खान्देशी लोककला जात्यावरच्या ओव्या कानबाई गौरांई लग्नातील गाणी नाटक

धुळे, जळगावातील महासंस्कृती मोहत्सव भाग सातवा

खान्देशी लोककला जात्यावरच्या ओव्या कानबाई गौरांई लग्नातील गाणी नाटक

महासंस्कृती मोहत्सव भाग

महासंस्कृती मोहत्सव बंजारा नृत्य

धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग पाचवा

महासंस्कृती मोहत्सव! भाग-1  

महासंस्कृती मोहत्सव!भाग-2

महासंस्कृती मोहत्सव भाग-3

धुळे वं जळगावातील महासंस्कृती मोहत्सव! भाग4

जात्यावरच्या ओव्या कानबाई,गौरांई, लग्नातील गाणी

जात्यावरच्या ओव्या, कानबाई, गौरांई, आणि लग्नातील गाणी खांदेशात पूर्वापार ही गाणी म्हटली जातं आहेत. त्यावर नृत्य केली जात आहेत. कानबाई गौरांई च्या सणाला झोका बांधतात. कन्हेरे राजा म्हणजे कान्हाराजा खान्देशचा मुलगा आहे. कानबाई(रुखमाई) आणि रानबाई(राई-वनराई) या सुना आहेत. गौरांई ही खान्देशचीं लेकं आहे तर शंकर हा जावई आहे. त्यामुळे कानबाई उत्सावाला सून घरात असावी लागते तर गौरांई आखाजीलां लेक आपल्या घरी असावी लागते. खान्देश मध्ये लेक आणि सून दोघीना देवी स्वरूप पूजल जातं.

कानबाई,गौरांई, गाणी

कानबाई सून म्हणजे आपल्या घराण्याची असतें म्हणून तिचा प्रसाद रोट आपण, फक्त भाऊबंदात खातो. पर कुळातील व्यक्तीला देत नाही. तर गौरांई लेक म्हणजे परक्या कुळातील असल्यामुळे तिचा प्रसाद, शेवया, संजऱ्या, पुरण पोळ्या परक्या कुळातील कोणाही व्यक्तीला खायला देतो. पूर्वीच्या काळी मुलांची लग्न खूप लहान वयात व्हायची. त्यामुळे मुली संज्ञान होई पर्यंत माहेरीच रहात असत. पण कानबाई हां उत्सव सुनेचा असल्यामुळे त्या मुलींना रोट खाण्या पुरतं 2/4 दिवस सासरी आणत असत. हे सण संगीत नृत्याच्या भव्य लोककला आहेत. त्या नष्ट व्हायला लागल्या आहेत. त्या जिवंत रहाव्यात म्हणून सरकारनें प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन कोटी रुपयाची तरंतुद केली आहे.

खान्देशी लोककला
खान्देशी लोककला

गोट कहानी

गोट कहानी पूर्वी रात्रीच्या वेळी काही कारणानें जागारण करायचे असेल, तेंव्हा गोट म्हणजे गोष्ट सांगण्याचा एक लोककलेचा प्रकार होता. कोकणात याला गजाली म्हणतात. खांदेशात एक मुख्य गोष्ट सांगणारा असतो. याला गोठाड्या म्हणतात. याला साथ देणारा एक असतो याला व्हकाऱ्या म्हणतात. त्याच्या हातात एक डफ असतें. गोठाड्या जेंव्हा गाऊन गोष्ट सांगतो तेंव्हा हां व्हकाऱ्या डफ वाजतो आणि गोठाड्या गीत गद्यात उलगडून सांगतो तेंव्हा हां व्हकाऱ्या होकार भरतो. ही गोष्ट रात्रभर चालते. मध्ये विश्रांती, चहा पाणी, विडी काडी साठी गोठाड्या थांबतो. त्या वेळी इतर छोटे गोठाडे मध्यंतरात छोट्या छोट्या विनोदी कथा ऐकवीतात. हां प्रकार आता लुप्त होतं चालला आहे.

पावरी वादन

पावरी वादन आणि नंदीचं मोराच, घोड्याच सोंग*- बागलान भागातील आदिवाशी लग्नात, डोंगऱ्या देव पूजनात किंवा ईतर समारंभात ही कला सादर करतात. यात संबळ, सनई, सूर, आणि डफ वं पावरी(तारपा) ही वाद्य असतात.

अहिराणी नाटक

अहिराणी नाटक हे लोक जागृतीच वं लोक रंजनाचं उत्तम प्रभावी साधन आहे. पूर्वी खान्देशी लोक मुंबई पुण्याच्या मराठी नाटकाची नक्कल करत असत. पण अलीकडे काही लेखकांनी अहिराणी भाषेत नाटक लिहुन सादर करण्याचा प्रघात सुरु केला आहे. अहिराणी भाषा टीकविण्यासाठी अहिराणी नाटकाना प्रोत्साहन दिलं पाहिजे.

खंजीरी एकतारी भजन सवाल जबाब

खंजीरी एकतारी भजन सवाल जबाब खान्देशांत एक तारी भाजनाचा प्रकार मोठा आहे. वारकरी संप्रदायाची भजन अगदी अलीकडे यायला लागली. पण कबीर पंथीय भजने इथे पूर्वापार चालू आहेत.आकाश पांघरूनी जग शांत झोपलेले!

घेऊन एक तारी कबीर गातो दोहे.हे गाणे चांगले प्रसिद्ध आहे. या गाण्यात एकतारी हे स्वर वाद्य असतें  त्याला ताल वाद्य खंजिरी म्हणजे दिमडी असतें. एक तारी एकच असतें तर खंजीऱ्या अनेक असतात. साथीला कधी कधी हार्मोनियम सुद्धा असतें.

