचा घासून मरण्यापेक्षा रस्त्यावर उतरून न्यायासाठी लढून मरा. लोक तुमची पूजा करतील.

संघर्ष, युद्ध, जंग करा!



आस कहे श्वास से, संघर्ष करना शीख!
बिन मांगे मोती मिले, मांगे मिले ना भिक!!


        हे गितेतील वचन आहे.  कृष्णानें अर्जुनालां कुरु क्षेत्रातवर सांगितले मंत्र आहे. युद्ध कर! नामर्दा सारखे रडत राहिलात तर तुमच्या डोळ्यांतील पाणीचं तुम्हाला प्याव लागेल. रडू नका लढा.


रात नही ख्वाब बदलते हैं!
मंजिल नही कारवाँ बदता हैं!
     जज्बा रखो जितनेंकां,
क्यूकी किस्मत बदले न बदले
  पर वक्त जरूर बदलता हैं!


बापू हटकर