दोन वर्षांची ट्रेकर अयुश्री

दोन वर्षांची ट्रेकर अयुश्री 3

अवघी दोन वर्षांची ट्रेकर-अयुश्री

नानाभाऊ माळी

अयुश्री! ४ वर्ष वयाची चिमुकली मुलगी!चुनचूनीत इवलीशी कुकुळबाळ!दोन वर्षांपूर्वी आपल्या मम्मी-पप्पांसोबत ‘चला जाऊया गड किल्ल्यांवर’ या साहसी मोहिमेत सहभागी झाली!वयाच्या २ ऱ्या वर्षांपासून ट्रेकिंगला येत असलेली अयुश्री मोहिमेतील सर्वात लहान ट्रेकर म्हणून नाव नोंदविलें गेले आहे!

गडकिल्ल्यांवर चढणे,मुळातचं साहसी प्रकार आहे!प्राचीन काळी किल्ला चढणे,लढणे,जिंकणे आणि सत्ता मिळविणे अशी उर्मी-जिद्द असायची!किल्ला जिंकण्यातून सत्तेची ताकद कळायची!किल्ला अतिशय दुर्गम ठिकाणी असतो!घनदाट जंगलात असतो!उंचावर असतो!अवघड ठिकाणी असतो!शत्रूचा बिमोड करून किल्ला जिंकूण ताब्यात घेतला जात असे!सत्ता प्रस्थापित केली जात असे!

सत्तेचं मुख्य ठिकाणं असणारें गड-किल्ले भारतात,महाराष्ट्रात अजूनही शाबूत आहेतं!जीर्ण-शिर्ण अवस्थेत उभी आहेत!ढासळलेलें बुरुज,कडा,तटबंदी आजही उभी दिसतात!माणूस ऐतिहासिक सत्येचां केंद्रबिंदू असलेले गड-किल्ले शोधत, हिंडत असतो!प्राचीन सत्ता केंद्रातून ऊर्जा घेत अवघड किल्ले चढत असतो!देशप्रेम वृद्धिंगत करीत असतो!

पुण्यातील चंदननगर येथे राहात असलेले,मिलिटरी शिस्तीत जगलेले, आदरणीय वसंतराव बागूल सरांनी आयोजित केलेल्या साहसी मोहिमेत कु.अयुश्रीचें मम्मी-पप्पा…श्री योगेश पवार आणि सौ अंजली पवार यांनी डिसेंबर २०२२ला कल्याणगड-साखर गडापासून मोहिमेला प्रारंभ केला होता!सोबत छोटीशी ‘अयुश्री’ असायची!दऱ्या खोऱ्यांच्या सानिध्यात,अवघड-खडकाळ पायवाटेने किल्ल्यावर चढून जाणे अतिशय अवघड असतं,परिश्रमाने भरलेलं असतं!अवघ्या दोन वर्षाच्या अयुश्रीनें आपल्या माता-पित्यांसोबत किल्ला मोहिमेत सतत सहभागी होत राहिली!आणि आताच या महिन्यात दिनांक ०६ जानेवारी२०२४ रोजी अयुश्री चार वर्षांची झाली!अर्थात पुण्यात शिवाजीनगर येथे पौष महिन्यात पुत्रदा एकादशी दिवशी तिचा जन्म झाला!आजपर्यंत १२ गड-किल्ले मोहीम यशस्वीरित्या पार पाडलेल्या चिमुकलीचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे!गौरव करावा असं तिचं धाडस आहे!चिमुकली शूर-विरांगना आहे!

राजामाता जिजाऊ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी,शूर विरांगना राणी लक्ष्मीदेवी सारख्या जीवनातील ऐतिहासिक झुंज देणाऱ्या महान दैवतांचा आदर्श समोर ठेवून उभी असलेली चिमकली अयुश्री घडते आहे!सौ.अंजली-श्री योगेशजी पवार हे आपल्या सुपूत्रीसं बालपणापासून साहसी जगण्याचं उत्तम शिक्षण आणि आदर्श घालून देत आहेत!अयुश्रीच्या माता पित्याचं देखील गौरव करावा तेवढा कमीच आहे!

बालपणापासून मुलांवरती उत्तम संस्कार केलेत तर उत्तम आरोग्यसंपन्न पिढीचा उदय होत असतो!शिक्षण संस्कार घडविणार असावं!आदर्श मूल्यवर्धन असावं!मुलं लहानपणापासून शारीरिक आणि मानसिक दृष्टया तंदुरुस्त राहतील!देशप्रेम नसानसातून उभं राहील!शेवटी देश आहे तर धर्म आहे!त्यासाठीचं मुलांवरती गड किल्ल्यासारखी मोहीम राबविली तर आपल्याला छत्रपती शिवाजी राजे कळतात!त्यांची हिंदवी स्वराज्याची स्वप्ने कळतात!आपल्याला देखील राष्ट्रभक्ती कळते!किल्ले राष्ट्रभक्तीची उगमस्थांने आहेत!

दोन वर्षांपासून गडकिल्ले मोहिमेवर जाणारी चिमुकली अयुश्रीसं येणाऱ्या अनेक धाडसी,साहसी,संकटकाळी निर्णय घेण्याची प्रगल्भ शक्ती प्राप्त होवो!संस्कारी माता-पित्याचं नाव उज्वल करावं!भारत मातेच नाव जगाच्या कानकोपऱ्यात न्यावं याचं हृदयातल्या शुभेच्छा व्यक्त करतो!
सर्वात लहान वयाच्या ट्रेकरचें हृदयातून अभिनंदन करतो!
(कु.अयुश्रीचां संपर्क मोबाईल सौ अंजली पवार नं-९७६७२१४४२१)

… नानाभाऊ माळी
हडपसर,पूणे-४११०२८
मो.नं-९९२३०७६५००
दिनांक-२४जानेवारी २०२४

दोन वर्षांची ट्रेकर अयुश्री 5
दोन वर्षांची ट्रेकर अयुश्री 7

1 thought on “दोन वर्षांची ट्रेकर अयुश्री”

Leave a Comment