सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष ओळख

डॉ सुधीर देवरे अभिनंदन! आ. कुणालबाबा पाटील आभार!
 
          दि 25 फेब्रुवारी 2024 रोजी नेर ता जि धुळे इथे सातवे अहिराणी साहित्य संमेलन भरणार आहे. त्या संमेलनाच्या अध्यक्षपदी जेष्ठ अहिराणी/मराठी साहित्यिक, थोर भाषा तज्ज्ञ, विचारवंत मां डॉ सुधीर देवरे यांची निवड झाली आहे. त्याबद्दल डॉ सुधीर देवरे साहेबांच अभिनंदन!निवड समिती आणि आयोजकानी योग्य व्यक्तीची म्हणजे मां डॉ देवरे यांची निवड केली म्हणून आयोजकाचं कौतुक.
          युनेस्कोने सर्वं देशांच्या राष्ट्र प्रमुख यांना आदेश दिले आहेत कीं, जगातील कोणतीही भाषा मरू नये. त्या बरहुकूम पद्मश्री मां गणेश देवी सर यांनी संपूर्ण आयुष्य बोली भाषासाठी वाहून घेतले आहे. त्यांच्या खांद्याला खान्दा लावून डॉ सुधीर देवरे हे बोलीभाषा वाचविण्यासाठी काम करीत आहेत.आदिवाशी भाषा मासिक ढोल याचे डॉ देवरे संपादक आहेत. तसेच ऑनलाईन अहिराणींना आगाजा याचेही ते विद्यमान संपादक आहेत. डॉ देवरे यांची साहित्य क्षेत्रात खूप मोठी कामागिरी आहे.


डॉ. सुधीर राजाराम देवरे यांचा अल्प परिचय

भाषा, कला, लोकजीवन आणि लोकवाड्.मय यांचे अभ्यासक.
साहित्यिक, समीक्षक, संशोधक, संपादक.
अहिराणी भाषा संशोधक, अहिराणी लोकसंचितावर लेखन.
‘ढोल’ आणि ‘संपृक्त लिखाण’ या नियतकालिकांचे संपादक.
सदस्य, महाराष्ट्र राज्य लोकसाहित्य समिती.
महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार प्राप्त साहित्यिक.
नाव: डॉ. सुधीर राजाराम देवरे जन्म तारीख २९ एप्रिल १९६३
शिक्षण :विद्यावाचस्पति – एम. ए. पीएच. डी. (मराठी, पुणेविद्यापीठ, १९९८)