कोकणात कलगीतुरा सादर करणारी मंडळ असतात. तसेच घाटावर तमाशात कलगीतूरा हां प्रकार असतो. यांच्यात सवाल जबाबाचा सामना रंगतो. तसा सामनां या एक तारी वाल्या भजनी मंडळात रंगतो. पण आता ही कलांही लोप पावत चालली आहे. ती वाचवली पाहिजे.

तगतरावं

तगतरावं-खांदेशात सर्वत्र ग्राम देवातांच्या यात्रा भरतात. त्याला आम्ही जत्रा म्हणतो. महाराष्ट्रात ग्रामदेवतांचीं पालखी फिरविली जाते. तशी पालखी फिरविण्याची प्रथा खांदेशात मुळची नाही. आता महाराष्ट्राचं अनुकरण करत किरकोळ प्रमाणात पालख्या निघतात.

खांदेशात पालख्याच्या जागी तगतरावाचीं मिरवणूक काढतात. हां तगतरावं म्हणजे एक प्रकारचा रथ असतो. तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या ज्या रथातून पंढरपूरकडे रवाना होतात. तसा रथ म्हणजे तगतराव. यात तमाशा मंडळातील काही गायक वादक, नर्तक बसतात. हे कलाकार वं त्यांचं साहित्य म्हणजे साक्षात सरस्वतीचे रूप मानून त्यांची यात्रेतून वाजत गाजत मिरवणूक काढतात. ही मिरवणूक ग्राम देवतेच्या मंदिरा पर्यंत येते. तगतराव मंदिराला प्रदक्षिणा घालतो. नंतर हे कलाकार यात्रेतील मुख्य चौकात हाजरी करतात. म्हणजे एक दीड तासाचा कार्यक्रम सादर करतात. यावरून तमाशाचा दर्जा कांय आहे ते कळते आणि रात्रीच्या तमाशाला लोक जमातात.

रोडाली

रोडाली-नंदुरबार जिल्ह्यात रोडली नावाचा आदिवाशी भाषेतील तमाशा सादर करतात. तो आदिवाशी भाषेतील तमाशाचं असतो. त्यातही पुरुष नाचे असतात.

भोंगऱ्या बाजार

भोंगऱ्या बाजार- नंदुरबार, धुळे जिल्ह्यातील डोंगरी भागात आदिवाशी मुलामुलींचा स्वयमं वराचा कार्यक्रम असतो. होळीच्या आधी 15 दिवस आदिवाशी बहुल क्षेत्रातील आठवडी बाजारात लग्नाळु तरुण तरुणी नटून थटून येतात. इथे त्यांची लग्नही जुळतात.

श्रीकृष्ण रुक्मिनी आणि अर्जुन सुभद्रा यांचे विवाह असेच जमले होते. पण आता शिक्षणाचा प्रभाव वाढल्यामुळे, ठरवून विवाह होतात. या भोंगऱ्या बाजाराची सांगता होळीच्या दिवशी आपापल्या गावांत केली जाते. होळी पेटवून रात्रभर होळी भोंवती स्त्री पुरुष नाचतात.

नंतर मग पुढे रंग पंचमीचा फाग सुरु होतो. कुठे पाच दिवस तर कुठे 10 दिवस रंग खेळतात. याला फाग म्हणतात. सध्या हां कला प्रकार चांगल्या स्थितीत आहे.

देवकाठी

देवकाठी खांदेशात नवंरात्रीत गावोगावी देवकाठ्या उभारतात. त्यांना कापडी पताका बांधतात. एक प्रकारचे ते उंचचं उंच ध्वज असतात. या देवकाठ्या बहुत करून खंडोबा आणि मरीआईच्या असतात.

त्या देवकाठ्या समोर भगत नऊ दिवस नाचतात. डांगा, डफडा आणि बासुरी वर हे नर्तन चालते. इथे डांग वाजविणारे ओव्या गातात.

बालाजीचा रथ उत्सव

बालाजीचा रथ उत्सव-खांदेशात दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे अश्विन शुद्ध एकादशिला गावोगाव बालाजी म्हणजे बाळकृष्णाचे रथ निघतात. हे रथ तगतराव पेक्षा उंच वं मंदिरा सारखे असतात. ते लाकडी असतात. पारोळा येथील रथ इकडे अत्यंत प्रसिद्ध आहे.

लोकोत्सवांची रेलचेल खांदेशात वर्षभर

या सर्वं लोककला आणि लोकोत्सवांची रेलचेल खांदेशात वर्षभर असतें. इथे आपण 21 लोककला घेतल्या आहेत. आता त्या सर्वं लोककला लोप पावत आहेत. त्यांना वाचविण्यासाठी त्यांचं पुनंर्जीवनं कारण्याठी सरकारनें प्रत्येक जिल्ह्यालां दोन कोटी रुपयांचं अनुदान दिले आहे. पण या दोन कोटी रुपयांचा कसा अपव्यय झाला, त्यावर जळगावचे खासदार मां उन्मेष पाटील यांनी स्टेज वरून अधिकाऱ्यांनचीं कशी खरडपट्टी काढली ती बघू पुढच्या आणि शेवटच्या भागात.

लोकोत्सवांची रेलचेल खांदेशात वर्षभर


क्रमश:
बापू हटकर
 

1 thought on “खान्देशी लोककला जात्यावरच्या ओव्या कानबाई गौरांई लग्नातील गाणी नाटक”

Leave a Comment