महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीकडे? महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम!

महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम

महाराष्ट्राची वाटचाल गुलामगिरीकडे? महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम!

### भारतीय उलेमा बोर्डाच्या मागण्यांचा महाविकास आघाडीला स्वीकार? 

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने (काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना – ठाकरे गट) भारतीय उलेमा बोर्डासोबत चर्चा करून प्रचारासाठी सहकार्याचे आश्वासन दिले आहे. परंतु, या कराराला काही अटी जोडल्या गेल्या आहेत. उलेमा बोर्डाच्या या अटींमध्ये – 

– मौलानांना दरमहा पंधरा हजार रुपये मानधन 
– दंगलीतील मुस्लिम आरोपींना सोडविणे 
– वक्फ बोर्डाला सहकार्य 
– विधानसभेत ५० मुस्लिम उमेदवारांना तिकीट 

महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम
महाविकास आघाडीच्या मुस्लिम संघटनांशी कराराचा मोठा परिणाम



या मागण्या स्वीकारल्यास महाविकास आघाडी सरकारच्या कार्यपद्धतीवर मुस्लिम संघटनांचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. 

### वक्फ बोर्डाचा वाढता प्रभाव: महाराष्ट्रावरही परिणाम होणार का? 

देशातील वक्फ बोर्ड अनेक भूखंडांवर हक्क सांगत आहे. दिल्लीतील नवी लोकसभा इमारत, सर्वोच्च न्यायालय, तसेच इतर अनेक जमिनींवर वक्फ बोर्ड दावा करत आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यास वक्फ बोर्डाच्या मागण्यांवर सकारात्मक विचार होईल का? यामुळे राज्यातील अनेक ग्रामीण भाग, घरे, दुकाने धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

### धार्मिक स्वातंत्र्याला धोका? 

महाराष्ट्रातील सण आणि उत्सव जसे गणेशोत्सव, शिवजयंती, दिवाळी हे मोठ्या प्रमाणावर साजरे केले जातात. परंतु, कट्टर मुस्लिम संघटनांच्या विरोधामुळे धार्मिक मिरवणुका, भजन, गुलाल अशा कार्यक्रमांवर निर्बंध येण्याची भीती व्यक्त होत आहे. 

याआधी अनेकदा मिरवणुकांवर दगडफेक झाल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. महाविकास आघाडी सरकार कट्टर धर्मगुरूंच्या दबावाखाली इतर धर्मांच्या सणांवर बंधने घालेल का, असा प्रश्न निर्माण होतो. 

### जातीय सलोख्याला धोका? 

मुस्लिम संघटनांच्या दबावामुळे राज्यात जातीय सलोखा बिघडण्याची भीती आहे. जातीय दंगली आणि गुंडगिरी वाढण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे. धार्मिक कायदे आणि शरीयत अंमलात येण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. 

### महाविकास आघाडी सरकारचा देशासाठी धोका? 

महाविकास आघाडी सरकार सत्तेसाठी कट्टर मुस्लिम संघटनांच्या मागण्या मान्य करून शासन चालवेल का? 

– “वंदे मातरम्,” “भारत माता की जय,” “जय भवानी,” “जय शिवाजी” यासारख्या घोषणा महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रमांमध्ये ऐकायला मिळतील का? 
– गुन्हेगार प्रवृत्तीला पाठीशी घालणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्यास सरकार सक्षम असेल का? 

### महाराष्ट्राचा केरळ, बंगाल होऊ नये! 

जर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले, तर महाराष्ट्राचा केरळ, बंगाल, कर्नाटक किंवा कश्मीरसारखा हाल होऊ नये, ही महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे. 

**लेखक: हेमंत जगदाळे, खान्देश सम्राट संपादक, धुळे**