ग्रंथ लेखन

1 डंख व्यालेलं अवकाश, मराठी कविता संग्रह,
2. आदिम तालनं संगीत, अहिराणी कविता संग्रह,  
3. कला आणि संस्कृती : एक समन्वय, संदर्भ ग्रंथ, जुलै २००३, मुंबई येथील लोकमान्य सेवा संघाचा मा. सी. पेंढारकर पुरस्कार, २००२- २००३  
4. पंख गळून गेले तरी, आत्मकथन, स्मिता पाटील पुरस्कार. 
5. अहिराणी लोकपरंपरा, संदर्भ ग्रंथ -संकीर्ण, ३  डिसेंबर २०११, ग्रंथाली प्रका‍शन, मुंबई.
6. अहिराणीच्या निमित्ताने : भाषा,
     पुणे. महाराष्ट्र शासनाचा नरहर कुरुंदकर भाषा पुरस्कार.
7. अहिराणी लोकसंस्कृती, संदर्भ ग्रंथ,
8. अहिराणी गोत, अहिराणी दर्शन, ७ मार्च २०१४,
9. अहिराणी वट्टा, अहिराणी कथा, ७ मार्च २०१४,
10. माणूस जेव्हा देव होतो, चरित्र,
11. सहज उडत राहिलो, आत्मकथन, १ ऑक्टोबर २०१६, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई.
12. सांस्कृतिक भारत, राज्यनिहाय लेख, १५ डिसेंबर २०१७,
13. माणसं मरायची रांग, कथासंग्रह, १ जानेवारी २०१९,
14. मी गोष्टीत मावत नाही, कादंबरी, २५ फेब्रुवारी २०१९,
15. टिंब, कादंबरी, १५ ऑगष्ट २०१९,
16. आस्वाद : भावलेल्या कवितांचा, समीक्षा, मार्च २०२०,
17. ब्लॉगच्या जाळ्यातून जग, लेखसंग्रह, २५ सप्टेंबर २०२०,
18. Melodies with a Primitive Rhythm, Translation in English by Rajeev Kulkarni, 7 April 2021, Notion Xpress Publication, Chennai.
19. आदिम तालाचं संगीत, मराठी भाषांतर, स्वत:, १०  एप्रिल २०२१,
20. सोन्याची शाळा, कादंबरी, नोव्हेंबर २०२१,   
21. जठे नही येकी, अहिराणी अहिराणी बालकथा संग्रह, 27
22 अहिराणीमा आयकेल गोष्टी, अहिराणी बालकथा, 22 ऑगष्ट 2022, नोशन प्रेस प्रकाशन, चेन्नई.
23. भंग अभंग, कवितासंग्रह, 1 ऑगष्ट 2022,
24 फुटूच लागतात पंख, कवितासंग्रह, 1 ऑगष्ट 20
25 अहिराणी : भाषा, परंपरा आणि संस्कृती, 5 नोव्हेंबर 2022,
26. भाषा : व्याप्ती आणि गंड, 5 नोव्हेंबर 2022,
27. सायकोचा तिढा, मार्च 2023,
28. भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण: महाराष्ट्र (17 ऑगष्ट 2013), पद्मगंधा प्रकाशन, पुणे.  यात प्रत्यक्ष सहभाग आणि अहिराणी भाषा
वरील दीर्घ लेख. इतर आगामी.


संपादित ग्रंथांत योगदान

१) खानदेशचा सांस्कृतिक इतिहास (खंड-३): संपादक : डॉ. मु. ब. शहा,
का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, धुळे, जानेवारी-२००४, लेख:अहिराणी भाषा : उत्पत्ती आणि इतिहास.
२) जनस्थान: नाशिक येथील ७८ वे अ.भा. मराठी साहित्य संमेलन स्मरणिका,संपादक मंडळात सहभाग (जानेवारी २००५),
         लेख : अहिराणी भाषक लोकजीवन व लोकपरंपरा.
३) लोकजीवन आणि लोकसंस्कृती : संपादक : डॉ. द. ता. भोसले
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई, प्रकाशन वर्ष २००५), लेख: आदिम जीवन आणि लोकसंस्कृती : एक अनुबंध.
४) लोकायन : संपादक : डॉ. रमेश वरखेडे  (लोकायन, लोककला साहित्य संमेलन, स्मरणिका, नाशिक, वर्ष : १९९५ ), लेख : घुमरे: अहिराणी भाषक आदिवासी.
५) पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया: संपादक: डॉ. गणेश देवी,  लेख: अहिराणी भाषा.     

                                                     
आगामी:

१. सृजनसंवाद  (द.ग. गोडसे यांची पत्रे) संपादित
        २. फूल आणि फुलपाखरू (नाटक)
        ३. उंदरांचा संसार  (नाटक)
     ४. मला माहीत नाही (नाटक)
        ५. मर्मभेद  (लेखसंग्रह)


  पुरस्कार

तुका म्हणे पुरस्कार, बुलडाणा (वर्ष २०००)
     मुंबई (वर्ष २००२-२००३)
     महाराष्ट्र शासनाचा गुणवंत पुरस्कार ( वर्ष २००८ )
     उत्तर महाराष्ट्रातील सांहित्यिकांसाठी असणारा कानुश्री पुरस्कार, धुळे (वर्ष २०००)
     Nasio (नॅसिओ) या संस्थेचा राष्ट्रीय पुरस्कार, (वर्ष २०१५)


