खान्देश आणी नार पार प्रकल्प

खान्देश आणी नार पार प्रकल्प

आम्ही सामान्य लोक, तुम्ही लोकप्रतिनिधी—आणि नार पार!

भारताच्या लोकसभेचे सार्वभौमत्व हे निर्विवाद आहे, तिच्या वर कोणतीही सत्ता नाही. मात्र, खान्देशच्या जीवनवाहिनीसमोरील प्रश्नावर बोलताना, या सार्वभौम सभागृहात निवडून आलेल्या दोन खासदारांनी केंद्र सरकारमधील जलशक्ति मंत्र्यांना नार पार गिरणा जोड प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला, त्यावेळी मंत्री सी. आर. पाटील यांनी सांगितले की हा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. या निर्णयामुळे खान्देशच्या जनतेमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटल्या, जे स्वाभाविकच होते. परंतु, सर्वात आश्चर्य म्हणजे खान्देशातील लोकप्रतिनिधी मात्र शांत आहेत.

खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत
खान्देश महाराष्ट्राच्या सरकारकडून पडीत प्रांत
खान्देश आणी नार पार प्रकल्प 3



कहर म्हणजे, या गंभीर मुद्द्यावर नागरिकांमध्येही कुठलाही उत्साह नाही. “नार पार रद्द झाली, आता काय?” असा प्रश्न कोणी विचारत नाही. आमदार आणि खासदार देखील सरकारला जाब विचारताना दिसत नाहीत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना एक पत्र लिहून समाधान दिले, पण त्याचा काही अर्थ नाही. देवेंद्र फडणवीस साहेब, माझं आव्हान आहे की, नार पार गिरणा जोड योजना पुन्हा कार्यान्वित केली असेल तर केंद्रीय जलशक्ति मंत्री सी. आर. पाटील यांच्यासह आपण एक संयुक्त पत्रकार परिषद घ्या. सी. आर. पाटील यांनी लोकसभेत खा. भास्कर भगरे आणि खा. अमोल कोल्हे यांना सांगितले होते की हा प्रकल्प रद्द झाला आहे. जर तो निर्णय रद्द करून प्रकल्पास मंजुरी दिली असेल, तर दोघांच्या सह्यांसह एक पत्रक काढा. अन्यथा, आमचा लढा सुरू राहील आणि आगामी विधानसभा निवडणुकीत हा प्रचाराचा मुख्य मुद्दा असेल.

खान्देशी माणसांची मानसिकता तयार झाली आहे, “जे दुन्यान व्हई ते आपल व्हई! कोठे उपाद करत बठो? अर्धी खावो नी घरमा र्‍हावो. लढाई वर जावो नही!”या कातडी बचाव वृत्तीतून खान्देश मागे राहिला आहे. मात्र, माजी खासदार उन्मेषदादा पाटील यांनी ११ ऑगस्टला ४०गाव येथे तातडीची बैठक घेतली होती, ज्यात आतापर्यंत लढलेल्या बहुतेक सर्व संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. परंतु, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांचे प्रतिनिधी गैरहजर होते, जे योग्य नाही. नारपारचे पाणी संपूर्ण खान्देशसाठी आहे, याची जाणीव असणे आवश्यक आहे. या पाण्यामुळे गिरणा, मोसम, बोरी, पांझरा, बुराई या सर्व नद्या बारमाही करायच्या आहेत.

उन्मेष दादांनी या बैठकीत आंदोलनाची पुढील दिशा ठरवली आणि १६ ऑगस्टला प्रांत कार्यालयात मोर्चा काढण्याचे ठरले. मी उन्मेष दादांना विनंती करतो की आंदोलन खान्देश व्यापी करा, तरच त्याचा प्रभाव पडेल. तुमच्या मतदारसंघाच्या चौकटीतून बाहेर या आणि अखिल खान्देशचे नेतृत्व करा.

खान्देशातील लोकांना या विषयावर खूप अज्ञान आहे. तापी खोरे म्हणजे केवळ तापी नदी नाही, तर तिच्या सर्व उपनद्या आहेत. यात उत्तर नाशिक जिल्हा, धुळे, जळगाव, आणि नंदुरबार जिल्ह्यातील सर्व गावांचा समावेश होतो. या सर्वांनी एकजुटीने लढा द्यायचा आहे, कारण एकट्याने काहीही साध्य होणार नाही.

आम्ही मुंबई-पुण्याचे लोक यात सहभागी आहोत. आम्हाला रोज २४ तास नळाचं पाणी मिळतं, पण आमचा जीव खान्देशच्या मातीसाठी तुटतो आहे. म्हणून हा अट्टाहास आहे, भविष्यात खान्देश वाळवंट होऊ नये, म्हणून ही धावपळ आहे.

खान्देशची सोच पगले, मशीत येणार आहे l
खान्देशच्या बरबादीचे मशवरे आहेत जमातीत ll
न समजलात तर मिटून जाल खान्देशकरांनो l
तुमची कहाणीही नसणार कुठल्याच कथांमध्ये ll

बापू हटकर

खान्देश आणी नार पार प्रकल्प 5

Leave a Comment