Political maneuvers impacting Khandesh खान्देशच्या हक्कांची पायमल्ली
“घरचा भेदी लंका जाळीतोय: खान्देशच्या हक्कांची पायमल्ली”
घरका भेदी लंका ढाही
काल नागपूर अधिवेशन संपले आणि मंत्रीमंडळातील खात्यांची खिरापत पण सुध्दा वाटण्यात आली. कुणाला काय मिळाले? ह्या पेक्षा खान्देशला काय मिळाले? खान्देश सह उत्तर महाराष्ट्राने महायुतीला जबरदस्त कौल दिला. मंत्रीमंडळात सुध्दा खान्देश सह उत्तर महाराष्ट्रला मंत्रीपदे चांगली मिळाली.
परंतु खान्देशला जर मुख्यमंत्री पद नाही मिळाले, तर खाती तरी चांगली मिळायला हवी होती. परंतु खान्देशातील नेते मिळेल त्याच्यावर कोंडे खुशाल आहेत.

खान्देशातील ज्वलंत विषय म्हणजे पाणी, रोजगार, वीज, उद्योग, शिक्षण, आरोग्य हे आहेत. परंतु जलसंपदा खाते मिळाले ते सुध्दा विभागून दिले गेले. गंमत म्हणजे केंद्र सरकार आणि राज्य सरकारला खान्देशला काहीच द्यायचे नाही. कारण ह्या प्रांतातील नेते षंढ आहेत, म्हणजेच षंढ राजाची प्रजा षंढच असणार याच्यात अजिबात दुमत नाही.
खान्देशातील सिंचणाचा आणि पिण्याच्या पाण्याचा ज्वलंत विषय आहे. तो बिकट होत चाललाय.केंद्राने खान्देशी नेत्याला जलशक्ती मंत्री बनवुन बरोबर खान्देशचे वाळवंट करायचे ठरविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अगदी बरोबर गेम केला आहे, तो खान्देशी लोकांच्या लक्षात यायलाच हवा.

जलसंपदा हे खाते बरोबर दोन विभागात विभागून टाकले आणि दोन मंत्री दिले. गिरीश महाजन हे त्यांच्या मर्जीतले असल्याने तसेच विदर्भातील प्रकल्प त्यांना येणाय्रा पाच वर्षात पूर्ण करायचे असल्याने त्यांनी तापी खोरे आणि विदर्भाचे जलसंपदामंत्री गिरिश महाजन यांना केले आहे.
कारण गोदावरी खोरे, कृष्णा खोरे सह कोकण विभागाचे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्याना भिक घातली नसती म्हणून अगदी बरोबर गिरीश महाजन यांना विदर्भाचा जलसंपदा विभागाचे खाते दिले आहे. विदर्भातील पाच जिल्ह्यांना जोडणारा ५५० किलोमीटर चा ८५ लाख कोटीचा जलसिंचन प्रकल्प त्यांना पूर्ण करायचा आहे. म्हणजे मोदींनी सी आर पाटील यांना जलशक्ती मंत्री बनवुन खान्देशातील पाणी पळवायचा बरोबर नियोजन बद्ध कार्यक्रम आखलेला आहे. आणि तसाच करेक्ट कार्यक्रम फडणवीस यांनी केला आहे
सी आर पाटील हे गुजरातचे मीठ खातात म्हणून नैसर्गिक पणे गुजरातची बाजू घेतील. पण गिरीश महाजन हे फडनवीसचे उजवे अजिबात नाहीत, पण डावे हात नक्की आहेत म्हणुन फडणवीस यांना खात्री आहे की महाजन धु म्हटल्यावर धुतील लोंबतय काय? ते अजिबात विचारणार नाहीत.
खान्देशातील जनतेने आता जागृत झाले पाहिजे. खान्देशातील नारपार गिरणा नदीजोड प्रकल्प असेल, बाकी सिंचणाचे प्रकल्प पूर्णत्वास न्यायचे असतील तर जागल्याची भूमिका घेवून गिरिश महाजन यांना ते करण्यास भाग पाडले पाहिजे.
तसेच अमरावतीचा काॅटन हब पूर्ण करण्यासाठी बरोबर खान्देशातीलच संजय सावकारे यांना वस्त्रोद्योग खाते देवुन डाव साधला आहे. हे सर्व नियोजीतपणे साधलेला डाव आहे. पण आमचे दुर्दैव आहे की घरचा भेदीच लंका जाळीत आहे
प्रवक्ता
खान्देश हित संग्राम
Political maneuvers impacting Khandesh and the need for public awareness and accountability from local leaders.