चर्चासत्र

केंद्रीय साहित्य अकादमी दिल्ली या संस्थेच्या वतीने राष्ट्रीय पातळीवरील चर्चासत्रात सहभाग:  
    १. कलकत्ता: मिडनापूर – लोकसाहित्यावर निबंध सादर. (मार्च १९९८)
    २. बडोदा: छोटा उदयपूर – लोकसंस्कृतीवर निबंध सादर. (ऑक्टोबर १९९७)        
    ३. बडोदा : महाराजा सयाजीराव विद्यापीठात अहिराणीवर निबंध सादर. नोव्हेंबर १९९९)
    ४. भोपाळ  : राष्ट्रीय मानव संग्रलयातील आंतरराष्ट्रीय कृतीसत्र- टापऱ्या गव्हाऱ्याची कला सादरीकरण. (बंधारपाडा ता.बागलाण येथील आदिवासी कलाकार, १९ ते २४ जानेवारी २०००)                                            
    ५. दिल्ली  : अहिराणी का भविष्यकाल – लोक अधिकार परिषद, अध्यक्ष : महाश्वेता देवी दिनांक १०-१२-२००१.


         त्यांची प्रचंड ग्रंथ संपदा, मुंबई, पुणे, नागपूर, गोवा, चेन्नई, कोलकत्ता येथील नामांकित प्रकाशन संस्थानी प्रकाशीत केली आहेत.

सरस्वती पुत्राची 7 व्या अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी निवड

एव्हढं समृद्ध साहित्य जीवन जगणाऱ्या सरस्वती पुत्राची 7 व्या अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष पदी निवड यापेक्षा श्रीमंत गोष्ट दुसरी नाही. डॉ देवरे साहेब आपलें पुन्हा पुन्हा एकदा अभिनंदन!

स्वागताध्यक्ष मां आ कुणालबाबा पाटील


       हे साहित्य संमेलन सलग तिसऱ्यांदा धुळे तालुक्यात होतं आहे. त्याचे स्वागताध्यक्ष मां आ कुणालबाबा पाटील यांचं आभार यासाठी कीं, अशी मोठी काम राजश्रय असल्या शिवाय घेता येत नाहीत. कुणालबाबा नी तर धुळ्यात सलग तीन अहिराणी संमेलन घेतली. पाचव्या आणि सातव्या संमेलनाचे स्वागताध्यक्ष स्वतः कुणालबाबा होते तर 6 व्या संमेलनाच्या स्वागताध्यक्ष कुणालबाबा यांच्या सौभाग्यवती होत्या. भाषेवरील प्रेमापोटी सलग तीन संमेलने भरविणारे आ कुणालबाबा पाटील हे एकमेव उदाहरण आहे. म्हणून मी कुणालबाबाचं आभार मानतो.

खान्देश साहित्य मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी


      त्यानंतर ही संमेलन भरत राहवीत यासाठी सतत पाठ पुरावा करत सलग तीन अहिराणी भाषिक संमेलन यशस्वी करून दाखविणारे खान्देश साहित्य मंडळाचे तरुण अध्यक्ष प्रा डॉ सदाशिव सूर्यवंशी यांचे सुद्धा कौतुक केले पाहिजे. त्यांच्या कर्तृत्वात अजून एक चवथा तुरा लागला तो म्हणजे त्यांनी मराठी साहित्य क्षेत्रात एक नवी परंपरा सुरु केली आहे. ती म्हणजे अखिल भारतीय एल्गार मराठी गझल संमेलन अंमळनेर इथून सुरवात केली.


        आसां यां माय अहिरानीना 7 वा संमेलनले मन्या लाख लाख शुभेच्छा!
बापू हटकर


 

सातवे अहिराणी साहित्य संमेलन अध्यक्ष

अनाथांचे देवरुप घर श्री शंकरबाबा पापडकर

मुलींच्या शिक्षणाची चिंता मिटली पालकांनो आपल्या मुलींना खुप शिकवा

लवकर निजे लवकर उठे त्यास ज्ञान संपत्ती मिळे

शुन्य वाहे भार शुन्याचाच

कस्तुरीगंध श्रद्धा उंचावणारा कथासंग्रह

महाराष्ट्रात गुटका बंदी कशासाठी ?

Khandesh Vahini