खान्देशचा वाळवंट Khandeshi water crisis
तहानलेली रान आणि व्याकुळलेली मन……!
मित्रहोनमस्कार ,
जगात जेंव्हा जेंव्हा क्रांती झाली , तेंव्हा तेंव्हा ती कल्पना कुणाच्या तरी मनात आली. ती त्यांनी इतरांच्या मनात पेटवली नंतर क्रांति झाली.अस म्हणतात “भूक ही शोधाची जननी आहे” त्याच पद्धतीने गरजेची भूक पेटल्यावर माणसांची मन चवताळली आणि नंतरच क्रांती झली.
आज आपण खान्देशचा वाळवंट होताना उघड्या डोळ्यांनी पाहतोय पण आजही आपल्या मनामध्ये या क्रांतीची ज्वाला कुठे प्रज्वलीत होताना दिसत नाही.कुठ झोपलाय आपला खान्देशी माणूस..? झोपला की झोपच सोंग करतोय..? कारण झोपलेल्याला जागे करता येते.
पण झोपच सोंग घेणाऱ्याला नाही.एक गोष्ट लक्षात ठेवा जोपर्यंत आपल्या मनात ही ज्वाला प्रज्वलित होत नाही ती आपण इतरांच्या मनात पेटवत नाही.तोपर्यंत ती प्रत्यक्षात येणे कठीण आहे. ही ज्वाला प्रज्वलित होण्यासाठी आपल्या परिसराचा आपल्याकडे असलेल्या जलसंपदेचा अभ्यास असणं गरजेचं आहे.
ही एक गोष्ट सत्य आहे की खान्देशातील 90% लोकांना आपल्या भागात किती पाणी आहे आणि आपला भाग आजही किती समृद्ध होऊ शकतो याची सुतराम कल्पना नाही. नारपार प्रकल्प काय आहे ..? नारपाल प्रकल्पातून किती पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो..? प्रत्येक तालुक्याला पाच टीएमसी पाणी मिळालं तर तालुक्याची प्रगती कशी होईल..?
पाच पीएमसी पाणी म्हणजे नेमकं किती पाणी…? याच्यामध्ये शेतीसाठी , उद्योगसाठी ,पिण्यासाठी किती पाणी लागू शकते? याचा अंदाजच लोकांना नाही आणि या सगळ्या बाबींसाठी आम्ही वेळोवेळी सांगतोय की उत्तर महाराष्ट्र जल परिषदेसाठी आपण पुढे या..! तर उत्तर महाराष्ट्र जल परिषदेच्या माध्यमातून या सगळ्या बाबींवर प्रकाश टाकून आपल्याला क्रांती उभी करायची गरज आहे ………!
तसेच आपण दुसरा भाग बघितला तापी ही सगळ्यात समृद्ध नदी महाराष्ट्रातून वाहते .तिचा शंभर टक्के भाग हा खान्देशातून आहे . या प्रवाहातून आपल्या वाट्यास जवळजवळ 190 टीएमसी पाणी आले आहे. पण आजही आपण एवढे कपाळ करंटे आहोत फक्त 15 ते 20 टीएमसी पाणी उचलू शकलेलो आहेत .

यापैकी आपण जर हातनूर धरण बघितल तर हातनुर धरणात फक्त तीन ते चार टीएमसी पाणी असत.कारण हे धरण आज रोजी 70 टक्के गाळाने भरलेल आहे .तरीही तीन चार टीएमसी पाणी पाच तालुके समृद्ध करत. तर मला सांगा आपण जर हे नारपारचे २५० टीएमसी पाणी व तापीच्या आपल्या वाट्याच्या पुर्ण पाण्याची मागणी केली ,आणि सरकारने आपण म्हणतोय तसं करून दिल.तर प्रत्येक तालुक्याला पाच टीएमसी पाणी देऊन उर्वरीत पाणी आपण इतर भागांना देऊ शकतो .
एवढी समृध्द जल परिस्थिती असताना आज रानावनात गेलो तर तहानलेलीरान आण पशु पक्षी व माणसांची व्याकुळलेली मन* यामुळे वावटळ उठलेली माळरान जागोजागी दिसतात.गाव हा सगळा प्रकार आपल्याला गाव खेड्यात बघायला मिळतो .आपली गाव समृद्ध व्हायला हवी असतील. गावांमध्ये रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे असेल तर गावांमध्ये पाणी पाहिजे आणि ते पाणी आपल्याकडे आहे .पण लढल्याशिवाय आई सुध्दा बाळाला दूध पाजत नाही.हे तर सरकार आहे नी सरकार तर गेंड्याच्या कातडीचे असते.
झोपच सोंग घेतलेली जनता नी आपले उदासीन नेते यांच्या कात्रीत आज खान्देश आपल्याच वाट्याच्या पाण्यापासून वंचित आहे.अस असच चालले तर आपणास काही मिळणार नाही .आपलं पाणी सगळं इतर नेते व प्रदेश वाहून घेऊन जातील. आपण मात्र झोपा काढू म्हणून खान्देशवासीयांना कळकळीचा आवाहन की आपण जलक्रांतीत सहभागीव्हा …
फक्त व्हाट्सअप वर मेसेज करून फायदा नाही. प्रत्यक्ष सहभागी व्हावं लागेल, जलक्रांतीचा धागा व्हाव लागेल, तन मन धनाने या चळवळीत सहभागी झाले तर आणि तरच खान्देशचे भविष्य उज्वल आहे .मित्रहो सर्व आपल्या हातात आहे आपल्या पुढच्या पिढीकडे जलसमृद्ध कान्हदेश सुपूर्त करायचा की खान्देशचा वाळवंट………?
आज पासून एकच मिशन समृद्ध सक्षम संपन्न खान्देश
Khandeshi water crisis by
आपलाच स्नेहांकित
विकास पाटील
जलचिंतनातुन जलसिंचनाकडेआणि जलसिंचनातुन जलमंथानाकडे गेलात तर खान्देशला नार पार चे हक्काचे पाणी मिळेल


1 thought on “खान्देशचा वाळवंट Khandeshi water crisis”