60 किलोमीटरच्या आत असलेले टोल नाके बेकायदेशीर
60 किलोमीटरच्या आत असलेले टोल नाके बेकायदेशीर टोल नाके
बेकायदेशीर टोल नाके राष्ट्रीय रस्ते विकास वं केंद्रीय सार्वजनिक बांधकाम मंत्री मां नितीन गडकरी यांचे लोकसभेत प्रतिपादन. सरकार रस्त्या वरील टोल नाके वाहन धरकांची भयंकर लूट करत आहेत. बेकायदा टोल आकारत आहेत. मुदत संपलेल्या, पुलांचा, रस्त्यांचा टोल वसुल करत आहेत. जिथे भरपूर खड्डे आहेत अशा रस्त्यांचेही टोल वसुल करत आहेत. लोकांची सरकार लूट करत आहेत.
टोल नाके जनतेची करतात लुटी
यावर मी एक लेख लिहाच ठरविले होते. पण त्याच्या आधीच केंद्रीय रस्ते विकास आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री नां नितीनजीं गडकरी यांनी या बाबत स्वतः लोकसभेत निवेदन केले कीं, 60 किलोमीटरच्या आत जीं काही टोल नाकी आहेत, ती बेकायदा आहेत.
बरे झाले सोनारानेचं कान टोचले. सरकारी टोल नाके जनतेची करत असलेल्या लुटी बद्दल जे काही सांगणार आहे त्या विषयाला मंत्र्यांच्या निवेदना मुळे बळकटी येणार आहे. कल्याण कडून धुळ्याकडे जाताना भरावे लागणारे टोल रक्कम, या मार्गवर पहिला टोल पडघ्यात भरावा लागतो.
कल्याण कडून धुळ्याकडे जाताना भरावे लागणारे टोल रक्कम
वाहन | टोल रु |
---|---|
1. कार/जीप/वैनी | 140 |
2. एलसीव्ही | 245 |
3. बस ट्रक | 490 |
4. ईतर सर्वं मोठी वाहन | 785 |
पडघा ते पिपंळगाव टोल बेकायदेशीर
पडघा येथे जो टोल घेतला जातो तो पडघा ते पिपंळगाव बसमत या 143 किलो मिटर साठी हां टोल घेतला जातो. आता इथे मुद्दा असा आहे, कोणाला पडघ्या हुन कसारा जायचं असेल, इगतपुरी, घोटी, नाशिक जायचं असेल तर त्यांनी 143 कि मी वरील पिंपळगाव बसमत पर्यंतचा टोल का भरवा? किती भयंकर लूट आहे ही? पुढे पिंपळगाव बसमत ते चांदवड हे अंतर केवळ 36 किलोमीटर आहे. त्यासाठी किती टोल आकरतात ते बघा,
पिंपळगाव बसमत ते चांदवड भरावे लागणारे टोल रक्कम
वाहन | टोल रक्कम (रु) |
---|---|
कार/जीप/वैन | 220 |
एलसीव्ही | 360 |
बस ट्रॅक | 750 |
एक्सएल 3 वाहन | 820 |
एक्सएल 4 ते 6 | 1,175 |
Hcm/eme | 1,175 |
EXL 7 च्या वर | 1,450 |
पिंपळगाव बसमत ते चांदवड या 36 किलोमीटर साठी केवढी मोठी रक्कम आकारली जाते? शिवाय पिंपळगाव बसत ते चांदवड या 36 किलोमीटर वरील टोल नाका हा बेकायदा आहे. स्वतः गडकरी साहेब लोकसभेत म्हणाले दोन टोल नाक्यात 60 किलोमिटर अंतर असावं. मग हां 60 किलोमीटर अंतराचा नियम इथे का लागू होतं नाही.
पिंपळगाव नाक्यावर एवढी मोठी खंडणी भरल्यावर लगेच 36 किलोमिटर वरील चांदवड येथे परत टोल भरावा लागतो. हां टोल चांदवड ते नरडाना या 131 किलोमीटर अंतरासाठी आकारला जातो. इथेही प्रश्न असा आहे कीं, ज्यांना चांदवड वरून उमराणे, मालेगाव, झोडगे, धुळे येथे जायचे आहे त्यांनी नरडाणा पर्यंतचा टोल का भरावा?
गेली अनेक वर्ष या भागातील नागरिक निमूटपणे हां टोल भरत आहेत. टोल कसला ही तर सरकार वसुल करत असलेली खंडणी आहे. त्यातही पिंपळगाव बसमत नाक्या वरील अवाजवी टोल वसुली संशयास्पद आहे. केवळ 36 किलोमीटर साठी एवढी मोठी रक्कम? वरचा चार्ट बघा. भयंकर आहे हे. या विरुद्ध लोकही काही बोलत नाहीत. आंदोलन तर खूप लांबची गोष्ट आहे.
कोल्हापूरकराच टोल आंदोलन
या बाबत आपण कोल्हापूरकराचा आदर्श घेतला पाहिजे. यांनी असा अन्याय कारक टोल भरायला नकार देऊन बरेच दिवस आंदोलन करून सरकारला नमवून न्याय मिळवून घेतला. त्यानुसार मुंबई कडून खांदेशात जाणाऱ्या वाहनानाही जेवढे अंतर जायचे तेवढाच टोल आकारला पाहिजे. कल्याण वरून कसारा इगतपुरी जाणाऱ्या कडून पिंपळगाव बसमत पर्यंतचा टोल नं घेता जेवढं अंतर रस्ता वापरला तेवढाच टोल घ्यावा. स्वतः रस्ते विकास मंत्र्यांचं सुद्धा हेच मत आहे. त्यासाठी खान्देशी लोकप्रतिनिधिनी ही बाब सरकारच्या लक्षात आणून दिली पाहिजे. सरकार ऐकत नसेल तर जनतेने आंदोलन केले पाहिजे.हक्काचं काही मिळावायचं असेल तर संघर्ष हां करावाच लागेल.


यूही शोर मचाना मेरा मकसद नहीं,
यह सुरत बदलनी चाहिए!
हिमालंय से कोई गंगा निकलनी चाहिए!
मेरे दिलंमे नां सही, तेरे दिलमे,
आग कहीना कही लगनी चाहिए!
बापू हटकर
बापूसाहेब हटकर लिखित लेख
महासंस्कृती मोहत्सव भाग-3
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग–4
धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग पाचवा