मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व

मार्गशीर्ष महिन्याचे महत्त्व

मार्गशीर्ष महिना हा भगवान श्रीविष्णूचा आवडता महिना आहे. या महिन्यात विष्णूची जी जी पूजा पाठ केली जाते त्याचे अगणित पुण्य मिळते.

या महिन्यात लक्ष्मीपूजा करून त्या देवीजवळ तिच्या प्रिय म्हणजे विष्णूच्या नाम मुखात राहू दे व त्या देवाची सावली सतत माझ्यावर राहू दे हे मागावे

विष्णूचे राम कृष्ण अवतार आहेत. या पैकी कोणत्याही देवाची पूजा ही विष्णूला मिळते.

या महिन्यात रामरक्षास्तोत्र, विष्णुसहस्त्र नामावली, भागवत ग्रंथ, भगवतगीता वाचावी.
यामुळे विष्णु भगवान प्रसन्न होवून मनातल्या इच्छा पूर्ण होतात. या महिन्यात जास्तीजास्त नामस्मरणाकडे ध्यान द्यावे. नामाने त्या देवाची शक्ति आपल्या घरात वास करते. तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करा ती पूजा विष्णूलाच मिळते. कारण देव हां एकच असून प्रत्येक देव विष्णूची रुपे आहेत. म्हणजे सोने हे एकच आहे पण त्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दागिने बनविले जातात पण मूळ सोने प्रत्येकात एक आहे.

म्हणुन या महिन्यात
लक्ष्मीपूजन, चंपाशष्ठी,
दत्तजयंती, गीताजयंती हे सण असतात. ह्या महिन्यात खोटे बोलणे, इतरांची निंदानालस्ती करणे, मनात द्वेष तिटकारा करणे टाळावे. त्यामुळे आपले जेवढे पूजा पाठ आहेत ते फळाला येत नाही. जास्तीत जास्त मौन पाळण्याच प्रयत्न करावा. त्याने मानसिक शांती मिळते.

ॐ नमो भगवते वासुदेवाय

या मंत्राचा जप करावा. ह्या मंत्रात इतके सामर्थ्य असते की मनातली वासना, वाईट विचार निघून जातात. त्यामुळे माणसाच्या हातून वाईट कर्म होत नाही.
भगवद्गीता वाचतांना त्या श्लोकाची एक एक शक्ति माणसाला नवसंजीवनी देते. त्यामुळे त्याच्या मनात नेहमी इतरांविषयी आदर राहून वाईट वृत्ती होत नाही पण हे सर्व करत असतांना आपले मन स्वच्छ ठेवावे. देवाचे नाम घेतांना फक्त नामाचा विचार करावा बाकी आपला वेळ देवाच्या स्मरणात घालवावा.
कारण ह्या महिन्याचे पूजा पाठ मनुष्याला सुख शांती समाधान देवून मनातील वासना घालविते. तीच शक्ति माणसाला जगण्याचे धैर्य व बळ देते. कारण ह्या महिन्याची वैशिष्ठ्येच तशी आहेत. ह्या माहिन्यात मन स्वच्छ ठेवल व नुसते नामस्मरण केले तरी त्याची पुण्याई मोठी आहे. सगळ्या महिन्यातला सर्वश्रेष्ठ महिना आहे.
मार्ग म्हणजे जीवनाला वेगळा आकार देऊन मनातली वासना दूर करणे व शीर्ष म्हणजे मन व आत्मा नितळ स्वच्छ झाल्यामुळे ती देवाला अर्पण करणेे म्हणजे मार्गशीर्ष.
म्हणून तन मनाने त्या देवाची एकनिष्ठेने पूजा करा.
कोणालाही काया वाचा मनाने दुखवू नका. गरीबांना पैसे, वस्त्र अन्नाची मदत करा. माणसात देव पाहणे हीच खरी विष्णुपूजा आहे.
कारण प्रत्येक आत्म्यात तोच विष्णु वास करतो. त्या विष्णुमुळे आपले शरीर हे जीवंत आहे हे विसरु नका. म्हणून पूजा पाठाबरोबर माणुसकीचाही धर्म पाळा म्हणजे नक्कीच ती पूजा विष्णूला मिळेल…कारण तिच खरी ईश्वर सेवा आहे…..!!


ॐ नमो भगवते वासुदेवाय हर हर महादेव!!

Leave a Comment